शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

राहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय?; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 20:55 IST

राहुल गांधी आणि संजय राऊत यांची काही दिवसांपूर्वी दिल्लीत भेट झाली होती

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची काही दिवसांपूर्वी दिल्लीत भेट झाली. राज्यासह देशात या भेटीची चर्चा झाली. या भेटीनंतर राहुल आणि राऊत यांच्या एका फोटोचीदेखील सर्वत्र चर्चा होती. त्यात राहुल यांनी राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवला होता. राऊत राहुल यांना काहीतरी सांगत असल्याचं त्या फोटोतून दिसत होतं. राहुल यांच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दल राऊत यांनी पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केलं आहे.

दिल्लीत झालेल्या भेटीवेळी राहुल यांनी मला एका वाक्यात शिवसेना म्हणजे काय, असं विचारलं. त्यावर फटे लेकीन हटे नहीं, हे शिवसेनेचं धोरण असल्याचं मी राहुल यांना सांगितलं, असं राऊत म्हणाले. 'काही दिवसांपूर्वी माझी आणि राहुल गांधींची दिल्लीत भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला शिवसेनेच्या रचनेविषयी, कार्यपद्धतीबद्दल विचारलं. त्यावर आम्ही एकदा रस्त्यावर उतरलो की विचार करत नाही. फटे लेकीन हटे नहीं असं असतं आमचं. आम्ही कोणाच्या पाठीत वार करत नाही, असं मी राहुल गांधींनी सांगितलं,' असं राऊत म्हणाले.आणखी एका मुख्यमंत्र्याला नारळ? थेट मोदींनी दिल्लीत बोलावलं; तासभर झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं?

शिवसेना असंख्य वार आणि घाव झेलून इथपर्यंत आली आहे. शिवसेना त्यागातून, संघर्षातून वर आलेली आहे. आतापर्यंत केलेल्या आंदोलनांच्या पुण्याईवरच शिवसेना आज उभी आहे, असं राऊत यांनी म्हटलं. शिवसेनेचा प्रचार देशभर व्हावा हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. आज राज्याचे मुख्यमंत्री देशात पहिल्या पाचात आहेत. पण शिवसेनेला राज्यात क्रमांक एकचा पक्ष करणं हेच आमचं ध्येय आहे. विधानसभेच्या १५० जागा जिंकून कोणाच्याही कुबड्यांशिवाय सरकार स्थापन करायचं आहे. काहीच नसलेल्या भाजपला १०५ जागा मिळतात. आता स्वबळावर सत्ता हवी असल्यास शिवसेनेला १५० जागा जागा हव्यात, असं राऊतांनी सांगितलं.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना