शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

घराणेशाहीच्या जाळ्यातून बाहेर पडण्याची काँग्रेसला संधी !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 11:08 AM

सत्ताधारी भारतीय जनता पक्षात सध्या मोठ्या प्रमाणात नेत्यांची आवक सुरू आहे. त्यामुळे स्वपक्षातील निष्ठावंतांचे नियोजन करण्याचे आव्हान भाजपसमोर येणाऱ्या काळात उभे राहण्याची शक्यता आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर देशातील राजकारण कधीही कल्पना केली नव्हती, अशा वळणावर येऊन ठेपले आहे. भ्रष्टाचार आणि भारतीय राजकारणात रुजलेल्या घराणेशाहीला पोषक असलेले वातावरणच मोदीच्या उदयाने नाहीसे केले. त्यामुळेच २०१४ पासून कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्षांतर सुरू झाले, ते आज तागायत सुरू आहे.

राजकीय क्षेत्रात झालेली ही उलथापालथ राजकारणाची दिशा आणि दशा बदलणारी ठरणार, असा अंदाज व्यक्त होत आहे. देशातील सर्वात मोठा आणि सर्वात जुना पक्ष म्हणून ओळख असलेल्या काँग्रेससमोर जुनी माणसं टिकविण्याचं आव्हान आहे. त्याचवेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची नामी संधी देखील आहे. परंतु, काँग्रेस कोणता पर्याय निवडणार, की दोन्ही पर्यायांसह पुढे जाणार हे येणारा काळाच ठरवणार आहे. राजकारणातील दिग्गज घराणे सध्या पक्षांतरावर भर देत आहेत. सत्तेची सवय सोडवत नसल्याने पद मिळाले नाही, तरी चालेल पण उभा केलेलं साम्राज्य कायम राहावे या लालसेपोटी कथित दिग्गजांच पक्षांतर जोरात सुरू आहे. त्यामुळे २०२४ पर्यंत काँग्रेस रिकामं होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केल्यास, राजकारणातील चाणक्य शरद पवार यांनी काळाची पावलं वेळीच ओळखल्याचं दिसतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अनेक तरुण चेहऱ्यांना संधी दिली. त्यात अगदी त्यांच्या नातवाचा देखील समावेश होता. परभणी, बीड, मावळ, शिरूर या मतदार संघात तरुणांना संधी देऊन पक्षाभोवती तरुणांची तटबंदी उभारण्यास पवारांनी सुरुवात केली. यात भर म्हणजे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तरुणांना आणखी संधी देण्यावर भर असेल असे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले. त्याचवेळी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये अशा काही हालचाली दिसत नाहीत.

सत्ताधारी भारतीय जनता पक्षात सध्या मोठ्या प्रमाणात नेत्यांची आवक सुरू आहे. त्यामुळे स्वपक्षातील निष्ठावंतांचे नियोजन करण्याचे आव्हान भाजपसमोर येणाऱ्या काळात उभे राहण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक नेत्यांचे तिकीट कापून बाहेरून आलेल्यांना भाजपने संधी दिली आहे. यावेळी विद्यमान खासदारांची नाराजी मोडून काढण्यात भाजपला यश आले असले तरी हा फंडा नेहमीच चालणार नाही हे पक्षातील 'थिंकटँक'ला चांगलेच ठावूक आहे. पक्षात नाराजांची संख्या वाढल्यास आपोआपच संघटनावर परिणाम होण्यास सुरुवात होते. त्यामुळे स्वपक्षातील निष्ठावंतांना अधिकाधिक संधी देऊन पक्ष वाढविण्यावर भाजपला भर द्यावा लागणार आहे. त्यामुळे येथे निष्ठावंतांना अधिक संधी मिळण्यास वाव आहे.

स्वातंत्र लढ्याचा इतिहास असलेल्या काँग्रेसमधून अनेक नेते पक्षांतर करत आहेत. सर्वात जुन्या पक्षावर अशी वेळ येण्याची कारणं पक्ष नेतृत्वाला सापडलीच आहेत. किंबहुना तसे संकेतही त्यांनी दिले. स्वर्गात जायचं तर आधी मरावं लागतं, या युक्तीप्रमाणे काँग्रेस नेतृत्वाने पावले उचलत पदाचा राजीनामा पक्षाकडे सोपविला. परंतु, पक्ष संघटनेने त्यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेसमध्ये आगामी काळात घराणेशाहीचा बिमोड होण्याची शक्यता असली तरी सुरुवात मुळापासून केल्याशिवाय हे शक्य होणार नाही, हे देखील तेवढच खरं आहे. गांधी कुटुंबाव्यतिरिक्त पक्षाध्यक्ष शोधण्याच्या सूचना राहुल गांधी यांनी नेत्यांना केल्या आहेत. त्यामुळे सलग १० वर्षांसाठी विरोधी बाकावर बसण्याची नामुष्की ओढावलेल्या काँग्रेसकडे तरुणांना सोबत घेऊन पक्ष वाढविण्याची संधी आहे. तर राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी काँग्रेसमध्ये येणार काळ खडतर असला तरी स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी ही योग्य वेळ ठरू शकतो.