शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

‘काँग्रेसमुक्त भारत’ म्हणजे काँग्रेस पक्ष संपविणे नव्हे , अमित शहांची मल्लिनाथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 06:07 IST

आम्हाला ‘काँग्रेसमुक्त भारत’ करायचा म्हणजे काँग्रेस पक्ष संपुष्टात आणायचा आहे असे नाही. आमचा हेतू काँग्रेस संस्कृती नामशेष करणे हा आहे, अशी मल्लिनाथी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी येथे केली.

अंबिकापूर (छत्तीसगढ) : आम्हाला ‘काँग्रेसमुक्त भारत’ करायचा म्हणजे काँग्रेस पक्ष संपुष्टात आणायचा आहे असे नाही. आमचा हेतू काँग्रेस संस्कृती नामशेष करणे हा आहे, अशी मल्लिनाथी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी येथे केली.दोन दिवसांच्या छत्तीसगढ भेटीवर आलेले शहा म्हणाले की, भ्रमनिरास झाल्याने मध्यमवर्ग भाजपापासून दूर जात आहे, हा केवळ अपप्रचार आहे. यात तथ्य असते तर भाजपाने एकापाठोपाठ एक १४ राज्यांच्या निवडणुका जिंकल्या नसत्या. येथेही आमचे ‘मिशन ६५’ (८० पैकी ६५ जागा जिंकणे) नक्की यशस्वी होईल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री रमण सिंग म्हणाले की, आमच्यावर जनता खूश आहे. भाजपाला चौथ्यांदा सत्ता देण्याचा इरादा मदारांनी केला आहे.या दोन प्रश्नांवर काय म्हणाले भाजपाध्यक्ष?1. तुम्ही ‘काँग्रेसमुक्त भारता’ची भाषा बोलता. म्हणजे तुम्हाला देशात कोणी विरोधी पक्षच असू नये असे वाटते का?अमित शहा : आमच्या ‘काँग्रेसमुक्त भारता’चा संदर्भ काँग्रेस संस्कृती संपुष्टात आणण्याशी आहे, विरोधी पक्ष संपविण्याशी नाही. विरोधी पक्षाशिवाय लोकशाही असू शकत नाही. मात्र काँग्रेस जिवंत ठेवणे ही राहुल गांधींची जबाबदारी आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा!2. राहुल गांधी हे लोकशाहीला धोका आहेत, असे का मानता?अमित शहा : लोकशाहीमध्ये कोणीही व्यक्ती वा पक्ष हा धोका नसतो. मी जे बोललो त्यात व्यक्तिगत टीका नाही. भाजपा अध्यक्ष या नात्याने मी जसा आमच्या कामगिरीचा लेखाजोखा देतो, तशी काँग्रेस अध्यक्ष या नात्याने राहुल गांधी यांनीही काँग्रेसच्या भल्याबुऱ्या कामांची जबाबदारी स्वीकारायला हवी. काँग्रेसने देशावर जसे ५५ वर्षे राज्य केले तसे नेहरू-गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनीही देशावर सत्ता गाजविली. त्या घराण्याचे वारस म्हणून या चार पिढ्यांचा हिशेब देण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेस