शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
2
Thane Municipal Corporation Election 2026 : ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचा तिसरा नगरसेवक बिनविरोध विजयी
3
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
4
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
5
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
6
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
7
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणे; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
8
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
9
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
10
पक्षासाठी उतरलो रस्त्यावरी, तरीही बसविले घरी, आयातानाच दिली उमेदवारी
11
जय श्रीराम! अयोध्येत महासागर, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ४ लाख भाविकांनी घेतले रामलला दर्शन
12
वंचित, एमआयएमने काँग्रेसची वाट केली 'बिकट'! महापालिका निवडणुकीत आमदाराचा लागणार 'कस'
13
व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका! नोव्हेंबरमध्ये १० लाखांहून अधिक ग्राहकांनी सोडली साथ...
14
काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, शिवसेना शिंदे गटात प्रवेश
15
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही
16
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
17
Virat Kohli जगातील सर्वात हँडसम क्रिकेटर, त्याचा लूक...; युवा Vaishnavi Sharma किंगवर फिदा
18
समुद्राची गाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट! नवीन वर्षात भारताच्या 'या' ५ हिडन समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या
19
MCX च्या शेअरमध्ये ८० टक्क्यांची घसरण? घाबरू नका, गुंतवणूकदारांसाठी आहे का मोठी संधी?
20
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसमुळे तुम्हाला अधिकार, संविधान नसते तर तुम्ही..."; डीके शिवकुमार यांचा PM मोदींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:44 IST

संसदेतल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेला काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

DK Shivakumar slams PM Modi Speech: लोकसभेतील संविधानावरील दोन दिवसीय चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने दुरुस्त्या करून संविधानाला वारंवार घायाळ केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावरुन आता काँग्रेसकडून टीका केली जात आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी रविवारी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस पक्षामुळेच पंतप्रधान मोदींना सर्व अधिकार मिळाले आहेत. संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पदावर असल्याचे डीके शिवकुमार यांनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर बोचरी टीका करत हा जुना पक्ष भारतीय संविधानाचाच नव्हे तर स्वतःच्या अंतर्गत लोकशाही प्रक्रियेचाही अनादर करत असल्याचा आरोप केला होता. संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चेत भाग घेतला होता. काँग्रेसने जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष म्हणून पक्षात घेण्यासाठी पक्षातील लोकशाही भावना बाजूला ठेवल्या होता असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता.

पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेवर काँग्रेस नेते आणि  कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भाष्य केलं आहे. "पंतप्रधानांना हे माहित असले पाहिजे की काँग्रेसनेच त्यांना संविधानासह, राष्ट्रध्वजासह, राष्ट्रगीत आणि स्वातंत्र्यासह सर्व अधिकार दिले आहेत. त्यामुळेच त्यांना स्वातंत्र्य मिळवून देऊन लोकशाही दिली असताना आता ते या देशाचे पंतप्रधान आहेत. संविधान नसते तर ते या देशाचे पंतप्रधान होऊ शकले नसते," असं डीके शिवकुमार म्हणाले. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या ११ आश्वासनांवर बोलताना शिवकुमार यांनी "बघू या. या देशासाठी चांगल्याची आशा करूया," असं म्हटलं.

संविधानाचा अनादर केल्याचा आरोप करत मोदींनी शनिवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी अकरा आश्वासनं दिली होती. "सरकारने आणि लोकांनी त्यांचे कर्तव्य बजावले पाहिजे आणि देशाचे राजकारण परिवारवाद पासून मुक्त झाले पाहिजे. आणीबाणीत देश तुरुंगात बदलला होता. नागरिकांचे हक्क हिरावले गेले आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर अंकुश ठेवला गेला होता. १९४७ ते १९५२ पर्यंत, भारतात कोणतेही निवडून आलेले सरकार नव्हते. परंतु एक सरकार होते ज्यामध्ये कोणत्याही निवडणुका झालेल्या नव्हत्या.१९५२ पूर्वी, राज्यसभेची स्थापना झाली नव्हती आणि कोणत्याही राज्याच्या निवडणुका झाल्या नाहीत, म्हणजे लोकांचा जनादेश नव्हता," अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसParliamentसंसद