शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

“बाहेरचा रस्ता दाखवत नाही, तोपर्यंत आम्ही पक्षातच राहणार”; G-21 नेत्यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 08:02 IST

भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस सक्षम असून, त्याच्या पर्यायांवर पक्षाने विचार करणे आवश्यक आहे, असे या गटातील नेत्यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: देशभरातील पाच राज्यांच्या निवडणुकीत सपाटून पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या काँग्रेसच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुकीतील पराभवाचे दीर्घ चिंतन करण्यात आले. यानंतर काँग्रेसमधील असंतुष्ट गट असलेल्या जी-२१ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक नवी दिल्लीत पार पडली. यावेळी आम्हाला जोपर्यंत बाहेरचा रस्ता दाखवला जात नाही, तोपर्यंत पक्षातच राहणार आणि काँग्रेसचे कार्य करणार, अशी स्पष्ट भूमिका G-21 गटातील नेत्यांनी घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपविरोधात काँग्रेसला मजबुतीने उभे करणे काळाची गरज बनलेले आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस सक्षम आहे. मात्र, त्याबाबतच्या पर्यायांवर पक्षाने विचार करणे आवश्यक आहे. पक्षामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. जी-२१ गटाची आगामी भूमिका लवकरच स्पष्ट करण्यात येईल, असे या बैठकीनंतर काढलेल्या संयुक्त पत्रकात म्हटल्याचे सांगितले जात आहे. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या असंतुष्ट असलेल्या जी-२१ गटाच्या नेत्यांची बैठक झाली. यामध्ये अनेक विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. 

कपिल सिब्बलांचे आरोप अन् काँग्रेसचे प्रत्युत्तर

पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर काँग्रेसमध्येच दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. या दोन गटांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. आता गांधी घराण्याने काँग्रेस नेतृत्वाचा भार सोडावा आणि कुण्या दुसऱ्या नेत्याला जबाबदारी द्यावी. काही लोक काँग्रेसच्या आतील आहेत, तर काही काँग्रेसच्या बाहेरील आहेत. पण खऱ्या आणि सर्वांच्या काँग्रेससाठी, काँग्रेस बाहेरील लोकांचेही ऐकायला हवे. ज्या पद्धतीने काँग्रेसची अधोगती होत आहे, ती मला पाहावली जात नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांच्या काँग्रेससाठी संघर्ष करत राहणार, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले होते. यावर, ते एक चांगले वकील असू शकतात. परंतु चांगले नेते नाहीत. ते कधीही कोणत्याही गावात काँग्रेसचे काम करण्यासाठी गेले नाहीत. ते जाणूनबुजून पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाला कोणीही कमकुवत करू शकत नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा पलटवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. 

दरम्यान, गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, अखिलेश प्रताप सिंह, शंकर सिंह बघेला, शशी थरूर, संदीप दीक्षित, एम.ए.खान, विवेक तन्खा, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, भूपेंद्र सिंह हुड्डा, राज बब्बर, मणिशंकर अय्यर, पी.जे.कुरियन, राजिंदर कौल भट्टर, कुलदीप शर्मा आणि प्रेणित कौर या जी-२१ गटाच्या नेत्यांनी परिपत्रक काढले आहे. निवडणूक निकालांनंतर काँग्रेसच्या जी-२१ गटाच्या नेत्यांची ही दुसरी बैठक होती. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण