शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी शाळकरी मुलांसोबत धावले; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा उडाला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 11:36 IST

गेल्या ५० दिवसापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू आहे. यातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गेल्या ५० दिवसापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू आहे. यातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आज रविवारी पदयात्रेदरम्यान अचानक काही शालेय विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी धावू लागले. गांधी यांच्या अचानक धावण्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला.

यावेळी तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी आणि इतरही धावू लागले. राहुल यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह रविवारी सकाळी जडचर्ला येथून पदयात्रेला सुरुवात केली आणि २२ किमी अंतर कापणार असल्याचे बोलले जात आहे. तेलंगणात काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा हा पाचवा दिवस आहे.

दहा लाख नोकऱ्यांसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

रविवारच्या पदयात्रेची सांगता होण्यापूर्वी संध्याकाळी शादनगर येथील सोलीपूर जंक्शन येथे राहुल गांधी एका जाहीर सभेला संबोधित करतील. शनिवारी रात्री जडचर्ला एक्स रोड जंक्शन येथे थांबण्यापूर्वी त्यांनी २० किलोमीटरहून अधिक अंतर पायी कापले होते. ही यात्रा तेलंगणातील सात लोकसभा आणि १९ विधानसभा मतदारसंघांतून एकूण ३७५ किलोमीटरचे अंतर पार करेल, त्यानंतर ती ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करेल. ४ नोव्हेंबर रोजी यात्रेला एक दिवसाचा ब्रेक लागणार आहे.

खासदार राहुल 'भारत जोडो यात्रे' दरम्यान क्रीडा, व्यवसाय आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती तसेच विचारवंत आणि विविध समुदायातील नेत्यांना भेटणार आहेत. राहुल गांधी तेलंगणातील प्रार्थनास्थळे, मशिदी आणि मंदिरांना भेट देतील आणि तेथे प्रार्थना करतील. 'भारत जोडो यात्रा' ७ सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झाली. यात्रेचा तेलंगणा टप्पा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पदयात्रा काढली होती. तेलंगणा प्रदेश काँग्रेसने यात्रेच्या समन्वयासाठी १० विशेष समित्या स्थापन केल्या आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी