शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

“बाहेरचा रस्ता दाखवत नाही, तोपर्यंत आम्ही पक्षातच राहणार”; G-21 नेत्यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 08:02 IST

भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस सक्षम असून, त्याच्या पर्यायांवर पक्षाने विचार करणे आवश्यक आहे, असे या गटातील नेत्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: देशभरातील पाच राज्यांच्या निवडणुकीत सपाटून पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या काँग्रेसच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुकीतील पराभवाचे दीर्घ चिंतन करण्यात आले. यानंतर काँग्रेसमधील असंतुष्ट गट असलेल्या जी-२१ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक नवी दिल्लीत पार पडली. यावेळी आम्हाला जोपर्यंत बाहेरचा रस्ता दाखवला जात नाही, तोपर्यंत पक्षातच राहणार आणि काँग्रेसचे कार्य करणार, अशी स्पष्ट भूमिका G-21 गटातील नेत्यांनी घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपविरोधात काँग्रेसला मजबुतीने उभे करणे काळाची गरज बनलेले आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस सक्षम आहे. मात्र, त्याबाबतच्या पर्यायांवर पक्षाने विचार करणे आवश्यक आहे. पक्षामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. जी-२१ गटाची आगामी भूमिका लवकरच स्पष्ट करण्यात येईल, असे या बैठकीनंतर काढलेल्या संयुक्त पत्रकात म्हटल्याचे सांगितले जात आहे. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या असंतुष्ट असलेल्या जी-२१ गटाच्या नेत्यांची बैठक झाली. यामध्ये अनेक विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. 

कपिल सिब्बलांचे आरोप अन् काँग्रेसचे प्रत्युत्तर

पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर काँग्रेसमध्येच दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. या दोन गटांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. आता गांधी घराण्याने काँग्रेस नेतृत्वाचा भार सोडावा आणि कुण्या दुसऱ्या नेत्याला जबाबदारी द्यावी. काही लोक काँग्रेसच्या आतील आहेत, तर काही काँग्रेसच्या बाहेरील आहेत. पण खऱ्या आणि सर्वांच्या काँग्रेससाठी, काँग्रेस बाहेरील लोकांचेही ऐकायला हवे. ज्या पद्धतीने काँग्रेसची अधोगती होत आहे, ती मला पाहावली जात नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांच्या काँग्रेससाठी संघर्ष करत राहणार, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले होते. यावर, ते एक चांगले वकील असू शकतात. परंतु चांगले नेते नाहीत. ते कधीही कोणत्याही गावात काँग्रेसचे काम करण्यासाठी गेले नाहीत. ते जाणूनबुजून पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाला कोणीही कमकुवत करू शकत नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा पलटवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. 

दरम्यान, गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, अखिलेश प्रताप सिंह, शंकर सिंह बघेला, शशी थरूर, संदीप दीक्षित, एम.ए.खान, विवेक तन्खा, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, भूपेंद्र सिंह हुड्डा, राज बब्बर, मणिशंकर अय्यर, पी.जे.कुरियन, राजिंदर कौल भट्टर, कुलदीप शर्मा आणि प्रेणित कौर या जी-२१ गटाच्या नेत्यांनी परिपत्रक काढले आहे. निवडणूक निकालांनंतर काँग्रेसच्या जी-२१ गटाच्या नेत्यांची ही दुसरी बैठक होती. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण