शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

"न्याय सोडून हा सगळा रानटीपणा..."; भाजपशासित राज्यांमधील बुलडोझर कारवाईवरुन प्रियांका गांधी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 17:23 IST

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपशासिक राज्यांमधील बुलडोझर कारवाईबाबत आक्षेप नोंदवला आहे.

Priyanka Gandhi on Bulldozer Action : मध्य प्रदेशातील छतरपूर हिंसाचारानंतर प्रशासनाने मुख्य आरोपी शेहजाद अलीच्या १० कोटी रुपयांच्या बेकायदेशीर घरावर बुलडोझर चालवला. या बुलडोझर कारवाईनंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेत्या आणि सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी देशातील अनेक राज्यांमध्ये बुलडोझरची कारवाई अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारची कारवाई थांबविण्याची मागणीही प्रियांका गांधी यांनी केली आहे. प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये बुलडोझर कारवाईबाबत आक्षेप नोंदवला आहे.

मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये झालेल्या बुलडोझरच्या कारवाईवरून राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपशासित राज्यांमध्ये गुन्हेगारांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याच्या कारवाईबाबत काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी शनिवारी न्यायासाठी बुलडोझरचा वापर पूर्णपणे अस्वीकार्य आहे, तो थांबला पाहिजे, असं म्हटलं आहे. वास्तविक, मध्यप्रदेशच्या छतरपूरमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात आरोपी असलेल्या व्यक्तीचे घर पाडण्यात आले. ज्याबाबत काँग्रेसने सवाल विचारला आहे.

"एखाद्यावर कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असल्यास, केवळ न्यायालयच त्याचा गुन्हा आणि त्याची शिक्षा ठरवू शकते. पण आरोप होताच आरोपीच्या कुटुंबीयांना शिक्षा करणे, डोक्यावरील छप्पर काढून घेणे, कायदा न पाळणे, न्यायालयाचा अवमान करणे, आरोप होताच आरोपीचे घर पाडणे. हा सगळा न्याय नाही. ही रानटीपणाची आणि अन्यायाची भूमिका आहे. कायदा बनवणारा, कायदा पाळणारा आणि कायदा मोडणारा यात फरक असला पाहिजे. सरकार गुन्हेगारांसारखे वागू शकत नाही. कायदा, संविधान, लोकशाही आणि मानवता यांचे पालन ही सुसंस्कृत समाजात राज्यकारभाराची किमान अट असते. जो राजधर्माचे पालन करू शकत नाही तो समाजाचे किंवा देशाचे भले करू शकत नाही. बुलडोझर न्याय पूर्णपणे अस्वीकार्य आहे, तो थांबला पाहिजे," असं प्रियांका गांधी वाड्रा यांनी म्हटलं आहे.

तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपशासित राज्यांवर निशाणा साधला. "एखाद्याचे घर पाडणे आणि त्याच्या कुटुंबाला बेघर करणे हे दोन्ही अमानवीय आणि अन्यायकारक आहे. भाजपशासित राज्यांमध्ये अल्पसंख्याकांना वारंवार लक्ष्य करणे अत्यंत त्रासदायक आहे. कायद्याचे राज्य असलेल्या समाजात अशा कारवायांना थारा नाही," असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा