शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जो खेळ तुम्ही सुरु केलाय तो मीच संपवणार; शिवराज सिंह यांचा काँग्रेसला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 11:15 IST

काँग्रेसने सपा आणि बसपा यांच्या मदतीने मध्य प्रदेशात सरकार बनविलं आहे. भाजपाला काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या म्हणून आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं असतानाही आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला नाही

भोपाळ - मागील आठवड्यात मध्य प्रदेशात एका विधेयकाच्या चर्चेदरम्यान दोन भाजपा आमदारांनी पक्षाची साथ सोडत काँग्रेस सरकारच्या बाजूने मतदान केलं होतं. त्यामुळे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान चांगलेच संतापले आहेत. जर भाजपाने मनात आणलं असतं तर राज्यात काँग्रेसला सरकार बनविता आलं नसतं असा इशारा शिवराज सिंह चौहान यांनी दिला आहे. 

भाजपाच्या दोन आमदारांनी पक्षाची साथ सोडत काँग्रेसला मतदान केलं. त्यामुळे शिवराज सिंह यांनी संकल्प करत सांगितले की, जो खेळ काँग्रेसने सुरु केला आहे तो खेळ मीच संपवणार असल्याचं ते म्हणाले. भाजपाच्या नेत्यांकडून पक्ष सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात करण्यात आली त्यात ते बोलत होते. 

यावेळी बोलतान शिवराज सिंह चौहान पत्रकारांशी बोलले की, जर आम्ही मनात आणलं असतं तर राज्यात काँग्रेसला सरकार स्थापन करण्यात आलं नसतं. काँग्रेसने सपा आणि बसपा यांच्या मदतीने मध्य प्रदेशात सरकार बनविलं आहे. भाजपाला काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या म्हणून आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं असतानाही आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला नाही. आम्ही विरोधी पक्षात बसणं पसंत केलं. राज्यात काँग्रेस सरकार आल्यापासून भ्रष्ट कारभाराशिवाय काहीच केलं नाही. आम्ही कधी त्या सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही पण काँग्रेसने जो खेळ सुरु केला आहे तो मी संपवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. 

24 जुलै रोजी मध्य प्रदेश विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावाला पाठिंबा देत भाजपाच्या दोन आमदारांनी काँग्रेसला मतदान केलं. इतकचं नाही तर काँग्रेसने भाजपाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. कर्नाटकानंतर आता मध्य प्रदेशातही राजकीय संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पार्टीच्या नेत्यांमध्ये मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकारवरुन वादावादी सुरु आहे. भाजपा जर कमलानाथ सरकारला कर्नाटक सरकारसारखे असल्याचे समजत असेल, तर ती त्यांची चूक आहे असं काँग्रेसने म्हटलं आहे.  

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश