शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"गृहमंत्री असताना काश्मिरात गेल्याने प्रसिद्धी तर मिळाली, पण माझी..."; हे काय बोलून गेले सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 17:05 IST

माजी गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपने पलटवार केला आहे...

'मी गृहमंत्री असताना मला कुणी सल्ला दिला होता की, आपण इकडे तिकडे भटकण्याऐवजी लाल चौकात जा. तेथे एखादे भाषण करा, तेथील लोकांना भेटा, डल तलावाला भेट द्या. असे केल्यास तेथील लोकांना वाटेल की, किती चांगला गृहमंत्री आहे. जो न घाबरता काश्मीरात जातो. यामुळे प्रसिद्ध तर मिळाली, पण खरे तर माझी फाट*** होती,' असे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. ते त्यांच्या जीवनावरील 'फाइव डेकेड्स ऑफ पॉलिटिक्स' या राशिद किदवई यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.

आपण हे केवळ आपल्याला हसवण्यासाठी बोललो  - शिंदे यांच्या या विधानानंतर संपूर्ण सभागृहात हशा पिकला. मात्र यानंतर, आपण हे केवळ आपल्याला हसवण्यासाठीच बोललो. एक माजी पोलीस कर्मचारी असे बोलू शकत नाही. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि दिग्विजय सिंह आदी उपस्थित होते.

भाजपचा पलटवार - माजी गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपने पलटवार केला आहे. भाजप प्रवक्ता शेहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया पोस्ट करत, "काँग्रेसने शिंदे यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यूपीए काळातील गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जम्मू-काश्मीरात जाण्याची भीती वाटत होती, अशी कबुली दिली. मात्र, आज राहुल गांधी सहजपणे काश्मिरात भारत जोडो यात्रा आणि स्नो फाइट करताना दिसू शकतात. मात्र नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा दहशतीच्या काळात घेऊन जायचे आहे," असे म्हटले आहे.

मल्लिकार्जुन खर्गे काय म्हणाले? यावेळी शिंदे यांचे कौतुक करताना काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "स्वतःला अनुसूचित जातीचे सांगून आम्ही कधीही कुणाकडे काही मागत नाही. शिंदे यांनी महाराष्ट्रासाठी 9 अर्थसंकल्प मांडले आहेत. आजकाल महाराष्ट्रात एक-दो वर्षांतच लोक बदलतात." यावेली, दिग्विजय सिंह यांनीही शिंदे यांचे कौतुक केले. "गृहमंत्री असताना शिंदे यांनी इशान्येपासून ते कश्मीरपर्यंत दशहतवादाचा सामना केला," असे म्हटले आहे.

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीर