शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 21:23 IST

या औषध कंपन्यांनी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून एकूण ९४५ कोटी रूपये भाजपाला देणगी दिली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला.

भोपाळ - मध्य प्रदेशात ज्या कफ सिरपमुळे २६ मुलांचा जीव गेला. त्यावरून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी भाजपा सरकारवर मोठा हल्लाबोल केला आहे. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या औषध कंपनीवर सरकारने यासाठीच कारवाई केली नाही कारण या कंपन्यांकडून भाजपाला निवडणुकीत देणगी दिली जाते. या औषध कंपन्यांनी भाजपाला ९४५ कोटी देणगी दिली होती असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

भोपाळमध्ये पत्रकार परिषद घेत दिग्विजय सिंह यांनी म्हटलं की, २ सप्टेंबरपासून आतापर्यंत २६ मुलांचा जीव कफ सिरप घेतल्याने गेला आहे. ज्यात डायएथलीन ग्लाइकॉलचं प्रमाण ४८.६ टक्के होते. याचे सुरक्षित प्रमाण ०.०१ टक्के इतके असायला हवे. आता तपासात जर सिरपमध्ये विषारी रसायन मिसळल्याचे सिद्ध झाले असेल तर आरोग्य मंत्र्‍यांनी त्यांच्या पदावर का राहायला हवे? ज्या औषध कंपन्यांनी विषारी औषध विकले, त्यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपाला निवडणुकीत फंड दिला आहे. त्यामुळे त्यांना कारवाईपासून संरक्षण मिळत आहे. या औषध कंपन्यांनी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून एकूण ९४५ कोटी रूपये भाजपाला देणगी दिली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला.

इतकेच नाही तर ज्या कंपन्यांकडून भाजपाला निवडणुकीत फंड मिळाला, त्यातील ३५ कंपन्या औषधांच्या गुणवत्तेच्या मानकांमध्ये पात्र नाहीत. लोकांचा जीव आणि सुरक्षेशी खेळले जात आहे. सत्तेचे संरक्षण मिळल्याने कुणीही या घटनेची जबाबदारी घ्यायला येत नाही. मुलांचा जीव घेणाऱ्या दोषी कंपन्यांवर आणि त्या विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केंद्र आणि राज्याकडे केली आहे.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे अनेक मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य प्रदेशात औषधी लिहून देणाऱ्या 3 डॉक्टरांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीचा मालक गोविंदनाथन रंगनाथन याला अखेर विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली. मात्र या प्रकरणावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Cough syrup deaths: Company donated ₹945 crore to BJP, alleges Singh.

Web Summary : Digvijay Singh alleges cough syrup company linked to 26 child deaths donated ₹945 crore to BJP via electoral bonds. He questions government inaction and demands accountability for substandard drugs, citing a deadly chemical imbalance in the syrup.
टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहBJPभाजपा