शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

आडवाणी यांनीच समाजात द्वेश पसरवला...; दिग्विजय यांनी सांगितंल राम जन्मभूमी राष्ट्रीय मुद्दा कसा बनला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 22:20 IST

दिग्विजय म्हणाले, 1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार जागा मिळाल्या होत्या. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या गांधीवादी समाजवादाने त्यांन यश मिळू शकत नाही, हे स्पष्ट झाले होते. यानंतर पक्षाने (भाजपने) राम जन्मभूमी-बाबरी मशीदीच्या वादाला राष्ट्रीय मुद्दा बनविण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली/भोपाळ - लालकृष्ण आडवाणी यांच्या 1990 च्या रथयात्रेने समाजात फूट पाडली, असे काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Congress Leader Digvijay Singh) यांनी म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद (Salman Khurshid Book Launch) यांचे पुस्तक सनराइज ओव्हर अयोध्याः द नेशनहूड इन ऑवर टाइम्सच्या (Sunrise Over Ayodhya: Nationhood in Our Times) प्रकाशनाच्या निमित्ताने दिग्विजय यांनी भाजपच्या विचारधारेवरही (Digvijay on BJP Ideology) हल्ला चढवला आणि ती देशात द्वेश पसरवणारी असल्याचे म्हटले आहे.

दिग्विजय म्हणाले, 1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ चार जागा मिळाल्या होत्या. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या गांधीवादी समाजवादाने त्यांन यश मिळू शकत नाही, हे स्पष्ट झाले होते. यानंतर पक्षाने (भाजपने) राम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादाला राष्ट्रीय मुद्दा बनविण्याचा निर्णय घेतला.

दिग्विजय यांनी देशात द्वेश पसरण्यासाठी आडवाणी (Lal krishna Advani) यांना जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, 1984 नंतर भाजप कट्टर हिंदुत्वाच्या मार्गावर चालू लागली, जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेचा आधार आहे. आडवाणी यांच्या रथयात्रेने संपूर्ण देशात समाजात फूट पाडली. जेथे-जेथे आडवाणी गेले, तेथे-तेथे त्यांनी द्वेशाचे बीज पेरले.

सलमान खुर्शीद यांनी या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस आणि बोको हरामसोबत केली आहे. त्यांनी राम जन्मभूमी-बाबरी मशीद मुद्यावरून (Ram Janmabhoomi Babri Masjid) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही तिखट वक्तव्य केले आहे. त्यांनी लिहिले आहे, की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हिंदू राष्ट्राच्या विचारधारेच्या विरुद्ध आहे.  

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीsalman khurshidसलमान खुर्शिदBJPभाजपाRam Mandirराम मंदिर