शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

काँग्रेसने १९ जागा गमावल्या, २५ कमावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 04:34 IST

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ५२ जागांपर्यंत मजल मारली असली तरी २०१४ च्या १९ जागा पक्षाला गमवाव्या लागल्यात.

- असिफ कुरणे नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ५२ जागांपर्यंत मजल मारली असली तरी २०१४ च्या १९ जागा पक्षाला गमवाव्या लागल्यात. नव्याने २५ जागा काँग्रेसने जिंकून घेतल्या आहेत. २०१४ च्या लाटेत जिंकलेल्या जागा राखण्यात यश आले असते तर काँग्रेसच्या जागा ७० वर पोहोचल्या असत्या.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्त मोदी लाट होती. त्याचा फटका काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना बसला. काँग्रेसचे काही बालेकिल्ले गमवावे लागले. महाराष्ट्रातील नांदेड, हिंगोली या जागा काँग्रेसने गमावल्या. तर चंद्रपूरची जागा नव्याने जिंकली. तेलंगणामध्ये भोगीर ही जागा नव्याने पटकावली. त्याचप्रमाणे पुड्डेचेरी आणि अंदमान निकोबार येथील जागा परत मिळविण्यात काँग्रेसला यश आले. छत्तीसगडमध्ये कोरबा जागा नव्याने मिळविली. ओडिसामध्ये कोरापेट या जागेवरून सप्तगिरी उल्का विजयी झाले. कोस्मे फ्रान्सिस्को यांनी दक्षिण गोव्याची जागा भाजपकडून परत खेचून आणली. काँग्रेसला यावेळी मोलाची साथ दिली ती दक्षिणेतील केरळ, तमिळनाडू तर उत्तरेतील पंजाब राज्याने. केरळमध्ये गेल्यावेळी ८ जागा जिंकल्या होत्या. यावेळी १५ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. पंजाबमधील ३ जागांवरून ८ जागांवर मजल गेली. तमिळनाडूमध्ये द्रमुकसोबत झालेल्या आघाडीचा फायदा काँग्रेस उमेदवारांना झाला. गेल्यावेळी एकही जागा नसणाऱ्या तमिळनाडूमध्ये यावेळी ८ जागांची लॉटरी लागली आहे. काही राज्यांत चांगली कामगिरी झाली असली तरी उत्तरेतील तीन राज्यांत सत्ता येऊनदेखील काँग्रेसला लोकसभेला पदरात काही पडले नाही. राजस्थान, गुजरातमध्ये पक्षाला खातेही उघडता आले नाही. तर सत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील जागा दोनची एक झाली. येथे छिंदवाडाची जागा राखण्यात पक्षाला यश आले. तर गुनामधून ज्योतिरादित्य शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला. सर्वांत मोठा फटका कर्नाटकात बसला असून, येथे जनता दल ( धर्मनिरपेक्ष ) सोबत सत्ता आहे. तरी पक्षाला आठ जागा गमवाव्या लागल्या. बंगलोरमधील एका जागेवर काँग्रेसला विजय मिळाला. बिहारमधील तारीक अन्वर यांची जागा पक्षाला गमवावी लागली. ईशान्येकडील राज्यातील चार जागा हातातून निसटल्या.>उत्तर प्रदेशातील पारंपरिक बालेकिल्ला असणाºया अमेठीमधून राहुल गांधी यांना, तर हरियाणातील रोहतकमधून दिपेंदर हुड्डा यांना पराभव स्वीकारावा लागला. २०१४ च्या पारंपरिक जागा हरल्यामुळे काँग्रेसला १९ जागांचा फटका बसला. या जागा जिंकण्याची शक्यता जास्त असताना पराभव स्वीकारावा लागला.

टॅग्स :congressकाँग्रेस