शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

‘काँग्रेसमुक्त भारत’ म्हणजे काँग्रेस पक्ष संपविणे नव्हे , अमित शहांची मल्लिनाथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 06:07 IST

आम्हाला ‘काँग्रेसमुक्त भारत’ करायचा म्हणजे काँग्रेस पक्ष संपुष्टात आणायचा आहे असे नाही. आमचा हेतू काँग्रेस संस्कृती नामशेष करणे हा आहे, अशी मल्लिनाथी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी येथे केली.

अंबिकापूर (छत्तीसगढ) : आम्हाला ‘काँग्रेसमुक्त भारत’ करायचा म्हणजे काँग्रेस पक्ष संपुष्टात आणायचा आहे असे नाही. आमचा हेतू काँग्रेस संस्कृती नामशेष करणे हा आहे, अशी मल्लिनाथी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी येथे केली.दोन दिवसांच्या छत्तीसगढ भेटीवर आलेले शहा म्हणाले की, भ्रमनिरास झाल्याने मध्यमवर्ग भाजपापासून दूर जात आहे, हा केवळ अपप्रचार आहे. यात तथ्य असते तर भाजपाने एकापाठोपाठ एक १४ राज्यांच्या निवडणुका जिंकल्या नसत्या. येथेही आमचे ‘मिशन ६५’ (८० पैकी ६५ जागा जिंकणे) नक्की यशस्वी होईल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री रमण सिंग म्हणाले की, आमच्यावर जनता खूश आहे. भाजपाला चौथ्यांदा सत्ता देण्याचा इरादा मदारांनी केला आहे.या दोन प्रश्नांवर काय म्हणाले भाजपाध्यक्ष?1. तुम्ही ‘काँग्रेसमुक्त भारता’ची भाषा बोलता. म्हणजे तुम्हाला देशात कोणी विरोधी पक्षच असू नये असे वाटते का?अमित शहा : आमच्या ‘काँग्रेसमुक्त भारता’चा संदर्भ काँग्रेस संस्कृती संपुष्टात आणण्याशी आहे, विरोधी पक्ष संपविण्याशी नाही. विरोधी पक्षाशिवाय लोकशाही असू शकत नाही. मात्र काँग्रेस जिवंत ठेवणे ही राहुल गांधींची जबाबदारी आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा!2. राहुल गांधी हे लोकशाहीला धोका आहेत, असे का मानता?अमित शहा : लोकशाहीमध्ये कोणीही व्यक्ती वा पक्ष हा धोका नसतो. मी जे बोललो त्यात व्यक्तिगत टीका नाही. भाजपा अध्यक्ष या नात्याने मी जसा आमच्या कामगिरीचा लेखाजोखा देतो, तशी काँग्रेस अध्यक्ष या नात्याने राहुल गांधी यांनीही काँग्रेसच्या भल्याबुऱ्या कामांची जबाबदारी स्वीकारायला हवी. काँग्रेसने देशावर जसे ५५ वर्षे राज्य केले तसे नेहरू-गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनीही देशावर सत्ता गाजविली. त्या घराण्याचे वारस म्हणून या चार पिढ्यांचा हिशेब देण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेस