शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणी घोषित करणे आजीची चूकच, पण...; राहुल गांधींनी सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 21:47 IST

देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी आणीबाणी (Emergency) घोषित करण्याला अनेक वर्षे उलटून गेली, तरी आजही त्यावर अनेक जण बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, इंदिरा गांधींचे नातू, काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आणीबाणी संदर्भात मोठे विधान केले आहे. कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबतचे मत व्यक्त केले.

ठळक मुद्देराहुल गांधींची भाजपवर जोरदार टीकाराष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करतेय - राहुल गांधीमीडिया आणि न्यायालयावरही वचक ठेवण्याचा प्रयत्न - राहुल गांधी

नवी दिल्ली : देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी आणीबाणी (Emergency) घोषित करण्याला अनेक वर्षे उलटून गेली, तरी आजही त्यावर अनेक जण बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, इंदिरा गांधींचे नातू, काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आणीबाणी संदर्भात मोठे विधान केले आहे. कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबतचे मत व्यक्त केले. (congress leader rahul gandhi says emergency was mistake of indira gandhi)

प्रोफेसर कौशिक बसु यांच्याशी साधलेल्या संवादादरम्यान राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबत म्हटले की, आणीबाणी घोषित करणे इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, त्याचा पक्ष म्हणून काँग्रेसने कधीही फायदा करून घेतला नाही. आणीबाणीचा काळ आणि आताची परिस्थिती भिन्न आहे. काँग्रेस पक्षाने स्वतंत्र संस्थांचा कधीही गैरवापर केला नाही, असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला. 

उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा

भाजप सरकारने लोकशाहीचे नुकसान केले

प्रोफेसर कौशिक बसु यांच्याशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. देशातील वर्तमान सरकार लोकशाही प्रणालीचे मोठे नुकसान करत आहे. भारतातील संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे, असा आरोप करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करत आहे. गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेस लोकशाहीसाठी झटत आली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

मीडिया आणि न्यायालयावरही वचक ठेवण्याचा प्रयत्न

वर्तमान सरकारकडून प्रसारमाध्यमांपासून न्यायप्रणालीपर्यंत वचक ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली. मणिपूरचे राज्यपाल भाजपची मदत करत आहेत. पुदुच्चेरीच्या उपराज्यपालांनीही अनेक विधेयक मंजूर होऊ दिली नाही, असा दावाही राहुल गांधींनी केला आहे. राजीव गांधी यांच्या हत्येसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, माझे वडील राजीव गांधी यांची हत्या आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी होती. ते अनेक शक्तींशी न घाबरता लढले, असे राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीIndira Gandhiइंदिरा गांधीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ