शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 21:23 IST

या औषध कंपन्यांनी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून एकूण ९४५ कोटी रूपये भाजपाला देणगी दिली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला.

भोपाळ - मध्य प्रदेशात ज्या कफ सिरपमुळे २६ मुलांचा जीव गेला. त्यावरून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी भाजपा सरकारवर मोठा हल्लाबोल केला आहे. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या औषध कंपनीवर सरकारने यासाठीच कारवाई केली नाही कारण या कंपन्यांकडून भाजपाला निवडणुकीत देणगी दिली जाते. या औषध कंपन्यांनी भाजपाला ९४५ कोटी देणगी दिली होती असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

भोपाळमध्ये पत्रकार परिषद घेत दिग्विजय सिंह यांनी म्हटलं की, २ सप्टेंबरपासून आतापर्यंत २६ मुलांचा जीव कफ सिरप घेतल्याने गेला आहे. ज्यात डायएथलीन ग्लाइकॉलचं प्रमाण ४८.६ टक्के होते. याचे सुरक्षित प्रमाण ०.०१ टक्के इतके असायला हवे. आता तपासात जर सिरपमध्ये विषारी रसायन मिसळल्याचे सिद्ध झाले असेल तर आरोग्य मंत्र्‍यांनी त्यांच्या पदावर का राहायला हवे? ज्या औषध कंपन्यांनी विषारी औषध विकले, त्यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपाला निवडणुकीत फंड दिला आहे. त्यामुळे त्यांना कारवाईपासून संरक्षण मिळत आहे. या औषध कंपन्यांनी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून एकूण ९४५ कोटी रूपये भाजपाला देणगी दिली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला.

इतकेच नाही तर ज्या कंपन्यांकडून भाजपाला निवडणुकीत फंड मिळाला, त्यातील ३५ कंपन्या औषधांच्या गुणवत्तेच्या मानकांमध्ये पात्र नाहीत. लोकांचा जीव आणि सुरक्षेशी खेळले जात आहे. सत्तेचे संरक्षण मिळल्याने कुणीही या घटनेची जबाबदारी घ्यायला येत नाही. मुलांचा जीव घेणाऱ्या दोषी कंपन्यांवर आणि त्या विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केंद्र आणि राज्याकडे केली आहे.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे अनेक मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य प्रदेशात औषधी लिहून देणाऱ्या 3 डॉक्टरांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीचा मालक गोविंदनाथन रंगनाथन याला अखेर विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली. मात्र या प्रकरणावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Cough syrup deaths: Company donated ₹945 crore to BJP, alleges Singh.

Web Summary : Digvijay Singh alleges cough syrup company linked to 26 child deaths donated ₹945 crore to BJP via electoral bonds. He questions government inaction and demands accountability for substandard drugs, citing a deadly chemical imbalance in the syrup.
टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहBJPभाजपा