शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

"काँग्रेस नेत्यांचे चिकन, सँण्डविचकडे लक्ष; देशावर संकट आल्यावर परदेशात गेले"; हार्दिक पटेलच्या पत्रात काय लिहिलंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 13:01 IST

देशातील लोकांना विरोध नकोय तर असा पर्याय हवाय जे त्यांच्या भविष्याबद्दल विचार करतील. देशाला पुढे घेऊन जाण्यास सक्षम आहेत असं हार्दिक पटेलनं म्हटलं.

अहमदाबाद – गुजरात काँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल(Congress Hardik Patel) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अलीकडच्या काळात हार्दिक पटेल भाजपाच्या धोरणांचं कौतुक आणि स्वपक्षातील नेत्यांवर आरोप करत असल्याने ते काँग्रेस सोडतील अशी चर्चा आधीपासून सुरू होती. आता सोशल मीडियावर हार्दिक पटेल यांनी राजीनामा पत्र शेअर केले आहे. हिंदी, गुजरात आणि इंग्रजीत हे पत्र आहे.

या पत्रात म्हटलंय की, २१ व्या युगात भारत जगातील सर्वात युवा देश आहे. देशातील युवकांना एक सक्षम आणि कणखर नेतृत्व हवंय. मागील ३ वर्षापासून मी पाहतोय काँग्रेस केवळ विरोधाचं राजकारण करत आहे. पण देशातील लोकांना विरोध नकोय तर असा पर्याय हवाय जे त्यांच्या भविष्याबद्दल विचार करतील. देशाला पुढे घेऊन जाण्यास सक्षम आहेत. अयोध्येत राम मंदिर असो, CAA NRC मुद्दा असो, जम्मू काश्मीरातील कलम ३७० रद्द करणे किंवा जीएसटीबाबत निर्णय असो. देशाला अनेक वर्षापासून यावर तोडगा हवा होता परंतु काँग्रेस पक्ष केवळ बाधा घालण्याचं काम करत होती असं हार्दिकने सांगितले आहे.

तसेच देश असो, गुजरात असो वा पटेल समाज प्रत्येक मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका केवळ केंद्र सरकारचा विरोध करण्यापर्यंत मर्यादित आहे. काँग्रेसला जवळजवळ सर्वच राज्यातील जनतेने रिजेक्ट केले आहे. कारण काँग्रेस पक्ष नेतृत्व जनतेसमक्ष एक बेसिक रोडमॅप देऊ शकले नाहीत. कुठल्याही मुद्द्याबद्दल गांभीर्य कमी आहे असणं मोठं कारण आहे. मी जेव्हा या गोष्टींबाबत सांगत होतो तेव्हा मोबाईल आणि अन्य गोष्टींवर लक्ष देत होते. जेव्हा जेव्हा देश संकटात होता तेव्हा आमचे नेते परदेशात जात होते. पक्ष नेतृत्वाला गुजरात आणि गुजरातच्या लोकांबद्दल द्वेष असल्यासारखं वाटत असे. अशात गुजरातची जनता काँग्रेसकडे कुठल्या अपेक्षेने पाहणार? असा प्रश्न हार्दिकनं पत्रात केला आहे.

दरम्यान, आमच्यासारखे कार्यकर्ते स्वत: गाडीचा खर्च करून दिवसाला ५००-६०० किमी प्रवास करत होते. जनतेमध्ये जात होते तेव्हा गुजरातचे मोठे नेते केवळ दिल्लीतील आलेल्या नेत्यांना वेळेवर चिकन, सँण्डविच मिळाले का यावर लक्ष देत राहिले. जे गुजरातींचा सन्मान करत नाही अशा पार्टीत का आहात? असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून वारंवार विचारला जात होता. काँग्रेस पक्षाने युवकांचा भरवसा तोडला आहे. ज्यामुळे कुठलाही युवक काँग्रेससोबत राहू इच्छित नाही असा आरोप हार्दिक पटेलनं केला आहे.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलcongressकाँग्रेस