शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Congress: काँग्रेसमध्ये वाढली चमचे, खुशमस्कऱ्यांची संख्या, राजीनामा देत युवा प्रवक्त्याचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 19:40 IST

Congress: देशावर सर्वाधिक काळ सत्ता गाजवणारा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अडचणी सध्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. आज पक्षाचे तरुण प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी राजीनामा दिला. तसेच राजीनामा देताना एक पत्र लिहून गांधी कुटुंबावर घणाघाती टीका केली.

नवी दिल्ली - देशावर सर्वाधिक काळ सत्ता गाजवणारा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या अडचणी सध्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. आज पक्षाचे तरुण प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी राजीनामा दिला. तसेच राजीनामा देताना एक पत्र लिहून गांधी कुटुंबावर घणाघाती टीका केली. शेरगिल यांनी सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रात लिहिले की, मला हे सांगताना दु:ख होते की, निर्णय घेणे आता जनता आणि देशाच्या हितासाठी नाही आहे तर हे त्या लोकांच्या स्वार्थी हितांनी प्रभावित झाले आहे जे चाटुकारिता, चमचेगिरी आणि खुशमस्करेगिरीमध्ये गुंतले आहेत. तसेच ते सातत्याने वास्तवाकडे दुर्लक्ष करत आहेत.

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर शेरगिल यांनी सांगितलं की, काही लोकांसाठी काँग्रेस हे घर आहे. काही लोकांचं घर काँग्रेसमुळे चालतं आणि पक्षामध्ये अशाच लोकांची वर्णी लागत आहे. मात्र काँग्रेस माझं घर होतं आणि माझं घर काँग्रेसमुळे चालत नाही.

जयवीर शेरगील यांना राजीनामा देण्याचं प्राथमिक कारण सांगताना लिहिकं की, काँग्रेसमध्ये निर्णय घेणाऱ्या सध्याच्या लोकांची विचारसरणी आणि दूरदृष्टी आता तरुण आणि आधुनिक भारताच्या आशाआकांक्षांच्या अनुरूप राहिलेली नाही. तसेच हे लिहिताना मला दु:ख होते की, पक्षात आता निर्णय जनता आणि देशाच्या हितासाठी घेतले जात नाहीत, तर हे निर्णय खुशमस्करेगिरीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींचे स्वार्थ आणि वैयक्तिक हितांचा प्रभाव त्यावर असतो. तसेच वास्तवाकडे दुर्लक्ष केले जाते. ही अशी परिस्थिती आहे जी मी नैतिक रूपाने स्वीकार करू शकत नाही. तसेच मी अशा परिस्थितीत काम करणे सुरू ठेवू शकत नाही.  

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण