शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
6
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
7
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
8
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
9
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
10
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
11
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
12
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
13
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
14
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
15
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
16
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
17
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
18
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
19
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
20
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  

Congress: होय, ‘ती’ माझी चूक झाली…; काँग्रेस कार्यकारणी बैठकीत सोनिया गांधींची स्पष्ट कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 15:47 IST

५ राज्यातील काँग्रेस निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी गांधी कुटुंबाची आहे असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली – देशात नुकतेच ५ राज्यांचे निकाल लागले आहेत. या निकालात सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ज्या पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती तिथे अरविंद केजरीवालांच्या ‘आप’नं काँग्रेसचा दारूण पराभव केला आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधील नाराज नेत्यांनी नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्यास सुरूवात केली आहे. यातच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी(Congress Sonia Gandhi) यांचं मोठं विधान समोर आलं आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा बचाव करणं ही माझी चुकी होती. मी कॅप्टन यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या कार्यकारणी बैठकीत रविवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पदावरून हटवायचं होतं तर आधीच हटवलं पाहिजे होतं असा विषय चर्चेला आला. तेव्हा सोनिया गांधींनी हे विधान केले. निवडणुकीपूर्वीच अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली. भाजपासोबत आघाडी करून त्यांनी पंजाब निवडणुकीत उमेदवार उभे केले. परंतु त्यांच्या पक्षाला काही करिष्मा करता आला नाही.

अमरिंदर सिंग यांचा गांधी कुटुंबावर निशाणा

दुसरीकडे अमरिंदर सिंग यांनी गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ५ राज्यातील काँग्रेस निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी गांधी कुटुंबाची आहे. भ्रष्ट चन्नी आणि विचलित सिद्धुच्या पाठिंब्यावर काँग्रेसनं स्वत:ची कबर खोदली. पंजाबच नव्हे तर यूपी, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर याठिकाणीही गांधी कुटुंबामुळेच पराभव झाला. याचं कारण म्हणजे गांधी घराण्यावरील लोकांचा विश्वास आता उठत चालला आहे.

आम्ही त्याग करण्यास तयार

रविवारी काँग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, काही लोकांच्या मते, गांधी कुटुंबामुळे पक्ष कमकुवत होत आहे. जर पक्षातील नेत्यांनाही असं वाटेल असेल तर आम्ही कुठल्याही प्रकारच्या त्यागाला सामोरे जाण्यास तयार आहोत. आमचं पहिलं लक्ष्य काँग्रेस मजबूत करण्याकडे आहे. त्यासाठी कुठल्याही त्याग देण्यास आम्ही तयार आहोत असं त्यांनी सांगितले. आता एप्रिल महिन्यात काँग्रेसचं चिंतन शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. तोवर सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षा राहतील. परंतु काँग्रेस पक्षातील नेत्यांनी सोनिया गांधी यांना पाठिंबा देत पराभवाला राज्यातील नेते आणि खासदार, आमदार जबाबदार आहेत. केवळ एकट्या सोनिया गांधी नाही असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.      

टॅग्स :Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२Captain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस