शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कॉंग्रेस स्वबळावरच; राहुल गांधी, नाना पटोले यांच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 05:29 IST

सतत वादग्रस्त विधाने करून शिवसेना, राष्ट्रवादीशी वाद ओढवून घेणारे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ‘एकला चालो रे' या घोषणेला पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले आहे.

विकास झाडे, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सतत वादग्रस्त विधाने करून शिवसेना, राष्ट्रवादीशी वाद ओढवून घेणारे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ‘एकला चालो रे' या घोषणेला पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले आहे.

नाना पटोले यांनी आज  दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी कॉंग्रेसचे राज्य प्रभारी एच.के. पाटील,  राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणूगोपाल उपस्थित होते. महाराष्ट्रात संघटना वाढवणे व येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पक्षाची भूमिका यावर चर्चा झाली. 

पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यभर स्वबळावर लढविण्यात याव्यात अशी भूमिका मांडली. राहुल गांधी यांनी ही बाब मान्य केले असल्याचे पटोले यांनी सांगितले. पटोले म्हणाले, आमची संघटनात्मक मुद्दयांवर चर्चा झाली. राज्यात कॉंग्रेस विस्तारासाठी बराच वाव आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे निश्चित केले. मात्र लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी सोबत मिळून लढल्या जाऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले. राज्यातील आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल व पुढेही आघाडीचे सरकार राज्यात असेल तर केंद्रात काँग्रेसचे सरकार असेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. 

वाद ओढवून घेऊ नका!

- राहुल गांधी यांनी नाना पटोले यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची विनंती मान्य केली असली तरी त्यांची कान उघडणी केली असल्याचे कळते. 

- महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे व आघाडी धर्माचे पालन करा, सहकारी पक्षासोबत जुळवून घ्या आणि पक्ष विस्तार करा, अशा सूचना राहुल गांधी यांनी पटोले यांना दिला असल्याचे सूत्राने सांगितले. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNana Patoleनाना पटोलेNew Delhiनवी दिल्ली