शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
7
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
8
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
9
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
10
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
11
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
12
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
13
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
15
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
16
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
17
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
18
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
19
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
20
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

Congress: होय, ‘ती’ माझी चूक झाली…; काँग्रेस कार्यकारणी बैठकीत सोनिया गांधींची स्पष्ट कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 15:47 IST

५ राज्यातील काँग्रेस निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी गांधी कुटुंबाची आहे असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली – देशात नुकतेच ५ राज्यांचे निकाल लागले आहेत. या निकालात सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ज्या पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती तिथे अरविंद केजरीवालांच्या ‘आप’नं काँग्रेसचा दारूण पराभव केला आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधील नाराज नेत्यांनी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्यास सुरूवात केली आहे. यातच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी(Congress Sonia Gandhi) यांचं मोठं विधान समोर आलं आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा बचाव करणं ही माझी चुकी होती. मी कॅप्टन यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या कार्यकारणी बैठकीत रविवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पदावरून हटवायचं होतं तर आधीच हटवलं पाहिजे होतं असा विषय चर्चेला आला. तेव्हा सोनिया गांधींनी हे विधान केले. निवडणुकीपूर्वीच अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली. भाजपासोबत आघाडी करून त्यांनी पंजाब निवडणुकीत उमेदवार उभे केले. परंतु त्यांच्या पक्षाला काही करिष्मा करता आला नाही.

अमरिंदर सिंग यांचा गांधी कुटुंबावर निशाणा

दुसरीकडे अमरिंदर सिंग यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ५ राज्यातील काँग्रेस निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी गांधी कुटुंबाची आहे. भ्रष्ट चन्नी आणि विचलित सिद्धुच्या पाठिंब्यावर काँग्रेसनं स्वत:ची कबर खोदली. पंजाबच नव्हे तर यूपी, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर याठिकाणीही गांधी कुटुंबामुळेच पराभव झाला. याचं कारण म्हणजे गांधी घराण्यावरील लोकांचा विश्वास आता उठत चालला आहे.

आम्ही त्याग करण्यास तयार

रविवारी काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, काही लोकांच्या मते, गांधी कुटुंबामुळे पक्ष कमकुवत होत आहे. जर पक्षातील नेत्यांनाही असं वाटेल असेल तर आम्ही कुठल्याही प्रकारच्या त्यागाला सामोरे जाण्यास तयार आहोत. आमचं पहिलं लक्ष्य काँग्रेस मजबूत करण्याकडे आहे. त्यासाठी कुठल्याही त्याग देण्यास आम्ही तयार आहोत असं त्यांनी सांगितले. आता एप्रिल महिन्यात काँग्रेसचं चिंतन शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. तोवर सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षा राहतील. परंतु काँग्रेस पक्षातील नेत्यांनी सोनिया गांधी यांना पाठिंबा देत पराभवाला राज्यातील नेते आणि खासदार, आमदार जबाबदार आहेत. केवळ एकट्या सोनिया गांधी नाही असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.      

टॅग्स :Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२Captain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस