शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

बिहारसह पोटनिवडणुकीत काँग्रेसला अपयशच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 07:06 IST

गुजरातमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतरही काँग्रेस काही परिवर्तन करू शकली नाही.

 - शीलेश शर्मानवी दिल्ली : बिहारसह देशातील पोटनिवडणुकीत काँग्रेसला फारसे यश न मिळाल्याने पक्षाचे नेते काळजीत आहेत. मध्यप्रदेशात कमलनाथ आणि दिग्विजय सिंह हे मोठे दावे करीत होते. मात्र, तेथेही मोठे यश मिळालेले नाही.

गुजरातमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतरही काँग्रेस काही परिवर्तन करू शकली नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध रोज हल्लाबोल करीत होत्या. तिथे काँग्रेसला केवळ ८ टक्के मते मिळाली आहेत, तर सपा आणि बसपाला काँग्रेसपेक्षा चांगले यश मिळाले आहे. बसपाला १८ टक्के, तर, सपाला २५ टक्के मते मिळाली आहेत.

निवडणुकांमध्ये वारंवार पराभव होत असल्याने काँग्रेस नेत्यांना हे समजत नाही की, त्यांच्या रणनीतीत काय चूक होत आहे. बिहारमध्ये २०१५ मध्ये २७ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा २० ते २१ जागा मिळत आहेत. काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनविण्यासाठी चर्चा सुरू असताना निवडणुकांचे हे निकाल आले आहेत.

पक्षाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पक्ष सतत निवडणुका हरत आहे. राजस्थान, पंजाबमध्ये पक्ष अशोक गेहलोत, सचिन पायलट आणि कॅ. अमरिंदर सिंग यांच्यामुळे सत्तेत आला होता, तर मध्यप्रदेशातील परिस्थिती सत्तारूढ पक्षाविरुद्ध होती. या नेत्याने असेही सांगितले की, जोपर्यंत पक्ष योग्य मंथन आणि तळागाळात काम करीत नाही तोपर्यंत निवडणुका जिंकणे शक्य नाही.

टॅग्स :congressकाँग्रेस