शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

राजस्थानला प्राधान्य दिलेच नाही...राहुल गांधी यांचा तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेशकडे जादा कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 09:32 IST

राजस्थाननंतर तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तेलंगणात त्यांनी तीन दिवस प्रचार दौरा केला. 

- हरिश गुप्तानवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात काँग्रेस नेते राहुल गांधी सुमारे दोन महिन्यांपासून व्यग्र आहेत. राजस्थानमधील निवडणुका २५ नोव्हेंबर रोजी होत आहे. मात्र, ते राजस्थानऐवजी तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांत प्रचार दौरे करत आहेत. काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराची आपल्या मतदारसंघात राहुल गांधी यांची सभा व्हावी, अशी इच्छा आहे. राजस्थाननंतर तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तेलंगणात त्यांनी तीन दिवस प्रचार दौरा केला. 

राजस्थानमध्ये ते दौरा का करत नाहीत यावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला तर मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या दोन राज्यांत प्रचार संपताच राहुल गांधी १५ नोव्हेंबरनंतर राजस्थानमध्ये प्रचारासाठी जातील. राजस्थाननंतर तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला निवडणुका असून, राहुल गांधी तिथे तीन दिवसांच्या दौऱ्यावर गेले. त्यांनी असे का केले, याबद्दल काँग्रेसने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. प्रियांका गांधी यांची प्रकृती ठीक नसल्याने राहुल गांधी यांनी विविध प्रसंगी तेलंगणात आणखी तीन दिवस मुक्काम केला होता. राहुल गांधी पंजाबमधील सुवर्ण मंदिरात गेले होते. त्यात त्यांनी दोन दिवस व्यतित केले. उत्तराखंडमधील केदारनाथचेही त्यांनी दर्शन घेतले. या तीर्थक्षेत्राची यात्रा करण्यासाठी त्यांनी तीन दिवस राखून ठेवले होते.

अशोक गेहलोत यांच्यावर नाराज?

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर राहुल गांधी खूप नाराज असल्याचा दावा करण्यात आला. पक्षश्रेष्ठींचे आदेश गेहलोत यांनी डावलल्याच्या घटना घडल्या आहेत. विद्यमान २५ आमदारांना पुन्हा उमेदवारी देऊ नका, असे गेहलोत सांगत होते. पण, त्यांनी निष्ठावान असलेल्या व पराभूत होण्याची शक्यता असलेल्यांना पुन्हा तिकीट दिले. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव होणार असे राहुल गांधी यांचे मत आहे. त्यामुळे तिथे प्रचार करून शक्ती वाया घालविण्यापेक्षा त्यांनी अन्य राज्यांत प्रचाराला जाणे पसंत केले असावे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElectionनिवडणूक