शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

...अन् राहुल गांधींचं 'ते' भाषण काँग्रेसनंच ट्विटरवरून काढून टाकलं! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 12:14 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या धडाकेबाज भाषणाचं आणि गळाभेटीचं राजकीय वर्तुळात कौतुक होतंय. परंतु....

नवी दिल्लीः लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या धडाकेबाज भाषणाचं आणि गळाभेटीचं राजकीय वर्तुळात कौतुक होतंय. परंतु, या भाषणानंतर दोन दिवसांनी राहुल गांधींनी केलेलं भाषण काँग्रेसला ट्विटरवरून काढून टाकावं लागलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भीतीने त्यांनी हे सावध पाऊल टाकल्याचं समजतं. 

भाजपाची सरकारं राज्यांच्या तिजोरीतील पैसे चोरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्थांना देत आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत केला होता. जेव्हा भाजपा सत्तेत येते, तेव्हा त्या-त्या राज्यातील संघाच्या हजारो संस्थांना बळकटी येते, नवचैतन्य मिळतं, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. या भाषणाचा व्हिडीओ काँग्रेसनं यू-ट्युब आणि ट्विटरवर अपलोड केला होता. परंतु, त्यातील आरोप ऐकून भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खवळू शकतात आणि राहुल गांधींना पुन्हा मानहानीच्या खटल्याला सामोरं जावं लागू शकतं, अशी शंका येताच त्यांनी हे व्हिडीओ काढून टाकले आहेत. 

२०१४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडीतील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी रा. स्व. संघावर गांधीहत्येचा आरोप केला होता. त्यावरून त्यांच्यावर मानहानीचा खटला सुरू आहे. त्यात आणखी एकाची भर नको म्हणून काँग्रेसनं हे व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाकल्याचं समोर आलंय. परंतु, हा व्हिडीओ आपल्या कामाचे आहेत, ही गोष्ट या निमित्ताने भाजपा-संघाच्या लक्षात आलीय. त्यामुळे हे व्हिडीओ मिळवून ते राहुल यांना लक्ष्य करू शकतात.

भाजपा, संघाकडून शिका!

दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधींनी भाजपा, संघावर टीकास्त्र सोडलंच; पण त्यांच्याकडून शिकण्याचा सल्लाही कार्यकर्त्यांना दिला होता. सर्वसामान्य लोकांमध्ये जा आणि काम करा. भाजपा-आरएसएस जनतेमध्ये जाऊन कामं करतात, मात्र आपले नेते काम करताना संकोच बाळगतात. भाजपा आणि आरएसएसकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे, असं त्यांनी आवर्जून सांगितलं होतं. 

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस