शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

काँग्रेसने ७ जागा सपा-बसपाला सोडल्या; मायावती, मुलायमविरोधात उमेदवार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 06:08 IST

उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीने काँग्रेससाठी अमेठी व रायबरेली मतदारसंघात उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसनेही सपा-बसपाच्या सात मतदारसंघांत आपले उमेदवार न देण्याचे ठरविले आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीने काँग्रेससाठी अमेठी व रायबरेली मतदारसंघात उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसनेही सपा-बसपाच्या सात मतदारसंघांत आपले उमेदवार न देण्याचे ठरविले आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व अभिनेते राज बब्बर यांनी रविवारी ही घोषणा केली.सपाचे नेते मुलायम सिंह यादव, अक्षय यादव, डिंपल यादव, बसपाच्या प्रमुख मायावती व राष्ट्रीय लोक दलाचे नेते अजित सिंह व जयंत चौधरी यांच्या मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार नसतील. तसेच अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास, तिथेही काँग्रेसचा उमेदवार नसेल, असे राज बब्बर यांनी स्पष्ट केले आहे. अखिलेश यादव आझमगडमधून निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे.याखेरीज भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर यांच्याविरोधातही काँग्रेसचा उमेदवार नसेल. चंद्रशेखर यांनी वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी चार दिवसांपूर्वी रुग्णालयात जाऊन चंद्रशेखर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्याचवेळी काँग्रेस त्यांच्या भीम आर्मीशी समझोता करेल, असे बोलले जात होते.राज्यात पप्पू यादव यांच्या जन अधिकार पक्षाशीही काँग्रेसचा समझोता झाला आहे. त्यानुसार त्या पक्षासाठी पाच जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन जागांवर त्या पक्षाचे उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.राज्यात भाजपा, सपा- बसपा-रालोद आघाडी व काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार असली तरी अन्य छोट्या राजकीय पक्षांनीही आमची वोट बँक ‘निर्णायक’ असल्याचे सांगितले आहे. निशाद पार्टी, अपना दल (एस), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी आणि अन्य पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यात व्यग्र आहेत. अपना दलच्या अनुप्रिया पटेल गटाने भाजपाशी पुन्हा समझोता केला आहे. त्या केंद्रात राज्यमंत्री आहेत.निशाद पार्टीचे अध्यक्ष संजय निशाद म्हणाले, सपा-बसपा-रालोद आघाडीमध्ये आमचाही सहभाग आहे. सपाच्या कोट्यातून दोन जागा देण्याचे आश्वासन आम्हाला मिळाले आहे. प्रवीण निशाद हे गोरखपूरमधून लढतील व भाजपाला पराभूत करतील. मच्छिमार हा आमचा आधार आहे. आघाडीसाठी आमचा आधार निर्णायक ठरणार आहे.योगी सरकारमध्ये मंत्री असलेल्या ओमप्रकाश राजभर यांच्या पक्षानेही दावा केला आहे की, आमच्या पक्षाचा ५० मतदारसंघांमध्ये प्रभाव आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील प्रोफेसर संजय के. पांडे म्हणाले की, प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे निवडणूक अधिक अटीतटीतची होईल.भाजपाला मदत होऊ देणार नाहीभाजपाला अप्रत्यक्षपणेही मदत होणार नाही, याप्रकारे आम्ही निवडणूक रणनीती ठरवली आहे, असे राज बब्बर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, राज्यात शक्यतो थेट दुरंगी सामने व्हावेत, असा आमचा प्रयत्न होता. तसे होणे आता शक्य नाही. पण जिथे भाजपाविरोधात अन्य पक्षांचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक आहे, तिथे आम्ही उमेदवार उभे करण्याचे टाळू. अशा मतदारसंघांमध्ये तरी दुरंगी लढत व्हावी आणि भाजपाचा पराभव प्रयत्न व्हावा, असेच आमचे प्रयत्न राहतील.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक