शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

भारतीय नागरिक भोळे भाबडे, सरकारच्या दाव्यांवर लगेच विश्वास ठेवतात: चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 15:54 IST

सरकार विविध योजना जाहीर करून त्याचा गाजावाजा करत असते, आणि देशातील लोकं ही त्यावर विश्वास ठेवतात. प्रत्यक्षात मात्र या योजनांची अमलबजावणीचं होत नाही.

नवी दिल्ली : भारतातील लोकं कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास करतात. आपल्या देशातील लोकांमध्ये असेलला भोळेपणा मी आतापर्यंत कुठेच पाहिला नसल्याचे काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम म्हणाले. सरकारकडून जाहीर करण्यात येणाऱ्या योजनेच्या अमलबजावणीबाबतच्या दाव्यांवर ते लगेच विश्वास ठेवतात असेही चिदंबरम म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, देशातील प्रत्येक गावात वीज पोहचली असल्याचा दावा केंद्रसरकाने केला आहे. तर भारतातील 99 टक्के कुटंब शौचालययाचं वापर करत असल्याचे सुद्धा सरकार सांगत आहे. लोकांनीही ह्या गोष्टींवर विश्वास ठेवला. असाच काही प्रकार आयुष्मान भारत योजनाबाबतीत घडत आहे.

माझ्या गाडीच्या ड्रायव्हरच्या वडिलांच्या सर्जरीसाठी प्रयत्न करूनही आयुष्मान भारत योजनेचा फायदा त्याला मिळाला नसल्याचे उदाहरण चिदंबरम यांनी दिले. जेव्हा त्याने हॉस्पिटलमध्ये या योजनाबद्दल माहिती घेतली तर, अशी काही योजना नसल्याचे त्याला सांगण्यात आले. परंतु आमचा अजूनही विश्वास आहे की संपूर्ण देशात आयुष्मान भारत योजना लागू झाली आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नसल्याचे चिदंबरम म्हणाले.

सरकार विविध योजना जाहीर करून त्याचा गाजावाजा करत असते, आणि देशातील लोकं ही त्यावर विश्वास ठेवतात. प्रत्यक्षात मात्र या योजनांची अमलबजावणीचं होत नाही. मात्र तरीही लोकं सरकारच्या केल्या जाणाऱ्या दाव्यांवर विश्वास ठेवतात. त्यामुळे भारतातील लोकं खूप भोळे भाबडे असल्याचे चिदंबरम म्हणाले.