शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

काँग्रेसच्या नेतृत्वाने जनतेची दिशाभूल थांबवावी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 06:10 IST

सोनिया गांधी यांनी यापूर्वी अनेकदा पंतप्रधानांना पत्र लिहून कोरोनाच्या परिस्थितीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची मागणी केली होती.

नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थितीवरून मोदी सरकारवर काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या टीकेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी सरकारवर टीका केल्यानंतर नड्डा यांनी कोरोनाच्या संकटामध्ये काँग्रेसच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून पलटवार केला. तसेच काँग्रेसच्या नेतृत्वाने जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर नड्डा यांनी टीका केली आहे.सोनिया गांधी यांनी यापूर्वी अनेकदा पंतप्रधानांना पत्र लिहून कोरोनाच्या परिस्थितीबाबत सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची मागणी केली होती. तसेच सरकारच्या लसीकरण धोरणावरूनही त्यांनी जोरदार टीका केली. त्या टीकेला नड्डा यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे. नड्डा यांनी सांगितले, की काँग्रेसचे काही नेते कोरोनाच्या संकटकाळात चांगले काम करत आहेत. मात्र, पक्षातील काही नेत्यांकडून पसरविण्यात येत असलेल्या नकारात्मकतेमुळे त्यांच्या कामावर ग्रहण लावले जात आहे. काही जणांची अशी इच्छा आहे, की भारत कोरोनाचा अतिशय धैर्याने लढा देत असताना काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाने सातत्याने विरोधाभासी भूमिका घेणे सोडावे आणि जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, असे नड्डा यांनी सांगितले.

मोफत लसीवरून हल्लाबोलभाजपा आणि एनडीएचे सरकार असणाऱ्या राज्यांमध्ये गरीब व वंचितांना मोफत लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये असणाऱ्या सरकारलाही गरिबांबद्दल अशाच भावना असतील, याची मला खात्री आहे. तेदेखील मोफत लस देण्याचा असा निर्णय घेऊ शकतात का, असा प्रश्नही जे. पी. नड्डा यांनी केला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाcongressकाँग्रेसCorona vaccineकोरोनाची लस