शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Rahul Gandhi : "मोदी सरकारने 23 कोटी लोकांना गरिबीत ढकलले; पीठ, डाळी, तेलाचे भाव गगनाला भिडले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 16:58 IST

Congress Rahul Gandhi And Modi Government : ईडीच्या कारवाईवरूनही राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला आणि माझी 55 तास चौकशी झाली, असे म्हटले आहे. 55 तास काय, 500 तास, अगदी पाच वर्षे, मला पर्वा नाही असं म्हणत टोला लगावला आहे. 

महागाईविरोधात काँग्रेसच्या हल्लाबोल रॅलीत राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शेतकरी, बेरोजगारी, महागाई अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. तसेच ईडीच्या कारवाईवरूनही राहुल गांधींनी भाजपावर निशाणा साधला आणि माझी 55 तास चौकशी झाली, असे म्हटले आहे. 55 तास काय, 500 तास, अगदी पाच वर्षे, मला पर्वा नाही असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. 

राहुल गांधी यांनी "द्वेषाचा जन्म भीतीतून होतो. जो घाबरतो तो द्वेष निर्माण करतो. भाजपा आणि आरएसएसचे नेते देशाचे विभाजन करतात आणि जाणूनबुजून देशात द्वेष आणि भीती निर्माण करतात. हा द्वेषच भारताला कमकुवत करत आहे" असं म्हटलं आहे. महागाई, बेरोजगारी ही द्वेषापेक्षा मजबूत असते का? नरेंद्र मोदी आणि भाजपा देशाला कमकुवत करण्याचे काम करत आहेत. आम्ही द्वेष नष्ट करतो आणि जेव्हा भीती कमी होते तेव्हा भारत पुढे जातो असं म्हटलं आहे. 

"देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात"

"देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात आहे. हे दोन उद्योगपती नरेंद्र मोदींसाठी 24 तास काम करतात. नरेंद्र मोदीही या दोन उद्योगपतींसाठी 24 तास काम करतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, पण त्या दोन उद्योगपतींशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान राहू शकत नाहीत" असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

"मोदी सरकारने आठ वर्षांत 23 कोटी लोकांना गरिबीत ढकलले"

राहुल गांधी यांनी "यूपीए सरकारने 27 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले होते, पण मोदी सरकारने आठ वर्षांत 23 कोटी लोकांना गरिबीत ढकलले आहे. पीठ, डाळी, पेट्रोल, तेलापासून सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. भारतात सामान्य नागरिक संकटात आहेत, देश त्रस्त आहे. काँग्रेसने 70 वर्षांत एवढी महागाई दाखवली नाही. देशाला काँग्रेसच वाचवू शकते" असं देखील सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस