शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"काँग्रेस नेत्यांचे चिकन, सँण्डविचकडे लक्ष; देशावर संकट आल्यावर परदेशात गेले"; हार्दिक पटेलच्या पत्रात काय लिहिलंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 13:01 IST

देशातील लोकांना विरोध नकोय तर असा पर्याय हवाय जे त्यांच्या भविष्याबद्दल विचार करतील. देशाला पुढे घेऊन जाण्यास सक्षम आहेत असं हार्दिक पटेलनं म्हटलं.

अहमदाबाद – गुजरात काँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल(Congress Hardik Patel) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अलीकडच्या काळात हार्दिक पटेल भाजपाच्या धोरणांचं कौतुक आणि स्वपक्षातील नेत्यांवर आरोप करत असल्याने ते काँग्रेस सोडतील अशी चर्चा आधीपासून सुरू होती. आता सोशल मीडियावर हार्दिक पटेल यांनी राजीनामा पत्र शेअर केले आहे. हिंदी, गुजरात आणि इंग्रजीत हे पत्र आहे.

या पत्रात म्हटलंय की, २१ व्या युगात भारत जगातील सर्वात युवा देश आहे. देशातील युवकांना एक सक्षम आणि कणखर नेतृत्व हवंय. मागील ३ वर्षापासून मी पाहतोय काँग्रेस केवळ विरोधाचं राजकारण करत आहे. पण देशातील लोकांना विरोध नकोय तर असा पर्याय हवाय जे त्यांच्या भविष्याबद्दल विचार करतील. देशाला पुढे घेऊन जाण्यास सक्षम आहेत. अयोध्येत राम मंदिर असो, CAA NRC मुद्दा असो, जम्मू काश्मीरातील कलम ३७० रद्द करणे किंवा जीएसटीबाबत निर्णय असो. देशाला अनेक वर्षापासून यावर तोडगा हवा होता परंतु काँग्रेस पक्ष केवळ बाधा घालण्याचं काम करत होती असं हार्दिकने सांगितले आहे.

तसेच देश असो, गुजरात असो वा पटेल समाज प्रत्येक मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका केवळ केंद्र सरकारचा विरोध करण्यापर्यंत मर्यादित आहे. काँग्रेसला जवळजवळ सर्वच राज्यातील जनतेने रिजेक्ट केले आहे. कारण काँग्रेस पक्ष नेतृत्व जनतेसमक्ष एक बेसिक रोडमॅप देऊ शकले नाहीत. कुठल्याही मुद्द्याबद्दल गांभीर्य कमी आहे असणं मोठं कारण आहे. मी जेव्हा या गोष्टींबाबत सांगत होतो तेव्हा मोबाईल आणि अन्य गोष्टींवर लक्ष देत होते. जेव्हा जेव्हा देश संकटात होता तेव्हा आमचे नेते परदेशात जात होते. पक्ष नेतृत्वाला गुजरात आणि गुजरातच्या लोकांबद्दल द्वेष असल्यासारखं वाटत असे. अशात गुजरातची जनता काँग्रेसकडे कुठल्या अपेक्षेने पाहणार? असा प्रश्न हार्दिकनं पत्रात केला आहे.

दरम्यान, आमच्यासारखे कार्यकर्ते स्वत: गाडीचा खर्च करून दिवसाला ५००-६०० किमी प्रवास करत होते. जनतेमध्ये जात होते तेव्हा गुजरातचे मोठे नेते केवळ दिल्लीतील आलेल्या नेत्यांना वेळेवर चिकन, सँण्डविच मिळाले का यावर लक्ष देत राहिले. जे गुजरातींचा सन्मान करत नाही अशा पार्टीत का आहात? असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून वारंवार विचारला जात होता. काँग्रेस पक्षाने युवकांचा भरवसा तोडला आहे. ज्यामुळे कुठलाही युवक काँग्रेससोबत राहू इच्छित नाही असा आरोप हार्दिक पटेलनं केला आहे.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलcongressकाँग्रेस