शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

मध्य प्रदेशात असंतोष, नाराजीचा लाभ उठवण्यात काँग्रेसला अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 06:36 IST

शेतकऱ्यांमधील नाराजी, शेती मालाला न मिळणारे भाव, वाढती बेरोजगार, व्यापम घोटाळा याविषयी ग्रामीण जनतेत मोठी नाराजी होती. त्याचा लाभ उठवत भाजपा सरकार सत्तेतून बाहेर करण्याची संधी काँग्रेसला होती.

- असिफ कुरणेशेतकऱ्यांमधील नाराजी, शेती मालाला न मिळणारे भाव, वाढती बेरोजगार, व्यापम घोटाळा याविषयी ग्रामीण जनतेत मोठी नाराजीहोती. त्याचा लाभ उठवत भाजपा सरकार सत्तेतून बाहेर करण्याची संधी काँग्रेसला होती. पण भाजपाने आपली मध्य प्रदेशात अजूनही पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले.१५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपाविरोधात काँग्रेसने निवडणुकीच्या वर्षभर आधी तयारी सुरू केली होती. दिग्विजय सिंग, कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया, सुरेश पचौरीसारख्या ज्येष्ठ नेत्यांमधील वाद मिटवत त्यांना एकत्र आणण्याचे काम राहुल गांधी यांनी केले. तिकीटवाटपाचे नियोजन करत बंडखोरी टाळण्यात काँग्रेसने यश मिळवले होते. त्याचा फायदा पक्षाला झाला. चंबळ, माळवा भागात काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले. काँग्रेस या निवडणुकीत जवळपास ८० जागा नव्याने पटकावण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत. यातील ७७ जागा या भाजपाच्या आहेत. ग्रामीण जनतेमध्ये असलेला असंतोष काँग्रेसने बरोबर मतपेटीपर्यंत आणला. जवळपास ४८ जागा या ग्रामीण आणि आदिवासी बहुल भागातून मिळाल्या आहेत.शिवराज सिंह चौहान यांनी सरकारविरोधातील नाराजीचा फार मोठा फटका बसणार नाही यासाठी परिश्रम घेतले. विरोधकांचा एकहाती सामना करत सत्ता कायम ठेवण्यापर्यंत मजल मारली आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांच्या बळावर माळवा, बालाघाट परिसरात भाजपाला चांगले यश मिळाले. शहरी मतदारांनी त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना साथ दिल्याचे चित्र दिसत होते. त्यांच्या व्यतिरिक्त अनेक मंत्री, आमदार, नेते पराभवाच्या छायेत होते. शिवराज सिंह यांच्या कामामुळे भाजपाची फारशी वाताहत झाली नाही.निकालाची कारणे...निवडणूक एवढी अटीतटीची होती की जवळपास ७८ उमेदवार २००० पेक्षा कमी मतांनी विजयी झाले आहेत. शेवटच्या फेरीपर्यंत विजयाचे पारडे वरखाली होत होते.भाजपा व संघाच्या कार्यकर्त्यांची सक्षम फळी मतांची बेगमी करण्यात कामी आली. विकासाचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्याची गरज होती.शिवराज सिंह चौहान सरकारमधील ९ पेक्षा जास्त मंत्री पिछाडीवर किंवा पराभवाच्या छायेत उभे आहेत.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेसBJPभाजपाshivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानRahul Gandhiराहुल गांधी