शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

राहुल यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह नाही; बचावासाठी सरसावले काँग्रेस नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 14:17 IST

काँग्रेसमध्ये सध्या या पराभवावरुन चिंतन करण्याचं काम सुरु आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीआधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत.

नवी दिल्ली - 17 व्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने 2014 च्या निवडणुकीपेक्षाही मोठं यश प्राप्त केलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 302 जागा मिळाल्या आहेत. तर एनडीएला 350 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला सपाटून मार खावा लागला आहे. अवघ्या 52 जागांवर काँग्रेस विजयी झालं आहे तर काही राज्यात काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. 

काँग्रेसमध्ये सध्या या पराभवावरुन चिंतन करण्याचं काम सुरु आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीआधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत. एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना कमलनाथ यांनी सांगितले की, काँग्रेसला आपलं म्हणणं लोकांपर्यत पोहचविण्यासाठी पूर्णपणे यशस्वी ठरू शकली नाही. प्रियंका गांधी यांना सक्रीय राजकारणात आणण्यासोबत पक्षात जबाबदारी देण्यास उशीर झाला. प्रियंका गांधी यांना खूप आधी काँग्रेसच्या प्रचारात उतरवलं जाऊ शकत होतं. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या तुलनेत भाजपाचा निवडणूक प्रचार जोरात होता. नरेंद्र मोदी यांचे म्हणणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम केलं गेले मात्र काँग्रेसला अपेक्षितपणे तसं करता आलं नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर कुठलंही प्रश्नचिन्ह नाही. राहुल गांधी हेच आमचे नेते आहेत आणि राहतील असं कमलनाथ यांनी सांगितले. 

न्याय आणण्यास झाला उशीर काँग्रेसने न्याय योजना गरिब लोकांसाठी आणली मात्र ही आणण्यास काँग्रेसला उशीर झाला. आम्ही ही योजना प्रचारात पहिली आणू शकलो असतो पण त्याला उशीर झाला. भाजपाच्या प्रचारात ही योजना फक्त निवडणुकीचं आश्वासन म्हणून राहिली. 

भोपाळ लोकसभा मतदारसंघात दिग्विजय सिंह यांचा पराभव केवळ हिंदूत्ववादी मुद्द्यामुळे झाला. विभाजनाच्या वातावरणात लोकांनी इतर मुद्दे विसरून फक्त हिंदू म्हणून मतं दिली. महात्मा गांधी यांची विचारधारा हरली आणि गोडसे विचारधारा जिंकली हे चिंता करण्यासारखं आहे असं कमलनाथ यांनी सांगितले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी