शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"अण्णा आंदोलनातून एकजण मुख्यमंत्री झाला तर दुसरा मोठा व्यापारी...तुम्हाला काय मिळालं?" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 11:58 IST

Baba Ramdev, Arvind Kejriwal And Congress : काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी केजरीवाल आणि रामदेव बाबा यांच्या फोटोवरून अण्णा आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. 

नवी दिल्ली - युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास (Congress) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या गळाभेटीचा एक फोटो शेअर करून निशाणा साधला आहे. "अण्णा आंदोलनातून एकजण मुख्यमंत्री झाला, तर दुसरा मोठा व्यापारी झाला. अण्णा आंदोलनातून तुम्हाला काय मिळालं?" असा प्रश्न श्रीनिवास यांनी विचारला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. 

2011 मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आणि लोकपालच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनावरून केजरीवाल आणि रामदेव बाबांवर टीकास्त्र सोडलं आहे. 2011 च्या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषण केलं होतं. जनलोकपाल विधेयक संसदेत पारीत झालं नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा उपोषण करावं लागलं. त्यामुळे नंतर सरकारने लोकसभेत हे विधेयक संमत केलं आणि अण्णांनी आंदोलन मागे घेतलं.

या आंदोलनात अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव, कुमार विश्वास, संजय सिंह अशा अनेकांनी सहभाग घेतला होता. रामदेव बाबांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. नंतरच्या काळात यापैकी काही नेत्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली आणि सत्तेतही आले. अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आहेत. यावरूनच काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी केजरीवाल आणि रामदेव बाबा यांच्या फोटोवरून अण्णा आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. 

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हे काही काळासाठी हॅक झालं होतं. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. याच दरम्यान बिटकॉईन संदर्भात ट्विट करण्यात आलं होतं. यावरून देखील काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, "हा योगायोग होता की प्रयोग होता, हॅकर्सला देखील भारतात बिटकॉईन विकण्यासाठी सर्वात मोठा सेल्समन कोण आहे हे माहिती होतं. हॅकर्स मोदीजींच्या अकाऊंटवरून बिटकॉईन विकत होते तेव्हा चौकीदार कोठे होते?" असा प्रश्न श्रीनिवास यांनी आपल्या ट्वीटमध्ये विचारला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे.  

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेस