शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

'त्या' मुलींना भेटलो आणि...; राहुल गांधींनी स्वेटर न वापरण्याचे सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 16:29 IST

१०० हून दिवसांपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात यात्रा सुरू आहे.

गेल्या १०० हून दिवसांपासून काँग्रेसचीभारत जोडो यात्रा सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात यात्रा सुरू आहे.  सध्या भारत जोडा यात्रा उत्तर प्रदेशमधून पुढे गेली आहे. दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये थंडीचे प्रमाण जास्त आहे, तरीही राहुल गांधी फक्त एका टी शर्टवरती आहेत. यावरुन चर्चा सुरू झाल्या आहेत. एवढ्या थंडीतही राहुल गांधी स्वेटर का वापरत नाहीत, यावरुन विरोधकांनी टीकाही केली. आज या संदर्भात स्वत: राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.   

एका मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी स्वेटर न वापरण्याचे कारण सांगितले आहे. 'मध्यप्रदेशमध्ये मी काही मुलींना भेटलो. या मुलींना भेटल्यानंतर मी भारत जोडो यात्रेत स्वेटर न वापरण्याचे ठरवले. यात्रेत फक्त टी शर्ट वापरण्याचे मी ठरवले, असंही राहुल गांधी म्हणाले. 

'मी केरळपासासून यात्रा सुरू केली. ज्यावेळी यात्रा सुरू केली तेव्हा गरमी होती. यात्रा मध्यप्रदेशमध्ये आली तेव्हा थंडी सुरू झाली. त्या  ठिकाणी मला एक दिवस तीन मुली भेटल्या, या मुलींना माझ्यासोबत फोटो काढायचा होता. त्यांचे फाटलेले कपडे होते, जेव्हा त्यांनी गळाभेट केली तेव्हा ते थंडीने कापत होते.तेव्हाच मी ठरवले, जोपर्यंत त्या मुलींना स्वेटर मिळत नाही तोपर्यंत मी स्वेटर वापरणार नाही, फक्त टी शर्ट वापरणार, असं राहुल गांधी म्हणाले. 

हो मी उपटसुंभ, पवार कुटुंब उपटून टाकणार; गोपीचंद पडळकरांचा अजित पवारांवर पलटवार

भारत जोडो यात्रेवरुन राहुल गांधी यांच्यावर भाजप नेत्यांनी टीका सुरु आहेत. या यात्रेची सुरुवात कन्याकुमारीपासून झाली, पुढ ही यात्रा कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आता ही यात्रा उत्तर प्रदेशमधून पंजाबकडे पोहोचली आहे.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा