शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

शालेय अभ्यासक्रम बदलावरून सत्तारूढ काँग्रेसचे नेते आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:26 AM

काँग्रेसचे माजी खासदार व पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गोपाल सिंह ईडवा यांनीही शिक्षणमंत्र्यांच्या जोहरबाबतच्या वक्तव्यावर आपली असहमती दर्शवली.

जयपूर : राजस्थानमध्ये शालेय अभ्यासक्रम बदलण्यावरून सत्ताधारी काँग्रेसचे नेते आमने-सामने उभे ठाकले आहेत. सती प्रथा तसेच जोहर प्रथेशी संबंधित बदलावरून शिक्षणमंत्री ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करीत आहेत, असा आरोप नेत्यांनी केला आहे.दळणवळणमंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी पत्रकारांना सांगितले, जोहरबाबत सर्वांना समजले पाहिजे. नेता, मग तो काँग्रेसचा असो की भाजपचा, त्याने विचार न करता भाषणबाजी करू नये. मंत्रीपदावर बसलो म्हणजे आम्ही इतिहास बदलू शकत नाहीत. इतिहास जसा असेल तसाच राहील. भाजपने जी चूक केली आहे, ती आम्ही करणार नाहीत.काँग्रेसचे माजी खासदार व पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गोपाल सिंह ईडवा यांनीही शिक्षणमंत्र्यांच्या जोहरबाबतच्या वक्तव्यावर आपली असहमती दर्शवली. ते म्हणाले की, जोहरसंदर्भात छेडछाड करणे हे ऐतिहासिक व सामाजिकदृष्ट्याही ठीक नाही. मी याबाबत उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली आहे व मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनाही पत्र लिहिणार आहे. शालेयमंत्र्यांना सती व जोहरमधील फरक माहीत नसावा, अशी टीकाही त्यांनी केली.राज्यातील नवीन काँग्रेस सरकारने अभ्यासक्रमात काही बदल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार, आठवीच्या वर्गातील इंग्रजीच्या पहिल्या धड्यात सती किंवा जोहरसंबंधित एक चित्र हटवून केवळ दुर्गाचे चित्र लावावे, असा विचार पुढे आला आहे. मात्र, त्यावरून राज्यात वादाला तोंड फुटले आहे.त्यातच शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा यांनी म्हटले आहे की,सती प्रथेवर बंदी आहे, तर जोहरचा इंग्रजी पुस्तकाशी काय संबंध आहे? हे चित्र जोहरशी संबंधित आहे की सती प्रथेशी संबंधित आहे, हेही स्पष्ट केलेले नाही.शिक्षणमंत्र्यांनाच आणखी शिक्षणाची गरज - भाजपभाजप नेतेही शालेय अभ्यासक्रम बदलण्याच्या प्रस्तावावर सतत टीका करीत आहेत. पक्षाचे नेते अभिमन्यू सिंह रजवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्य सरकारने महाराणा प्रताप यांना महान नव्हते असे सांगून, जोहरचे चित्र हटविण्याचा, तसेच विनायक दामोदर सावरकर यांच्या नावापुढील वीर शब्द हटवण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षणमंत्र्यांनी दिलेली भावनिक मुद्यावरील वक्तव्ये पाहता त्यांनाच आणखी शिक्षणाची गरज आहे, अशी टीकाही केली.

टॅग्स :congressकाँग्रेस