शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

कॉंग्रेस स्वबळावरच; राहुल गांधी, नाना पटोले यांच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 05:29 IST

सतत वादग्रस्त विधाने करून शिवसेना, राष्ट्रवादीशी वाद ओढवून घेणारे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ‘एकला चालो रे' या घोषणेला पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले आहे.

विकास झाडे, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सतत वादग्रस्त विधाने करून शिवसेना, राष्ट्रवादीशी वाद ओढवून घेणारे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ‘एकला चालो रे' या घोषणेला पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले आहे.

नाना पटोले यांनी आज  दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी कॉंग्रेसचे राज्य प्रभारी एच.के. पाटील,  राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणूगोपाल उपस्थित होते. महाराष्ट्रात संघटना वाढवणे व येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पक्षाची भूमिका यावर चर्चा झाली. 

पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यभर स्वबळावर लढविण्यात याव्यात अशी भूमिका मांडली. राहुल गांधी यांनी ही बाब मान्य केले असल्याचे पटोले यांनी सांगितले. पटोले म्हणाले, आमची संघटनात्मक मुद्दयांवर चर्चा झाली. राज्यात कॉंग्रेस विस्तारासाठी बराच वाव आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे निश्चित केले. मात्र लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी सोबत मिळून लढल्या जाऊ शकतात, असे संकेत त्यांनी दिले. राज्यातील आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल व पुढेही आघाडीचे सरकार राज्यात असेल तर केंद्रात काँग्रेसचे सरकार असेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. 

वाद ओढवून घेऊ नका!

- राहुल गांधी यांनी नाना पटोले यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची विनंती मान्य केली असली तरी त्यांची कान उघडणी केली असल्याचे कळते. 

- महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे व आघाडी धर्माचे पालन करा, सहकारी पक्षासोबत जुळवून घ्या आणि पक्ष विस्तार करा, अशा सूचना राहुल गांधी यांनी पटोले यांना दिला असल्याचे सूत्राने सांगितले. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNana Patoleनाना पटोलेNew Delhiनवी दिल्ली