शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

आणीबाणी घोषित करणे आजीची चूकच, पण...; राहुल गांधींनी सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 21:47 IST

देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी आणीबाणी (Emergency) घोषित करण्याला अनेक वर्षे उलटून गेली, तरी आजही त्यावर अनेक जण बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, इंदिरा गांधींचे नातू, काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आणीबाणी संदर्भात मोठे विधान केले आहे. कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबतचे मत व्यक्त केले.

ठळक मुद्देराहुल गांधींची भाजपवर जोरदार टीकाराष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करतेय - राहुल गांधीमीडिया आणि न्यायालयावरही वचक ठेवण्याचा प्रयत्न - राहुल गांधी

नवी दिल्ली : देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी आणीबाणी (Emergency) घोषित करण्याला अनेक वर्षे उलटून गेली, तरी आजही त्यावर अनेक जण बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, इंदिरा गांधींचे नातू, काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आणीबाणी संदर्भात मोठे विधान केले आहे. कॉर्नेल विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबतचे मत व्यक्त केले. (congress leader rahul gandhi says emergency was mistake of indira gandhi)

प्रोफेसर कौशिक बसु यांच्याशी साधलेल्या संवादादरम्यान राहुल गांधी यांनी आणीबाणीबाबत म्हटले की, आणीबाणी घोषित करणे इंदिरा गांधी यांची चूक होती. मात्र, त्याचा पक्ष म्हणून काँग्रेसने कधीही फायदा करून घेतला नाही. आणीबाणीचा काळ आणि आताची परिस्थिती भिन्न आहे. काँग्रेस पक्षाने स्वतंत्र संस्थांचा कधीही गैरवापर केला नाही, असा दावा राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला. 

उच्चशिक्षित ममता दीदींकडे नेमकी संपत्ती किती? 'इतके' आहे सोने; पाहा

भाजप सरकारने लोकशाहीचे नुकसान केले

प्रोफेसर कौशिक बसु यांच्याशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. देशातील वर्तमान सरकार लोकशाही प्रणालीचे मोठे नुकसान करत आहे. भारतातील संस्थांच्या स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे, असा आरोप करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करत आहे. गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेस लोकशाहीसाठी झटत आली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

मीडिया आणि न्यायालयावरही वचक ठेवण्याचा प्रयत्न

वर्तमान सरकारकडून प्रसारमाध्यमांपासून न्यायप्रणालीपर्यंत वचक ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली. मणिपूरचे राज्यपाल भाजपची मदत करत आहेत. पुदुच्चेरीच्या उपराज्यपालांनीही अनेक विधेयक मंजूर होऊ दिली नाही, असा दावाही राहुल गांधींनी केला आहे. राजीव गांधी यांच्या हत्येसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, माझे वडील राजीव गांधी यांची हत्या आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी होती. ते अनेक शक्तींशी न घाबरता लढले, असे राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीIndira Gandhiइंदिरा गांधीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ