शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

काँग्रेसने ७ जागा सपा-बसपाला सोडल्या; मायावती, मुलायमविरोधात उमेदवार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 06:08 IST

उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीने काँग्रेससाठी अमेठी व रायबरेली मतदारसंघात उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसनेही सपा-बसपाच्या सात मतदारसंघांत आपले उमेदवार न देण्याचे ठरविले आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीने काँग्रेससाठी अमेठी व रायबरेली मतदारसंघात उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसनेही सपा-बसपाच्या सात मतदारसंघांत आपले उमेदवार न देण्याचे ठरविले आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व अभिनेते राज बब्बर यांनी रविवारी ही घोषणा केली.सपाचे नेते मुलायम सिंह यादव, अक्षय यादव, डिंपल यादव, बसपाच्या प्रमुख मायावती व राष्ट्रीय लोक दलाचे नेते अजित सिंह व जयंत चौधरी यांच्या मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार नसतील. तसेच अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास, तिथेही काँग्रेसचा उमेदवार नसेल, असे राज बब्बर यांनी स्पष्ट केले आहे. अखिलेश यादव आझमगडमधून निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे.याखेरीज भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर यांच्याविरोधातही काँग्रेसचा उमेदवार नसेल. चंद्रशेखर यांनी वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी चार दिवसांपूर्वी रुग्णालयात जाऊन चंद्रशेखर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्याचवेळी काँग्रेस त्यांच्या भीम आर्मीशी समझोता करेल, असे बोलले जात होते.राज्यात पप्पू यादव यांच्या जन अधिकार पक्षाशीही काँग्रेसचा समझोता झाला आहे. त्यानुसार त्या पक्षासाठी पाच जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन जागांवर त्या पक्षाचे उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.राज्यात भाजपा, सपा- बसपा-रालोद आघाडी व काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार असली तरी अन्य छोट्या राजकीय पक्षांनीही आमची वोट बँक ‘निर्णायक’ असल्याचे सांगितले आहे. निशाद पार्टी, अपना दल (एस), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी आणि अन्य पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यात व्यग्र आहेत. अपना दलच्या अनुप्रिया पटेल गटाने भाजपाशी पुन्हा समझोता केला आहे. त्या केंद्रात राज्यमंत्री आहेत.निशाद पार्टीचे अध्यक्ष संजय निशाद म्हणाले, सपा-बसपा-रालोद आघाडीमध्ये आमचाही सहभाग आहे. सपाच्या कोट्यातून दोन जागा देण्याचे आश्वासन आम्हाला मिळाले आहे. प्रवीण निशाद हे गोरखपूरमधून लढतील व भाजपाला पराभूत करतील. मच्छिमार हा आमचा आधार आहे. आघाडीसाठी आमचा आधार निर्णायक ठरणार आहे.योगी सरकारमध्ये मंत्री असलेल्या ओमप्रकाश राजभर यांच्या पक्षानेही दावा केला आहे की, आमच्या पक्षाचा ५० मतदारसंघांमध्ये प्रभाव आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील प्रोफेसर संजय के. पांडे म्हणाले की, प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे निवडणूक अधिक अटीतटीतची होईल.भाजपाला मदत होऊ देणार नाहीभाजपाला अप्रत्यक्षपणेही मदत होणार नाही, याप्रकारे आम्ही निवडणूक रणनीती ठरवली आहे, असे राज बब्बर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, राज्यात शक्यतो थेट दुरंगी सामने व्हावेत, असा आमचा प्रयत्न होता. तसे होणे आता शक्य नाही. पण जिथे भाजपाविरोधात अन्य पक्षांचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक आहे, तिथे आम्ही उमेदवार उभे करण्याचे टाळू. अशा मतदारसंघांमध्ये तरी दुरंगी लढत व्हावी आणि भाजपाचा पराभव प्रयत्न व्हावा, असेच आमचे प्रयत्न राहतील.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक