शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

“काँग्रेसकडे ना कोणतं व्हिजन, ना त्यांच्या बोलण्यात काही वजन,” पंतप्रधान मोदींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 20:57 IST

“काँग्रेसकडे कोणतंही व्हिजन नाही आणि त्यांच्या बोलण्यात काही वजनही नाही,” असं म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबतच्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान झालेल्या ‘चुकी’वरून काँग्रेस पक्षाची खिल्ली उडवली. “काँग्रेसकडे कोणतंही व्हिजन नाही आणि त्यांच्या बोलण्यात काही वजनही नाही,” असं म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला.

राजस्थानला आता अशा अस्थिर सरकार आणि अनिश्चिततेपासून मुक्तीची गरज आहे. तरच राजस्थानमध्ये कायद्याचे राज्य स्थापित होईल आणि ते वेगाने विकासाच्या मार्गावर चालू शकेल, असे मोदी म्हणाले. दरम्यान, गहलोत यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील काही उतारे वाचले होते. याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. “मित्रांनो! चूक कोणाचीही होऊ शकते हे मला मान्य आहे. पण यावरून हेही दिसून येते की काँग्रेसकडे कोणतंही व्हिजन नाही आणि त्यांच्या बोलण्यात कोणतंही वजन नाही,” असं म्हणत त्यांनी टोला लगावला.

सभेला केलं संबोधितदौसा येथील धनावद येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या एका टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित सभेला पंतप्रधानांनी संबोधित केलं. मोदी म्हणाले, “काँग्रेससाठी अर्थसंकल्प आणि घोषणा कागदावर लिहिण्यासाठी असतात. जमिनीवर योजना आणि कार्यक्रम राबविण्याचा काँग्रेसचा विचार नाही.” “त्यांनी काय वाचलं हा प्रश्न नाही, प्रश्न हा आहे की यापूर्वीचा वाचला… वर्षभर तो डब्ब्यात बंद करून ठेवला होता. यामुळेच ते झालं. आता राजस्थानला अस्थिर सरकारपासून मुक्ती हवी, अनिश्चिततेपासून मुक्ती हवी. राजस्थानला आता स्थिर आणि विकासाचं सरकार हवंय, तेव्हाच या ठिकाणी कायद्याचं राज्य प्रस्थापित होईल,” असं मोदी म्हणाले. 

उत्साह दिसून येतोयराजस्थानात डबल इंजिन सरकार पाहायला उत्साह दिसून येत आहे. चहुबाजूंना मला हे दिसत आहे. दौसामध्ये उत्साह दिसून येतोय, असंही त्यांनी नमूद केलं. गेल्या पाच वर्षांत या ठिकाणी डबल इंजिनची पॉवर लागली असती तर इथला विकास किती जलद झाला असता. काँग्रेस आपणही काम करत नाही आणि करुही देत नाही, असा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोत