शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

Rahul Gandhi : "मोदी सरकारने 23 कोटी लोकांना गरिबीत ढकलले; पीठ, डाळी, तेलाचे भाव गगनाला भिडले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 16:58 IST

Congress Rahul Gandhi And Modi Government : ईडीच्या कारवाईवरूनही राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला आणि माझी 55 तास चौकशी झाली, असे म्हटले आहे. 55 तास काय, 500 तास, अगदी पाच वर्षे, मला पर्वा नाही असं म्हणत टोला लगावला आहे. 

महागाईविरोधात काँग्रेसच्या हल्लाबोल रॅलीत राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी, बेरोजगारी, महागाई अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. तसेच ईडीच्या कारवाईवरूनही राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला आणि माझी 55 तास चौकशी झाली, असे म्हटले आहे. 55 तास काय, 500 तास, अगदी पाच वर्षे, मला पर्वा नाही असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. 

राहुल गांधी यांनी "द्वेषाचा जन्म भीतीतून होतो. जो घाबरतो तो द्वेष निर्माण करतो. भाजपा आणि आरएसएसचे नेते देशाचे विभाजन करतात आणि जाणूनबुजून देशात द्वेष आणि भीती निर्माण करतात. हा द्वेषच भारताला कमकुवत करत आहे" असं म्हटलं आहे. महागाई, बेरोजगारी ही द्वेषापेक्षा मजबूत असते का? नरेंद्र मोदी आणि भाजपा देशाला कमकुवत करण्याचे काम करत आहेत. आम्ही द्वेष नष्ट करतो आणि जेव्हा भीती कमी होते तेव्हा भारत पुढे जातो असं म्हटलं आहे. 

"देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात"

"देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात आहे. हे दोन उद्योगपती नरेंद्र मोदींसाठी 24 तास काम करतात. नरेंद्र मोदीही या दोन उद्योगपतींसाठी 24 तास काम करतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, पण त्या दोन उद्योगपतींशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान राहू शकत नाहीत" असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

"मोदी सरकारने आठ वर्षांत 23 कोटी लोकांना गरिबीत ढकलले"

राहुल गांधी यांनी "यूपीए सरकारने 27 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले होते, पण मोदी सरकारने आठ वर्षांत 23 कोटी लोकांना गरिबीत ढकलले आहे. पीठ, डाळी, पेट्रोल, तेलापासून सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. भारतात सामान्य नागरिक संकटात आहेत, देश त्रस्त आहे. काँग्रेसने 70 वर्षांत एवढी महागाई दाखवली नाही. देशाला काँग्रेसच वाचवू शकते" असं देखील सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस