शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

पुलवामा हल्ला: गुप्त माहितीकडे मोदींनी दुर्लक्ष का केले?; राहुल गांधी

By देवेश फडके | Updated: February 16, 2021 12:59 IST

पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे उलटून गेली. यानिमित्ताने विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देपुलवामा हल्ल्यावरून राहुल गांधीचे टीकास्त्रगुप्त माहितीकडे दुर्लक्ष केल्याचा दावाट्विट करत केली मोदी सरकारवर जोरदार टीका

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे उलटून गेली. यानिमित्ताने विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. (congress leader rahul gandhi asked why were actionable intelligence inputs ignored)

राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान मोदी चित्रीकरण करण्यात व्यस्त होते. पुलवामा येथे आपल्या जवानांना मरण्यासाठी सोडून दिले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते पुढे म्हणाले की, पुलवामा येथे हल्ला होणार याची गुप्त माहिती आधीच मिळाली होती. असे असतानाही पंतप्रधान मोदींनी त्याकडे दुर्लक्ष केले. गुप्त माहितीवर वेळीच कारवाई करायला हवी होती, त्याकडे डोळेझाक का करण्यात आले, अशी विचारणा राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे. 

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनातही काँग्रेसने संरक्षण बजेटवरून मोदी सरकारची जोरदार टीका केली होती. भारतीय सैन्य दोन आघाड्यांवर लढत आहे. एकीकडे पाकिस्तान, तर दुसरीकडे चीनचे मोठे आव्हान देशासमोर आहे. अशा परिस्थितीत संरक्षण बजेट कमी करून मोदी सरकारने जवानांचे मनोधैर्य कमकुवत केले आहे, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आली. 

नाझींनी जर्मनीत केले, तेच RSS करतेय; राम मंदिर देणगीवरून कुमारस्वामींची टीका

दरम्यान, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलावामा येथे CRPF जवानांच्या एका तुकडीवर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये ४० जवानांना हौतात्म्य आले होते, तर अनेक जण जखमी झाले होते. याच दिवशी पंतप्रधान मोदी डिस्कव्हरी वाहिनीसाठी बियर ग्रिल्स यांच्यासोबत भारतीय जंगलात चित्रिकरण करत होते. यावरूनही विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली होती. 

टॅग्स :Politicsराजकारणpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी