शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

‘काँग्रेसमुक्त भारत’ म्हणजे काँग्रेस पक्ष संपविणे नव्हे , अमित शहांची मल्लिनाथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 06:07 IST

आम्हाला ‘काँग्रेसमुक्त भारत’ करायचा म्हणजे काँग्रेस पक्ष संपुष्टात आणायचा आहे असे नाही. आमचा हेतू काँग्रेस संस्कृती नामशेष करणे हा आहे, अशी मल्लिनाथी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी येथे केली.

अंबिकापूर (छत्तीसगढ) : आम्हाला ‘काँग्रेसमुक्त भारत’ करायचा म्हणजे काँग्रेस पक्ष संपुष्टात आणायचा आहे असे नाही. आमचा हेतू काँग्रेस संस्कृती नामशेष करणे हा आहे, अशी मल्लिनाथी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी येथे केली.दोन दिवसांच्या छत्तीसगढ भेटीवर आलेले शहा म्हणाले की, भ्रमनिरास झाल्याने मध्यमवर्ग भाजपापासून दूर जात आहे, हा केवळ अपप्रचार आहे. यात तथ्य असते तर भाजपाने एकापाठोपाठ एक १४ राज्यांच्या निवडणुका जिंकल्या नसत्या. येथेही आमचे ‘मिशन ६५’ (८० पैकी ६५ जागा जिंकणे) नक्की यशस्वी होईल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री रमण सिंग म्हणाले की, आमच्यावर जनता खूश आहे. भाजपाला चौथ्यांदा सत्ता देण्याचा इरादा मदारांनी केला आहे.या दोन प्रश्नांवर काय म्हणाले भाजपाध्यक्ष?1. तुम्ही ‘काँग्रेसमुक्त भारता’ची भाषा बोलता. म्हणजे तुम्हाला देशात कोणी विरोधी पक्षच असू नये असे वाटते का?अमित शहा : आमच्या ‘काँग्रेसमुक्त भारता’चा संदर्भ काँग्रेस संस्कृती संपुष्टात आणण्याशी आहे, विरोधी पक्ष संपविण्याशी नाही. विरोधी पक्षाशिवाय लोकशाही असू शकत नाही. मात्र काँग्रेस जिवंत ठेवणे ही राहुल गांधींची जबाबदारी आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा!2. राहुल गांधी हे लोकशाहीला धोका आहेत, असे का मानता?अमित शहा : लोकशाहीमध्ये कोणीही व्यक्ती वा पक्ष हा धोका नसतो. मी जे बोललो त्यात व्यक्तिगत टीका नाही. भाजपा अध्यक्ष या नात्याने मी जसा आमच्या कामगिरीचा लेखाजोखा देतो, तशी काँग्रेस अध्यक्ष या नात्याने राहुल गांधी यांनीही काँग्रेसच्या भल्याबुऱ्या कामांची जबाबदारी स्वीकारायला हवी. काँग्रेसने देशावर जसे ५५ वर्षे राज्य केले तसे नेहरू-गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनीही देशावर सत्ता गाजविली. त्या घराण्याचे वारस म्हणून या चार पिढ्यांचा हिशेब देण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेस