शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

माघार घेणे शरणागती पत्करण्यासारखे, पंतप्रधान मोदींमुळे जवानांचे मनोबल ढासळले; काँग्रेसची टीका

By देवेश फडके | Updated: February 14, 2021 15:07 IST

भारत आणि चीनमध्ये सीमेवरून झालेल्या समेटानंतर काँग्रेस नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी (ak antony) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षेकडे लक्ष नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

ठळक मुद्देमाजी संरक्षण मंत्र्यांचा मोदी सरकारवर निशाणामोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षेकडे लक्ष नाही - अँटनीमोदी सरकारची चीनसमोर शरणागती - अँटनी

नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये सीमेवरून झालेल्या समेटानंतर काँग्रेस नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षेकडे लक्ष नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. (congress leader ak antony criticized modi government over india china border dispute)

एके अँटनी (ak antony) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर मोदी सरकारवर निशाणा साधला. लडाखमधील भारत आणि चीन सीमेवरून सैन्य माघारी बोलावणे हे शरणागती पत्करल्यासारखे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे जवानांचे मनोबल ढासळले आहे, असा आरोप अँटनी यांनी केला.

संरक्षण बजेटला कात्री

देशाच्या इतिहासात प्रथमच दोन्ही बाजूंच्या आव्हांना भारत तोंड देत आहे. एकीकडे पाकिस्तान सीमेवरून दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. तर दुसरीकडे विस्तारवादी धोरणामुळे चीन लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत सैन्य तैनात करत आहेत. असे असताना संरक्षण बजेटला कात्री लावण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालु आर्थिक वर्षांत संरक्षण बजेट कमी करण्यात आले आहे. भारतीय सैन्याशी केलेली ही फसवणूक आहे, असा दावा अँटनी यांनी केला. 

"अनुच्छेद ३७० हे भाजप सरकारच रद्द करेल, हे मला माहिती होते": गुलाम नबी आझाद

चीनसमोर शरणागती

भारतीय जवान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फिंगर-८ पर्यंत पेट्रोलिंग करत होते आणि चिनी सैन्य फिंगर-४ पर्यंत पेट्रोलिंग करत होते. यामधील भूभाग वादग्रस्त होता. यानंतर आम्ही कैलाश रेंजवरून माघार घेतली. भारतीय लष्कराची छावणी फिंगर ४ मध्ये असूनही आपण फिंगर ३ पर्यंतच पेट्रोलिंग करू शकतो. ही बाब चीनसमोर शरणागती पत्करल्यासारखी आहे, असा दावा अँटनी यांनी केला. पंतप्रधान मोदी सरकारने यासाठी काय पाऊले उचलली, असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा काही प्रदेश चीनला देऊन टाकला, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. भारत व चीन यांनी पूर्व लडाखमधून आपापले सैन्य मागे बोलाविण्यासंदर्भात नुकताच एक करार केला. त्यावर राहुल गांधी यांनी कोरडे ओढले. राहुल गांधी म्हणाले की, चीनबरोबर झालेल्या कराराची माहिती देताना राजनाथसिंह स्वत: संकोचले होते. भारतीय फौजा आता पूर्व लडाखमध्ये फिंगर ३ याठिकाणी तैनात करण्यात येतील, असे राजनाथसिंह यांनी सांगितले. फिंगर ४ हे ठिकाण भारतीय हद्दीमध्ये येते. पूर्वी तिथे भारतीय लष्कराची चौकी होती. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारण