शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

"...पण आम्हाला निमंत्रण मिळत नाही"; भारत जोडो न्याय यात्रेबाबत अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 11:45 IST

उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांना काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'मध्ये सहभागी होणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात जागावाटपावरून राजकारण तापलं आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी काँग्रेसला 11 जागा देण्याची घोषणा केली आहे. मात्र, काँग्रेसचे म्हणणे आहे की सध्या जागावाटपाबाबत कोणतीही अंतिम चर्चा झालेली नाही. याच दरम्यान, अखिलेश यांनी समाजवादी पक्षाच्या 16 उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांना काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'मध्ये सहभागी होणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अखिलेश म्हणाले की, "अनेक मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात, मात्र आम्हाला निमंत्रणही मिळत नाही. अडचण अशी आहे की, अनेक मोठ्या घटना घडतात. पण आम्हाला निमंत्रण मिळत नाही. मग आम्ही स्वतःहून निमंत्रण कसं मागायचं?"

सपा आणि रालोद यांच्यात काही दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीअंतर्गत जागांचे वाटप झाले होते. रालोद उत्तर प्रदेशमध्ये 7 जागा लढविणार आहे. काँग्रेस 11 आणि रालोद 7 अशा 18 जागा सपाने इंडिया आघाडीतील मित्रपक्षांना सोडल्या आहेत. उर्वरित जागांवर सपा लढणार आहे. म्हणजेच सपा 62 जागांवर निवडणूक लढणार आहे. 

काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये 23 जागा लढवायच्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये ममतांनी एकट्याने निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. यानंतर आपच्या मुख्यमंत्र्यांनी पंजाबमध्ये तसे संकेत दिले होते. बिहारमध्ये नितीश कुमारच भाजपासोबत जात असल्याने काँग्रेसवर मोठा दबाव आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखिलेश यादव यांच्या 11 जागा देण्याच्या प्रस्तावावर काँग्रेस प्रदेश नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी