शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
5
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
6
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
7
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
8
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
9
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
10
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
11
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
12
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
13
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
14
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
15
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
16
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
17
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
18
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
19
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
20
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

"न्याय सोडून हा सगळा रानटीपणा..."; भाजपशासित राज्यांमधील बुलडोझर कारवाईवरुन प्रियांका गांधी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 17:23 IST

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपशासिक राज्यांमधील बुलडोझर कारवाईबाबत आक्षेप नोंदवला आहे.

Priyanka Gandhi on Bulldozer Action : मध्य प्रदेशातील छतरपूर हिंसाचारानंतर प्रशासनाने मुख्य आरोपी शेहजाद अलीच्या १० कोटी रुपयांच्या बेकायदेशीर घरावर बुलडोझर चालवला. या बुलडोझर कारवाईनंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेत्या आणि सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी देशातील अनेक राज्यांमध्ये बुलडोझरची कारवाई अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारची कारवाई थांबविण्याची मागणीही प्रियांका गांधी यांनी केली आहे. प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये बुलडोझर कारवाईबाबत आक्षेप नोंदवला आहे.

मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये झालेल्या बुलडोझरच्या कारवाईवरून राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपशासित राज्यांमध्ये गुन्हेगारांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याच्या कारवाईबाबत काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी शनिवारी न्यायासाठी बुलडोझरचा वापर पूर्णपणे अस्वीकार्य आहे, तो थांबला पाहिजे, असं म्हटलं आहे. वास्तविक, मध्यप्रदेशच्या छतरपूरमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात आरोपी असलेल्या व्यक्तीचे घर पाडण्यात आले. ज्याबाबत काँग्रेसने सवाल विचारला आहे.

"एखाद्यावर कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असल्यास, केवळ न्यायालयच त्याचा गुन्हा आणि त्याची शिक्षा ठरवू शकते. पण आरोप होताच आरोपीच्या कुटुंबीयांना शिक्षा करणे, डोक्यावरील छप्पर काढून घेणे, कायदा न पाळणे, न्यायालयाचा अवमान करणे, आरोप होताच आरोपीचे घर पाडणे. हा सगळा न्याय नाही. ही रानटीपणाची आणि अन्यायाची भूमिका आहे. कायदा बनवणारा, कायदा पाळणारा आणि कायदा मोडणारा यात फरक असला पाहिजे. सरकार गुन्हेगारांसारखे वागू शकत नाही. कायदा, संविधान, लोकशाही आणि मानवता यांचे पालन ही सुसंस्कृत समाजात राज्यकारभाराची किमान अट असते. जो राजधर्माचे पालन करू शकत नाही तो समाजाचे किंवा देशाचे भले करू शकत नाही. बुलडोझर न्याय पूर्णपणे अस्वीकार्य आहे, तो थांबला पाहिजे," असं प्रियांका गांधी वाड्रा यांनी म्हटलं आहे.

तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपशासित राज्यांवर निशाणा साधला. "एखाद्याचे घर पाडणे आणि त्याच्या कुटुंबाला बेघर करणे हे दोन्ही अमानवीय आणि अन्यायकारक आहे. भाजपशासित राज्यांमध्ये अल्पसंख्याकांना वारंवार लक्ष्य करणे अत्यंत त्रासदायक आहे. कायद्याचे राज्य असलेल्या समाजात अशा कारवायांना थारा नाही," असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा