शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

काँग्रेस एकटी पडली! उमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार मानले; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:28 IST

उमर अब्दुल्ला यांनी निवडणूका शांततेत पूर्ण केल्याबद्दल भाजपा सरकारचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर काँग्रेसने ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावर आधी अन्य विरोधी पक्षांनीही प्रश्न उपस्थित केले होते, आता या मुद्द्यावर विरोधी पक्षांमध्ये एकमत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी निवडणुकीत झालेल्या हेराफेरीच्या आरोपांवरून पुन्हा एकदा काँग्रेसला आरसा दाखवला आहे. सोनमर्गमधील बोगद्याच्या उद्घाटनासाठी हे सर्व नेते एका व्यासपीठावर आले होते. यावेळी उमर अब्दुल्ला यांनी व्यासपीठावर बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आणि त्यांना आपले वचन पाळणारे पंतप्रधान म्हटले. 

दीड लाख वर्षांनी आजच्या रात्री मोठी पर्वणी; सूर्याच्या तावडीतून निसटलेला धुमकेतू दिसणार

उमर अब्दुल्ला म्हणाले की, आपल्या पंतप्रधानांनी नेहमीच त्यांची आश्वासने पूर्ण केली आहेत. योग दिनानिमित्त ते काश्मीरमध्ये आले होते आणि त्यांनी तीन आश्वासने दिली होती. यापैकी दोन पूर्ण झाली आहेत, तर तिसरे शिल्लक आहे. यातील एक आश्वासन म्हणजे दिल्ली आणि दिलमधील अंतर कमी करणे, जे त्यांनी पूर्ण केले आहे.

याशिवाय, दुसरे आश्वासन जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांचे आहे. त्यांनी योग दिनी वचन दिले होते आणि ४ महिन्यांत ते पूर्ण केले. उमर अब्दुल्ला म्हणाले की, त्या आश्वासनाची पूर्तता केल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या आणि मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हा लोकांना संबोधित करत आहे. एवढेच नाही तर, शांततेत आणि कोणत्याही धांदलीशिवाय निवडणुका पार पाडल्याबद्दल उमर अब्दुल्ला यांनी भाजप सरकारचे कौतुक केले.

उमर अब्दुल्ला म्हणाले, 'लोकांनी मोठ्या संख्येने निवडणुकीत भाग घेतला आणि निवडणुका शांततेत पार पडल्या. कुठेही कोणत्याही प्रकारची हेराफेरी किंवा गोंधळ झाल्याची तक्रार नव्हती. याचे श्रेय तुम्हाला, तुमच्या सहकाऱ्यांना आणि निवडणूक आयोगाला जाते, असंही उमर अब्बुल्ला म्हणाले. 

उमर अब्दुल्ला म्हणाले की, हा जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रश्न आहे. माझे मन म्हणते की तुम्ही लवकरच तुमचे हे तिसरे वचन पूर्ण कराल आणि जम्मू आणि काश्मीर लवकरच राज्याचा दर्जा परत मिळेल. 

ईव्हीएमवरुन काँग्रेसवर निशाणा साधलेला 

महाराष्ट्र निवडणुकीनंतरही काँग्रेसने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते. यावर उमर अब्दुल्ला म्हणाले होते की असे प्रश्न योग्य नाहीत. अब्दुल्ला म्हणाले होते की, तुम्ही जिंकल्यावर असे प्रश्न का विचारत नाही. तुम्ही ज्या राज्यांमध्ये जिंकलात त्या राज्यांवर तुम्ही कोणताही प्रश्न उपस्थित केला नाही. त्यामुळे या प्रकारचा निषेध योग्य वाटत नाही. यावर संतप्त काँग्रेसने उमर अब्दुल्ला यांच्यावर टीका केली होती.

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी