शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'केंद्रात भाजपचा पराभव करायचा असेल तर केसीआर...', राहुल गांधींनी तेलंगणात साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 18:48 IST

बीआरएस, भारतीय जनता पक्ष आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम एकत्र काम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी आज केला.

दिल्लीत नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर तेलंगणात के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्रीय समितीचा पराभव करणे आवश्यक आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केले. हैदराबादमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी बीआरएस, भारतीय जनता पार्टी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम एकत्र काम करत असल्याचा आरोप केला. केसीआर यांनी संसदेत मोदी सरकारचे समर्थन केले होते. केसीआर यांच्यावर काही खटला आहे का, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. 

अन्... आंतरराष्ट्रीय ख्यातीचा टनेल एक्स्पर्ट बाबा बौख नाग देवतेसमोर नतमस्तक झाला

राहुल गांधी म्हणाले की, ते सर्वात भ्रष्ट सरकार चालवतात. ईडी, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि प्राप्तिकर विभाग यांसारख्या केंद्रीय एजन्सी केसीआर यांच्या मागे का नाहीत, असा सवालही खासदार राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले की, ते पंतप्रधानांशी लढत असल्याने, त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या राज्यांमध्ये २४ खटले नोंदवले आहेत आणि न्यायालये त्यांना वेळोवेळी समन्स पाठवतात. मला पहिल्यांदाच बदनामीप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झाली. माझे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. माझे सरकारी घर हिसकावून घेतले. मी म्हणालो मला ते नको आहे. देशातील करोडो गरीब जनतेच्या हृदयात माझे घर आहे, असंही गांधी म्हणाले.

"मी आणि माझी बहीण तेलंगणासाठी दिल्लीत सैनिक आहोत, तुम्हाला काही हवे असेल तर मला आणि माझ्या बहिणीला आदेश द्या, आम्ही उपस्थित राहू. तेलंगणातील लोकांसाठी जे काही करता येईल ते आम्ही करू. कारण जेव्हा इंदिरा गांधीजींना गरज होती तेव्हा तेलंगणातील जनतेने त्यांना साथ दिली आणि मदत केली. हे आम्ही कधीच विसरू शकत नाही, असंही राहुल गांधी म्हणाले. 

ओवेसी यांच्यावरही टीका 

ईडी आणि सीबीआय सारख्या एजन्सी नेहमीच आपल्या मागे असतात असा दावा करत राहुल गांधी यांनी ओवेसी यांच्यामागे कोणती एजन्सी आहे का असा सवाल केला. "ओवेसी यांच्यावर एकही खटला का नाही, असा प्रश्न पडतो, आणि उत्तर म्हणजे एआयएमआयएमचे अध्यक्ष मोदींना मदत करतात. काँग्रेसला नुकसान पोहोचवण्यासाठी आणि भाजपला मदत करण्यासाठी एआयएमआयएम विविध राज्यात आपले उमेदवार उभे करत आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

टॅग्स :TelanganaतेलंगणाRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी