शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

भारतीय नागरिक भोळे भाबडे, सरकारच्या दाव्यांवर लगेच विश्वास ठेवतात: चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 15:54 IST

सरकार विविध योजना जाहीर करून त्याचा गाजावाजा करत असते, आणि देशातील लोकं ही त्यावर विश्वास ठेवतात. प्रत्यक्षात मात्र या योजनांची अमलबजावणीचं होत नाही.

नवी दिल्ली : भारतातील लोकं कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास करतात. आपल्या देशातील लोकांमध्ये असेलला भोळेपणा मी आतापर्यंत कुठेच पाहिला नसल्याचे काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम म्हणाले. सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या योजनेच्या अमलबजावणीबाबतच्या दाव्यांवर ते लगेच विश्वास ठेवतात असेही चिदंबरम म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देशातील प्रत्येक गावात वीज पोहचली असल्याचा दावा केंद्रसरकाने केला आहे. तर भारतातील 99 टक्के कुटंब शौचालययाचं वापर करत असल्याचे सुद्धा सरकार सांगत आहे. लोकांनीही ह्या गोष्टींवर विश्वास ठेवला. असाच काही प्रकार आयुष्मान भारत योजनाबाबतीत घडत आहे.

माझ्या गाडीच्या ड्रायव्हरच्या वडिलांच्या सर्जरीसाठी प्रयत्न करूनही आयुष्मान भारत योजनेचा फायदा त्याला मिळाला नसल्याचे उदाहरण चिदंबरम यांनी दिले. जेव्हा त्याने हॉस्पिटलमध्ये या योजनाबद्दल माहिती घेतली तर, अशी काही योजना नसल्याचे त्याला सांगण्यात आले. परंतु आमचा अजूनही विश्वास आहे की संपूर्ण देशात आयुष्मान भारत योजना लागू झाली आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नसल्याचे चिदंबरम म्हणाले.

सरकार विविध योजना जाहीर करून त्याचा गाजावाजा करत असते, आणि देशातील लोकं ही त्यावर विश्वास ठेवतात. प्रत्यक्षात मात्र या योजनांची अमलबजावणीचं होत नाही. मात्र तरीही लोकं सरकारच्या केल्या जाणाऱ्या दाव्यांवर विश्वास ठेवतात. त्यामुळे भारतातील लोकं खूप भोळे भाबडे असल्याचे चिदंबरम म्हणाले.