शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"...पण आम्हाला निमंत्रण मिळत नाही"; भारत जोडो न्याय यात्रेबाबत अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 11:45 IST

उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांना काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'मध्ये सहभागी होणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात जागावाटपावरून राजकारण तापलं आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी काँग्रेसला 11 जागा देण्याची घोषणा केली आहे. मात्र, काँग्रेसचे म्हणणे आहे की सध्या जागावाटपाबाबत कोणतीही अंतिम चर्चा झालेली नाही. याच दरम्यान, अखिलेश यांनी समाजवादी पक्षाच्या 16 उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांना काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'मध्ये सहभागी होणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अखिलेश म्हणाले की, "अनेक मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात, मात्र आम्हाला निमंत्रणही मिळत नाही. अडचण अशी आहे की, अनेक मोठ्या घटना घडतात. पण आम्हाला निमंत्रण मिळत नाही. मग आम्ही स्वतःहून निमंत्रण कसं मागायचं?"

सपा आणि रालोद यांच्यात काही दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीअंतर्गत जागांचे वाटप झाले होते. रालोद उत्तर प्रदेशमध्ये 7 जागा लढविणार आहे. काँग्रेस 11 आणि रालोद 7 अशा 18 जागा सपाने इंडिया आघाडीतील मित्रपक्षांना सोडल्या आहेत. उर्वरित जागांवर सपा लढणार आहे. म्हणजेच सपा 62 जागांवर निवडणूक लढणार आहे. 

काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये 23 जागा लढवायच्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये ममतांनी एकट्याने निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. यानंतर आपच्या मुख्यमंत्र्यांनी पंजाबमध्ये तसे संकेत दिले होते. बिहारमध्ये नितीश कुमारच भाजपासोबत जात असल्याने काँग्रेसवर मोठा दबाव आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखिलेश यादव यांच्या 11 जागा देण्याच्या प्रस्तावावर काँग्रेस प्रदेश नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी