शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षापासून काँग्रेसला अध्यक्ष नाही, अशी कुठली पार्टी चालते का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा घरचा आहेर

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 22, 2020 17:08 IST

"राहुल गांधी यांनी, आपल्याला पक्षाध्यक्ष राहण्याची इच्छा नाही, असे म्हटल्यापासून ते आतापर्यंत काँग्रेसला अध्यक्ष नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही माहीत नाही, की त्यांना भविष्यात नेमके काय करायचे आहे?"

नवी दिल्ली -काँग्रेसमध्ये सक्रीय नेतृत्वावरून सुरू असलेला कलह थांबण्याचे नाव नाही. पक्षाचे खासदार तथा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून असहमती दर्शवणाऱ्या 23 नेत्यांपैकी एक असलेले कपिल सिब्बल (Congress leader kapil sibal) यांनी पुन्हा एकदा या मुद्यावर भाष्य केले आहे. काँग्रेस आता प्रभावशाली विरोधी पक्ष राहिला नाही. दीड वर्षांपासून पक्षाला अध्यक्ष नाही. अशी कुठली पार्टी चालते का? असा प्रश्न  सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.

इंग्रजी वृत्त वाहिनी ‘India Today’ला दिलेल्या मुलाखतीत, पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याशी बोलताना सिब्बल म्हणाले, राहुल गांधी यांनी, आपल्याला पक्षाध्यक्ष राहण्याची इच्छा नाही, असे म्हटल्यापासून ते आतापर्यंत काँग्रेसला अध्यक्ष नाही. या गोष्टीला साधारणपणे दीड वर्ष झाले आहे. एखादा पक्ष दीड वर्ष नेत्याशिवाय चालू शकतो? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही माहीत नाही, की त्यांना भविष्यात नेमके काय करायचे आहे अथवा कुठे जायचे आहे.

सिब्बल म्हणाले, नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून समजते, की उत्तर प्रदेश शिवाय, जेथे काँग्रेस फॅक्टर नाव्हता, एवढेच काय, पण गुजरात आणि मध्य प्रदेशातही जेथे काँग्रेसची भाजपसोबत थेट लढत होती, निकाल अत्यंत खराब राहिला.

“गुजरातमध्ये आमचा सर्वच्या सर्व आठही जागांवर पराभव झाला. 65 टक्के मते भाजपच्या खात्यात गेले. मात्र, ही काँग्रेसमधील पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनी रिक्त केलेल्या जागा होत्या. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या पक्ष बदलणाऱ्या नेत्यांमुळे सर्व 28 जागा रिक्त झाल्या होत्या. पण काँग्रेसला यैंपैकी केवळ आठ जागाच जिंकता आल्या,” असे सिब्बल म्हणाले.

जुलै महिन्यात झालेल्या पक्षाच्या संसदीय गटाच्या बैठकीत हे मुद्दे उपस्थित केले होते. यानंतर 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना ऑगस्ट महिन्यात पत्रही लिहिले. मात्र, त्यावर कसल्याही प्रकारची ना चर्चा झाली, ना हा मुद्दा घेऊन कुणी पुढे गेले, असेही सिब्बल म्हणाले. नुकताच, सिब्बल यांच्यावर काही मंडळींनी निशाणा साधला असतानाच, त्यांनी हे वक्तव्य केले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तर, पक्षांतर्गत समस्या त्यांनी माध्यमांत बोलू नये, असे म्हटले होते. 

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेसIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी