शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

काँग्रेसने ७ जागा सपा-बसपाला सोडल्या; मायावती, मुलायमविरोधात उमेदवार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 06:08 IST

उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीने काँग्रेससाठी अमेठी व रायबरेली मतदारसंघात उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसनेही सपा-बसपाच्या सात मतदारसंघांत आपले उमेदवार न देण्याचे ठरविले आहे.

लखनौ : उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीने काँग्रेससाठी अमेठी व रायबरेली मतदारसंघात उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसनेही सपा-बसपाच्या सात मतदारसंघांत आपले उमेदवार न देण्याचे ठरविले आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व अभिनेते राज बब्बर यांनी रविवारी ही घोषणा केली.सपाचे नेते मुलायम सिंह यादव, अक्षय यादव, डिंपल यादव, बसपाच्या प्रमुख मायावती व राष्ट्रीय लोक दलाचे नेते अजित सिंह व जयंत चौधरी यांच्या मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार नसतील. तसेच अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास, तिथेही काँग्रेसचा उमेदवार नसेल, असे राज बब्बर यांनी स्पष्ट केले आहे. अखिलेश यादव आझमगडमधून निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे.याखेरीज भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर यांच्याविरोधातही काँग्रेसचा उमेदवार नसेल. चंद्रशेखर यांनी वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी चार दिवसांपूर्वी रुग्णालयात जाऊन चंद्रशेखर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्याचवेळी काँग्रेस त्यांच्या भीम आर्मीशी समझोता करेल, असे बोलले जात होते.राज्यात पप्पू यादव यांच्या जन अधिकार पक्षाशीही काँग्रेसचा समझोता झाला आहे. त्यानुसार त्या पक्षासाठी पाच जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन जागांवर त्या पक्षाचे उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.राज्यात भाजपा, सपा- बसपा-रालोद आघाडी व काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार असली तरी अन्य छोट्या राजकीय पक्षांनीही आमची वोट बँक ‘निर्णायक’ असल्याचे सांगितले आहे. निशाद पार्टी, अपना दल (एस), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी आणि अन्य पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यात व्यग्र आहेत. अपना दलच्या अनुप्रिया पटेल गटाने भाजपाशी पुन्हा समझोता केला आहे. त्या केंद्रात राज्यमंत्री आहेत.निशाद पार्टीचे अध्यक्ष संजय निशाद म्हणाले, सपा-बसपा-रालोद आघाडीमध्ये आमचाही सहभाग आहे. सपाच्या कोट्यातून दोन जागा देण्याचे आश्वासन आम्हाला मिळाले आहे. प्रवीण निशाद हे गोरखपूरमधून लढतील व भाजपाला पराभूत करतील. मच्छिमार हा आमचा आधार आहे. आघाडीसाठी आमचा आधार निर्णायक ठरणार आहे.योगी सरकारमध्ये मंत्री असलेल्या ओमप्रकाश राजभर यांच्या पक्षानेही दावा केला आहे की, आमच्या पक्षाचा ५० मतदारसंघांमध्ये प्रभाव आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील प्रोफेसर संजय के. पांडे म्हणाले की, प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे निवडणूक अधिक अटीतटीतची होईल.भाजपाला मदत होऊ देणार नाहीभाजपाला अप्रत्यक्षपणेही मदत होणार नाही, याप्रकारे आम्ही निवडणूक रणनीती ठरवली आहे, असे राज बब्बर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, राज्यात शक्यतो थेट दुरंगी सामने व्हावेत, असा आमचा प्रयत्न होता. तसे होणे आता शक्य नाही. पण जिथे भाजपाविरोधात अन्य पक्षांचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक आहे, तिथे आम्ही उमेदवार उभे करण्याचे टाळू. अशा मतदारसंघांमध्ये तरी दुरंगी लढत व्हावी आणि भाजपाचा पराभव प्रयत्न व्हावा, असेच आमचे प्रयत्न राहतील.

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक