शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आता लढायचं! पराभव विसरुन काँग्रेसचं आता गुजरातवर लक्ष, राहुल गांधींची बैठक; BJP-AAP ला रोखण्यासाठी मास्टरप्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 20:55 IST

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी जोरदार तयारी जोरात सुरू केली आहे.

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी जोरदार तयारी जोरात सुरू केली आहे. पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसनं आता आपलं लक्ष गुजरातकडे वळवलं आहे. पाच राज्यांतील पराभव विसरून पक्षानं आता गुजरातवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच मंगळवारी माजी काँग्रेस अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी गुजरात काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपचा मुकाबला आणि आम आदमी पक्षाला (आप) रोखण्यासाठी रणनीती तयार करण्यात आली. 

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत भाजपसोबतच 'आप'च्या विरोधात आक्रमक प्रचार करण्याचं ठरविण्यात आलं आहे. सभापती आणि विधिमंडळ पक्षनेते यांची नुकतीच निवड करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. अशा परिस्थितीत आता काँग्रेस लवकरच संघटना वाढवून लोकांना 'आप' किंवा भाजपमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी काम करेल. अनेक राज्यांमध्ये पक्षांतरामुळे काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आहे. अशा स्थितीत पक्षानंही मागील चुकांमधून धडा घेण्यास सुरुवात केली आहे. ६ एप्रिल रोजी साबरमती आश्रमापासून सुरू होणाऱ्या यात्रेत सहभागी होण्यासाठी राहुल यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यातून निवडणुकीत भाजपच्या विरोधात वातावरण तयार केलं जाईल आणि 'आप'ला रोखण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

'आप'विरोधात काँग्रेसही आक्रमक होणारकाँग्रेस दिल्ली आणि पंजाबमधून नेते आणि कार्यकर्त्यांना गुजरातमध्ये पाठवणार असल्याचं बैठकीत ठरविण्यात आलं आहे. यासह ते 'आप'च्या उणिवा सर्वांसमोर आणण्याचं काम करणार आहेत. यासाठी व्हिडिओ क्लिप, घोषणा इत्यादींचा वापर केला जाईल. यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसही 'आप'च्या विरोधात जोरदार प्रचार करणार आहे. भाजपची बी टीम म्हणून 'आप' विरोधात आक्रमक प्रचार केला जाणार आहे. या बैठकीत भाजपविरोधातील जनतेच्या प्रश्नांची यादी आतापासूनच तयार करण्याच्या सूचना नेत्यांना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात भाजपला घेरता यावं, यासाठी ते मुद्दे वेळोवेळी मांडणे हा त्यामागचा हेतू आहे.

निवडणुकीतील पराभवातून घेतला धडागुजरात काँग्रेस नेत्यांच्या या बैठकीत यावेळी भाजपला अधिक आक्रमकतेनं घेरण्यात येणार असल्याचं ठरविण्यात आलं आहे. काँग्रेसचे नेते आधी आदिवासींच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित करतील. याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. यासाठी नदीजोड प्रकल्पांना विरोध करणाऱ्या आदिवासींना काँग्रेस भक्कम पाठिंबा देईल, असं सांगण्यात आलं आहे. भाजपविरुद्ध सलग निवडणूक पराभव आणि पंजाबमध्ये 'आप'चा उदय झाल्यानंतर काँग्रेसला आता दुहेरी रणनीतीवर काम करणं भाग पडलं आहे. त्यामुळे आता त्या दिशेने पावले टाकण्याची तयारी सुरू आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीGujaratगुजरात