शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

"आम्हाला हवं ते बोला, पण...", पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला राहुल गांधींचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 15:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इंडिया'वरून विरोधकांवर टीका केल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इंडिया'वरून विरोधकांवर टीका केल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. "तुम्हाला हवं ते आम्हाला बोला मिस्टर मोदी पण आम्ही भारत आहोत", असे गांधींनी म्हटले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरमधील हिंसा आणि क्रूरता यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीवर सडकून टीका केली. या टीकेला आता राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिले आहे. 

राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "तुम्हाला हवं ते आम्हाला बोला मिस्टर मोदी पण आम्ही भारत आहोत. आम्ही मणिपूरमधील परिस्थिती ठिक करण्यासाठी मदत करू आणि प्रत्येक स्त्री आणि मुलाचे अश्रू पुसू. आम्ही तेथील सर्व लोकांसाठी प्रेम आणि शांती परत आणू. तसेच आम्ही मणिपूरमध्ये भारताच्या कल्पनेची पुनर्बांधणी करू."

मोदी काय म्हणाले?विरोधकांच्या 'इंडिया' या आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोचरी टीका केली. "केवळ 'इंडिया' नाव ठेवल्यानं काही होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीनेही 'इंडिया' लावले होते आणि इंडियन मुजाहिदीनच्या नावातही 'इंडिया' आहे. विरोधक विखुरलेले आहेत. हताश आहेत. त्यांना आणखी बराच काळ सत्तेत येण्याची इच्छा नाही, असे त्यांचा दृष्टीकोन पाहता दिसते", अशा शब्दांत मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी १५ ऑगस्टला प्रत्येक घरावर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचीही माहिती दिली. या पावसाळी अधिवेशन काळातील ही संसदीय पक्षाची पहिलीच बैठक होती. ही बैठक संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये पार पडली. यावेळी गृह मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरमधील घटनेवरून गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावर पंतप्रधान मोदीनी बोलावे आणि संसदेत सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. तर, गृहमंत्री अमित शाह यांच्या उत्तराने सरकार अल्पकालीन चर्चेसाठी तयार आहे. मात्र या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी बोलावे, यावर विरोधक ठाम आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाManipur Violenceमणिपूर हिंसाचार