शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

आता लढायचं! पराभव विसरुन काँग्रेसचं आता गुजरातवर लक्ष, राहुल गांधींची बैठक; BJP-AAP ला रोखण्यासाठी मास्टरप्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 20:55 IST

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी जोरदार तयारी जोरात सुरू केली आहे.

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी जोरदार तयारी जोरात सुरू केली आहे. पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसनं आता आपलं लक्ष गुजरातकडे वळवलं आहे. पाच राज्यांतील पराभव विसरून पक्षानं आता गुजरातवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच मंगळवारी माजी काँग्रेस अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी गुजरात काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपचा मुकाबला आणि आम आदमी पक्षाला (आप) रोखण्यासाठी रणनीती तयार करण्यात आली. 

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत भाजपसोबतच 'आप'च्या विरोधात आक्रमक प्रचार करण्याचं ठरविण्यात आलं आहे. सभापती आणि विधिमंडळ पक्षनेते यांची नुकतीच निवड करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. अशा परिस्थितीत आता काँग्रेस लवकरच संघटना वाढवून लोकांना 'आप' किंवा भाजपमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी काम करेल. अनेक राज्यांमध्ये पक्षांतरामुळे काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आहे. अशा स्थितीत पक्षानंही मागील चुकांमधून धडा घेण्यास सुरुवात केली आहे. ६ एप्रिल रोजी साबरमती आश्रमापासून सुरू होणाऱ्या यात्रेत सहभागी होण्यासाठी राहुल यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यातून निवडणुकीत भाजपच्या विरोधात वातावरण तयार केलं जाईल आणि 'आप'ला रोखण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

'आप'विरोधात काँग्रेसही आक्रमक होणारकाँग्रेस दिल्ली आणि पंजाबमधून नेते आणि कार्यकर्त्यांना गुजरातमध्ये पाठवणार असल्याचं बैठकीत ठरविण्यात आलं आहे. यासह ते 'आप'च्या उणिवा सर्वांसमोर आणण्याचं काम करणार आहेत. यासाठी व्हिडिओ क्लिप, घोषणा इत्यादींचा वापर केला जाईल. यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसही 'आप'च्या विरोधात जोरदार प्रचार करणार आहे. भाजपची बी टीम म्हणून 'आप' विरोधात आक्रमक प्रचार केला जाणार आहे. या बैठकीत भाजपविरोधातील जनतेच्या प्रश्नांची यादी आतापासूनच तयार करण्याच्या सूचना नेत्यांना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात भाजपला घेरता यावं, यासाठी ते मुद्दे वेळोवेळी मांडणे हा त्यामागचा हेतू आहे.

निवडणुकीतील पराभवातून घेतला धडागुजरात काँग्रेस नेत्यांच्या या बैठकीत यावेळी भाजपला अधिक आक्रमकतेनं घेरण्यात येणार असल्याचं ठरविण्यात आलं आहे. काँग्रेसचे नेते आधी आदिवासींच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित करतील. याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. यासाठी नदीजोड प्रकल्पांना विरोध करणाऱ्या आदिवासींना काँग्रेस भक्कम पाठिंबा देईल, असं सांगण्यात आलं आहे. भाजपविरुद्ध सलग निवडणूक पराभव आणि पंजाबमध्ये 'आप'चा उदय झाल्यानंतर काँग्रेसला आता दुहेरी रणनीतीवर काम करणं भाग पडलं आहे. त्यामुळे आता त्या दिशेने पावले टाकण्याची तयारी सुरू आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीGujaratगुजरात