शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मोदींनी जवान आणि किसान यांना एकमेकांविरोधात उभं केलं; राहुल गांधींचा हल्लाबोल

By मोरेश्वर येरम | Updated: November 28, 2020 11:02 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज एक फोटो ट्विट करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ठळक मुद्दे'जय जवान, जय किसान'चा नारा मोदी सरकार विसरलं, काँग्रेसचा हल्लामोदींनी जवान आणि किसान यांना एकमेकांविरोधात उभं केल्याचा राहुल यांची टीकापंजाब आणि हरियाणातील शेतकरी करत आहेत दिल्लीकडे कूच

नवी दिल्लीराजधानी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्लीच्या वेशीवर गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट सुरू आहे. केंद्राच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'दिल्ली चलो' आंदोलनाला बळाच्या जोरावर थोपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज एक फोटो ट्विट करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. फोटोत एक जवान शेतकऱ्यावर लाठीचार्ज करतानाचा हा फोटो अतिशय दुर्दैवी फोटो असल्याचं राहुल यांनी म्हटलंय. ''आपण आजवर जय जवान, जय किसान असा नारा ऐकत आलो आहोत. पण आज पंतप्रधान मोदींच्या अहंकाराने जवान आणि किसान एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. हे खूप धोकादायक आहे'', असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर कालपासून शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट सुरू आहे. पोलिसांकडून आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पाण्याचा फवारा आणि अश्रू धुराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आला. या सगळ्याला न जुमानता शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच असून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. 

...ही तर फक्त सुरुवात, शेतकऱ्यांना कुणीच रोखू शकत नाही: राहुल गांधी

दरम्यान, राहुल यांनी शुक्रवारीही एक ट्विट करुन शेतकऱ्यांना पाठिंबा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला होता. अहंकार कधीच सत्यावर मात करू शकत नाही हे मोदींनी लक्षात ठेवायला हवं. सत्याचा लढा देणाऱ्या शेतकऱ्यांना जगातील कोणतंच सरकार रोखू शकत नाही. मोदींना काळे कायदे मागे घ्यावेच लागतील आणि ही तर फक्त सुरुवात आहे, असं ट्विट राहुल यांनी केलं होतं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmer strikeशेतकरी संपcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी