शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 17:57 IST

मंगळवारी सरकारने लोकसभेत एक विधेयक सादर केले, ज्यात मनरेगाचे नाव बदलून 'विकसित भारत-जी राम जी योजना' असे करण्याचा प्रस्ताव आहे. यावर काँग्रेस आक्रमक झाली असून, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

काँग्रसचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या 'मनरेगा' (MNREGA) योजनेचे नाव बदलण्याच्या प्रस्तावावर जोरदार टीका केली आहे. मंगळवारी सरकारने लोकसभेत एक विधेयक सादर केले, ज्यात मनरेगाचे नाव बदलून 'विकसित भारत-जी राम जी योजना' असे करण्याचा प्रस्ताव आहे. यावर काँग्रेस आक्रमक झाली असून, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट करत राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार आहे एक म्हणजे, 'गांधींचे विचार आणि दुसरे म्हणजे, गरिबांचा हक्क'.

मनरेगा म्हणजे गांधींच्या 'ग्राम-स्वराज'चे स्वप्न -राहुल गांधी म्हणाले, मनरेगा योजना ही महात्मा गांधींच्या 'ग्राम-स्वराज'च्या स्वप्नाचा जिवंत आविष्कार आहे. कोट्यवधी ग्रामीण लोकांच्या जीवनाचा आधार असलेली ही योजना कोविड काळात त्यांचे आर्थिक सुरक्षा कवच सिद्ध झाली. मात्र, पंतप्रधान मोदींना ही योजना नेहमीच खुपत राहिली आहे आणि गेल्या दहा वर्षांपासून ते ती कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ते मनरेगाचे नामोनिशान मिटवत आहेत. 

मनरेगाचा आधार, रोजगाराचा हक्क, जो काम मागेल त्याला काम मिळेल, गावाला विकासाचे काम स्वतः ठरवण्याचे स्वातंत्र्य आणि केंद्र सरकार मजुरीचा पूर्ण खर्च आणि साहित्याच्या खर्चाचा ७५% भार उचलेल, अशा तीन मूलभूत विचारांवर होता,

राहुल गांधी पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी याच मनरेगा योजनेत बदल करून सर्व शक्ती केवळ आपल्या हातात केंद्रित करू इच्छित आहेत. आता बजेट, योजना आणि नियम केंद्र सरकार ठरवेल, तर राज्यांना ४०% खर्च उचलण्यास भाग पाडले जाईल. एवढेच नाही तर, बजेट संपल्यावर किंवा पीक काढणीच्या हंगामात दोन महिने कोणालाही काम मिळणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. एवढेच नाही तर, हे नवीन विधेयक महात्मा गांधींच्या आदर्शांचा अपमान असून या विधेयकाचा विरोध गावातील गल्ल्यांपासून संसदेपर्यंत विरोध केला जाईल, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Modi despises Gandhi's ideology and the rights of the poor: Rahul

Web Summary : Rahul Gandhi criticizes Modi's government's plan to rename MNREGA, accusing Modi of disliking Gandhi's ideals and the poor's rights. He claims Modi weakens MNREGA, a vital rural employment scheme, by centralizing power and burdening states with costs, ultimately betraying Gandhian principles.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी