शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

"आम्हाला हवं ते बोला, पण...", पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला राहुल गांधींचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 15:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इंडिया'वरून विरोधकांवर टीका केल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इंडिया'वरून विरोधकांवर टीका केल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. "तुम्हाला हवं ते आम्हाला बोला मिस्टर मोदी पण आम्ही भारत आहोत", असे गांधींनी म्हटले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरमधील हिंसा आणि क्रूरता यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीवर सडकून टीका केली. या टीकेला आता राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिले आहे. 

राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "तुम्हाला हवं ते आम्हाला बोला मिस्टर मोदी पण आम्ही भारत आहोत. आम्ही मणिपूरमधील परिस्थिती ठिक करण्यासाठी मदत करू आणि प्रत्येक स्त्री आणि मुलाचे अश्रू पुसू. आम्ही तेथील सर्व लोकांसाठी प्रेम आणि शांती परत आणू. तसेच आम्ही मणिपूरमध्ये भारताच्या कल्पनेची पुनर्बांधणी करू."

मोदी काय म्हणाले?विरोधकांच्या 'इंडिया' या आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोचरी टीका केली. "केवळ 'इंडिया' नाव ठेवल्यानं काही होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही 'इंडिया' लावले होते आणि इंडियन मुजाहिदीनच्या नावातही 'इंडिया' आहे. विरोधक विखुरलेले आहेत. हताश आहेत. त्यांना आणखी बराच काळ सत्तेत येण्याची इच्छा नाही, असे त्यांचा दृष्टीकोन पाहता दिसते", अशा शब्दांत मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी १५ ऑगस्टला प्रत्येक घरावर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचीही माहिती दिली. या पावसाळी अधिवेशन काळातील ही संसदीय पक्षाची पहिलीच बैठक होती. ही बैठक संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये पार पडली. यावेळी गृह मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरमधील घटनेवरून गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावर पंतप्रधान मोदीनी बोलावे आणि संसदेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. तर, गृहमंत्री अमित शाह यांच्या उत्तराने सरकार अल्पकालीन चर्चेसाठी तयार आहे. मात्र या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी बोलावे, यावर विरोधक ठाम आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाManipur Violenceमणिपूर हिंसाचार