शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
7
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
8
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
9
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
10
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
11
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
12
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
13
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
14
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
15
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
19
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
20
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

माघार घेणे शरणागती पत्करण्यासारखे, पंतप्रधान मोदींमुळे जवानांचे मनोबल ढासळले; काँग्रेसची टीका

By देवेश फडके | Updated: February 14, 2021 15:07 IST

भारत आणि चीनमध्ये सीमेवरून झालेल्या समेटानंतर काँग्रेस नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी (ak antony) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षेकडे लक्ष नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देमाजी संरक्षण मंत्र्यांचा मोदी सरकारवर निशाणामोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षेकडे लक्ष नाही - अँटनीमोदी सरकारची चीनसमोर शरणागती - अँटनी

नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये सीमेवरून झालेल्या समेटानंतर काँग्रेस नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षेकडे लक्ष नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. (congress leader ak antony criticized modi government over india china border dispute)

एके अँटनी (ak antony) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर मोदी सरकारवर निशाणा साधला. लडाखमधील भारत आणि चीन सीमेवरून सैन्य माघारी बोलावणे हे शरणागती पत्करल्यासारखे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे जवानांचे मनोबल ढासळले आहे, असा आरोप अँटनी यांनी केला.

संरक्षण बजेटला कात्री

देशाच्या इतिहासात प्रथमच दोन्ही बाजूंच्या आव्हांना भारत तोंड देत आहे. एकीकडे पाकिस्तान सीमेवरून दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. तर दुसरीकडे विस्तारवादी धोरणामुळे चीन लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत सैन्य तैनात करत आहेत. असे असताना संरक्षण बजेटला कात्री लावण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालु आर्थिक वर्षांत संरक्षण बजेट कमी करण्यात आले आहे. भारतीय सैन्याशी केलेली ही फसवणूक आहे, असा दावा अँटनी यांनी केला. 

"अनुच्छेद ३७० हे भाजप सरकारच रद्द करेल, हे मला माहिती होते": गुलाम नबी आझाद

चीनसमोर शरणागती

भारतीय जवान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फिंगर-८ पर्यंत पेट्रोलिंग करत होते आणि चिनी सैन्य फिंगर-४ पर्यंत पेट्रोलिंग करत होते. यामधील भूभाग वादग्रस्त होता. यानंतर आम्ही कैलाश रेंजवरून माघार घेतली. भारतीय लष्कराची छावणी फिंगर ४ मध्ये असूनही आपण फिंगर ३ पर्यंतच पेट्रोलिंग करू शकतो. ही बाब चीनसमोर शरणागती पत्करल्यासारखी आहे, असा दावा अँटनी यांनी केला. पंतप्रधान मोदी सरकारने यासाठी काय पाऊले उचलली, असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा काही प्रदेश चीनला देऊन टाकला, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. भारत व चीन यांनी पूर्व लडाखमधून आपापले सैन्य मागे बोलाविण्यासंदर्भात नुकताच एक करार केला. त्यावर राहुल गांधी यांनी कोरडे ओढले. राहुल गांधी म्हणाले की, चीनबरोबर झालेल्या कराराची माहिती देताना राजनाथसिंह स्वत: संकोचले होते. भारतीय फौजा आता पूर्व लडाखमध्ये फिंगर ३ याठिकाणी तैनात करण्यात येतील, असे राजनाथसिंह यांनी सांगितले. फिंगर ४ हे ठिकाण भारतीय हद्दीमध्ये येते. पूर्वी तिथे भारतीय लष्कराची चौकी होती. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण