शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

"न्याय सोडून हा सगळा रानटीपणा..."; भाजपशासित राज्यांमधील बुलडोझर कारवाईवरुन प्रियांका गांधी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 17:23 IST

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपशासिक राज्यांमधील बुलडोझर कारवाईबाबत आक्षेप नोंदवला आहे.

Priyanka Gandhi on Bulldozer Action : मध्य प्रदेशातील छतरपूर हिंसाचारानंतर प्रशासनाने मुख्य आरोपी शेहजाद अलीच्या १० कोटी रुपयांच्या बेकायदेशीर घरावर बुलडोझर चालवला. या बुलडोझर कारवाईनंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेत्या आणि सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी देशातील अनेक राज्यांमध्ये बुलडोझरची कारवाई अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारची कारवाई थांबविण्याची मागणीही प्रियांका गांधी यांनी केली आहे. प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये बुलडोझर कारवाईबाबत आक्षेप नोंदवला आहे.

मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये झालेल्या बुलडोझरच्या कारवाईवरून राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपशासित राज्यांमध्ये गुन्हेगारांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याच्या कारवाईबाबत काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी शनिवारी न्यायासाठी बुलडोझरचा वापर पूर्णपणे अस्वीकार्य आहे, तो थांबला पाहिजे, असं म्हटलं आहे. वास्तविक, मध्यप्रदेशच्या छतरपूरमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात आरोपी असलेल्या व्यक्तीचे घर पाडण्यात आले. ज्याबाबत काँग्रेसने सवाल विचारला आहे.

"एखाद्यावर कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असल्यास, केवळ न्यायालयच त्याचा गुन्हा आणि त्याची शिक्षा ठरवू शकते. पण आरोप होताच आरोपीच्या कुटुंबीयांना शिक्षा करणे, डोक्यावरील छप्पर काढून घेणे, कायदा न पाळणे, न्यायालयाचा अवमान करणे, आरोप होताच आरोपीचे घर पाडणे. हा सगळा न्याय नाही. ही रानटीपणाची आणि अन्यायाची भूमिका आहे. कायदा बनवणारा, कायदा पाळणारा आणि कायदा मोडणारा यात फरक असला पाहिजे. सरकार गुन्हेगारांसारखे वागू शकत नाही. कायदा, संविधान, लोकशाही आणि मानवता यांचे पालन ही सुसंस्कृत समाजात राज्यकारभाराची किमान अट असते. जो राजधर्माचे पालन करू शकत नाही तो समाजाचे किंवा देशाचे भले करू शकत नाही. बुलडोझर न्याय पूर्णपणे अस्वीकार्य आहे, तो थांबला पाहिजे," असं प्रियांका गांधी वाड्रा यांनी म्हटलं आहे.

तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपशासित राज्यांवर निशाणा साधला. "एखाद्याचे घर पाडणे आणि त्याच्या कुटुंबाला बेघर करणे हे दोन्ही अमानवीय आणि अन्यायकारक आहे. भाजपशासित राज्यांमध्ये अल्पसंख्याकांना वारंवार लक्ष्य करणे अत्यंत त्रासदायक आहे. कायद्याचे राज्य असलेल्या समाजात अशा कारवायांना थारा नाही," असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा