शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

“काँग्रेसकडे ना कोणतं व्हिजन, ना त्यांच्या बोलण्यात काही वजन,” पंतप्रधान मोदींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 20:57 IST

“काँग्रेसकडे कोणतंही व्हिजन नाही आणि त्यांच्या बोलण्यात काही वजनही नाही,” असं म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबतच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान झालेल्या ‘चुकी’वरून काँग्रेस पक्षाची खिल्ली उडवली. “काँग्रेसकडे कोणतंही व्हिजन नाही आणि त्यांच्या बोलण्यात काही वजनही नाही,” असं म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला.

राजस्थानला आता अशा अस्थिर सरकार आणि अनिश्चिततेपासून मुक्तीची गरज आहे. तरच राजस्थानमध्ये कायद्याचे राज्य स्थापित होईल आणि ते वेगाने विकासाच्या मार्गावर चालू शकेल, असे मोदी म्हणाले. दरम्यान, गहलोत यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील काही उतारे वाचले होते. याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. “मित्रांनो! चूक कोणाचीही होऊ शकते हे मला मान्य आहे. पण यावरून हेही दिसून येते की काँग्रेसकडे कोणतंही व्हिजन नाही आणि त्यांच्या बोलण्यात कोणतंही वजन नाही,” असं म्हणत त्यांनी टोला लगावला.

सभेला केलं संबोधितदौसा येथील धनावद येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या एका टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित सभेला पंतप्रधानांनी संबोधित केलं. मोदी म्हणाले, “काँग्रेससाठी अर्थसंकल्प आणि घोषणा कागदावर लिहिण्यासाठी असतात. जमिनीवर योजना आणि कार्यक्रम राबविण्याचा काँग्रेसचा विचार नाही.” “त्यांनी काय वाचलं हा प्रश्न नाही, प्रश्न हा आहे की यापूर्वीचा वाचला… वर्षभर तो डब्ब्यात बंद करून ठेवला होता. यामुळेच ते झालं. आता राजस्थानला अस्थिर सरकारपासून मुक्ती हवी, अनिश्चिततेपासून मुक्ती हवी. राजस्थानला आता स्थिर आणि विकासाचं सरकार हवंय, तेव्हाच या ठिकाणी कायद्याचं राज्य प्रस्थापित होईल,” असं मोदी म्हणाले. 

उत्साह दिसून येतोयराजस्थानात डबल इंजिन सरकार पाहायला उत्साह दिसून येत आहे. चहुबाजूंना मला हे दिसत आहे. दौसामध्ये उत्साह दिसून येतोय, असंही त्यांनी नमूद केलं. गेल्या पाच वर्षांत या ठिकाणी डबल इंजिनची पॉवर लागली असती तर इथला विकास किती जलद झाला असता. काँग्रेस आपणही काम करत नाही आणि करुही देत नाही, असा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोत