शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Rahul Gandhi : "मोदी सरकारने 23 कोटी लोकांना गरिबीत ढकलले; पीठ, डाळी, तेलाचे भाव गगनाला भिडले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 16:58 IST

Congress Rahul Gandhi And Modi Government : ईडीच्या कारवाईवरूनही राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला आणि माझी 55 तास चौकशी झाली, असे म्हटले आहे. 55 तास काय, 500 तास, अगदी पाच वर्षे, मला पर्वा नाही असं म्हणत टोला लगावला आहे. 

महागाईविरोधात काँग्रेसच्या हल्लाबोल रॅलीत राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी, बेरोजगारी, महागाई अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. तसेच ईडीच्या कारवाईवरूनही राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला आणि माझी 55 तास चौकशी झाली, असे म्हटले आहे. 55 तास काय, 500 तास, अगदी पाच वर्षे, मला पर्वा नाही असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. 

राहुल गांधी यांनी "द्वेषाचा जन्म भीतीतून होतो. जो घाबरतो तो द्वेष निर्माण करतो. भाजपा आणि आरएसएसचे नेते देशाचे विभाजन करतात आणि जाणूनबुजून देशात द्वेष आणि भीती निर्माण करतात. हा द्वेषच भारताला कमकुवत करत आहे" असं म्हटलं आहे. महागाई, बेरोजगारी ही द्वेषापेक्षा मजबूत असते का? नरेंद्र मोदी आणि भाजपा देशाला कमकुवत करण्याचे काम करत आहेत. आम्ही द्वेष नष्ट करतो आणि जेव्हा भीती कमी होते तेव्हा भारत पुढे जातो असं म्हटलं आहे. 

"देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात"

"देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात आहे. हे दोन उद्योगपती नरेंद्र मोदींसाठी 24 तास काम करतात. नरेंद्र मोदीही या दोन उद्योगपतींसाठी 24 तास काम करतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, पण त्या दोन उद्योगपतींशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान राहू शकत नाहीत" असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

"मोदी सरकारने आठ वर्षांत 23 कोटी लोकांना गरिबीत ढकलले"

राहुल गांधी यांनी "यूपीए सरकारने 27 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले होते, पण मोदी सरकारने आठ वर्षांत 23 कोटी लोकांना गरिबीत ढकलले आहे. पीठ, डाळी, पेट्रोल, तेलापासून सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. भारतात सामान्य नागरिक संकटात आहेत, देश त्रस्त आहे. काँग्रेसने 70 वर्षांत एवढी महागाई दाखवली नाही. देशाला काँग्रेसच वाचवू शकते" असं देखील सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस