शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

भाजपसाठी काम करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना हाकलणार; राहुल यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:32 IST

काँग्रेस पक्ष जोपर्यंत जबाबदाऱ्या पार पाडणार नाही, तोपर्यंत लोक काँग्रेसला मतदान करणार नाही

अहमदाबाद : भाजपासाठी काम करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची ओळख पटवून त्यांची हकालपट्टी करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केले.

गुजरात दौऱ्यावर आलेले राहुल गांधी कार्यकर्त्यासमोर म्हणाले की, काँग्रेस पक्ष जोपर्यंत जबाबदाऱ्या पार पाडणार नाही, तोपर्यंत लोक काँग्रेसला मतदान करणार नाही. वास्तविक गुजरातमधील लोक सापळ्यात सापडले आहेत. हिरे उद्योग, वस्त्रोद्योग आणि सिरॅमिक उद्योग रसातळाला गेला आहे. लोकांना एका नव्या दृष्टिकोनाचा शोध आहे. भाजपाच्या तीन दशकाच्या शासन काळात जी स्वप्ने दाखविण्यात आली होती, ती पूर्ण झालेली नाहीत.

राहुल गांधी यांनी म्हटले की, गुजरात काँग्रेसमधील नेते व कार्यकर्ते यांच्यात दोन प्रकारचे लोक आहेत. एक जनतेशी प्रामाणिक आहेत, त्यांच्यासाठी लढतात, त्यांच्या हृदयात काँग्रेसची विचारधारा आहे. दुसरे लोकांपासून तुटलेले आहेत, जे लोकांचा सन्मान करीत नाहीत आणि त्यातील अर्धेअधिक भाजपासोबत आहेत. अशा लोकांना शोधून काढून दूर सारण्याची गरज आहे. या दोन्ही गटांना वेगळे केले जात नाही, तोपर्यंत गुजराती लोक काँग्रेसवर विश्वास ठेवणार नाहीत.

निवडणुकीची तयारी 

२०२७ मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी राहुल गांधी हे गुजरात दौऱ्यावर आले आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. भाजपाला पराभूत करण्यासाठी मजबूत नियोजन करण्याचे आश्वासनही पक्ष कार्यकर्त्यांना दिले.

अहमदाबादेत होणार काँग्रेसचे अधिवेशन 

येत्या ८ व ९ एप्रिल रोजी अहमदाबादेत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) अधिवेशन होत आहे. गुजरातेत तब्बल ६४ वर्षांनी एआयसीसीचे अधिवेशन होणार आहे. याची जोरात तयारी सुरु आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसGujaratगुजरात