शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Congress: होय, ‘ती’ माझी चूक झाली…; काँग्रेस कार्यकारणी बैठकीत सोनिया गांधींची स्पष्ट कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 15:47 IST

५ राज्यातील काँग्रेस निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी गांधी कुटुंबाची आहे असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली – देशात नुकतेच ५ राज्यांचे निकाल लागले आहेत. या निकालात सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ज्या पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती तिथे अरविंद केजरीवालांच्या ‘आप’नं काँग्रेसचा दारूण पराभव केला आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधील नाराज नेत्यांनी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्यास सुरूवात केली आहे. यातच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी(Congress Sonia Gandhi) यांचं मोठं विधान समोर आलं आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा बचाव करणं ही माझी चुकी होती. मी कॅप्टन यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या कार्यकारणी बैठकीत रविवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पदावरून हटवायचं होतं तर आधीच हटवलं पाहिजे होतं असा विषय चर्चेला आला. तेव्हा सोनिया गांधींनी हे विधान केले. निवडणुकीपूर्वीच अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली. भाजपासोबत आघाडी करून त्यांनी पंजाब निवडणुकीत उमेदवार उभे केले. परंतु त्यांच्या पक्षाला काही करिष्मा करता आला नाही.

अमरिंदर सिंग यांचा गांधी कुटुंबावर निशाणा

दुसरीकडे अमरिंदर सिंग यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ५ राज्यातील काँग्रेस निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी गांधी कुटुंबाची आहे. भ्रष्ट चन्नी आणि विचलित सिद्धुच्या पाठिंब्यावर काँग्रेसनं स्वत:ची कबर खोदली. पंजाबच नव्हे तर यूपी, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर याठिकाणीही गांधी कुटुंबामुळेच पराभव झाला. याचं कारण म्हणजे गांधी घराण्यावरील लोकांचा विश्वास आता उठत चालला आहे.

आम्ही त्याग करण्यास तयार

रविवारी काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, काही लोकांच्या मते, गांधी कुटुंबामुळे पक्ष कमकुवत होत आहे. जर पक्षातील नेत्यांनाही असं वाटेल असेल तर आम्ही कुठल्याही प्रकारच्या त्यागाला सामोरे जाण्यास तयार आहोत. आमचं पहिलं लक्ष्य काँग्रेस मजबूत करण्याकडे आहे. त्यासाठी कुठल्याही त्याग देण्यास आम्ही तयार आहोत असं त्यांनी सांगितले. आता एप्रिल महिन्यात काँग्रेसचं चिंतन शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. तोवर सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षा राहतील. परंतु काँग्रेस पक्षातील नेत्यांनी सोनिया गांधी यांना पाठिंबा देत पराभवाला राज्यातील नेते आणि खासदार, आमदार जबाबदार आहेत. केवळ एकट्या सोनिया गांधी नाही असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.      

टॅग्स :Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२Captain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस