शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

काँग्रेसचे 'जय रघुराम'... लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा बनवण्यासाठी राजन मदत करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 17:39 IST

राहुल गांधी यांनी दुबईच्या दौऱ्यात रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली होती.

ठळक मुद्दे 2019च्या लोकसभा निवडणुकीतही शेतकरी आणि रोजगार हे दोन मुद्दे काँग्रेसच्या केंद्रस्थानी राहणार आहेत. रोजगार उपलब्धी आणि कृषी विकासासंदर्भात आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन काँग्रेसला मदत करणारराहुल गांधी यांनी दुबईच्या दौऱ्यात रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली होती.

नवी दिल्ली- 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. भाजपा आणि काँग्रेस जनतेला आकर्षित करण्यासाठी नवनवी आश्वासनंही देत आहेत. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सत्ताधारी भाजपाला रोजगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक सभांमधून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीतही हे दोन मुद्दे काँग्रेसच्या केंद्रस्थानी राहणार आहेत.रोजगार उपलब्धी आणि कृषी विकासासंदर्भात आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह अनेक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काँग्रेस एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस याच मुद्द्यांचा जाहीरनाम्यात समावेश करणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वतःच्या रॅलींमध्ये रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करत आहेत. या प्रश्नांच्या आडून ते मोदी सरकारवर निशाणाही साधत आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी दुबईच्या दौऱ्यात रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली होती. राजन यांनी यासंदर्भात एक सखोल अहवाल तयार केला असून, त्याचा काँग्रेस पक्ष स्वतःच्या जाहीरनाम्यात वापर करणार आहे. रघुराम राजन हे यूपीए 2 सरकारमध्ये ऑगस्ट 2012 ते सप्टेंबर 2013पर्यंत आर्थिक सल्लागार होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी एक कमिटी तयार केली आहे.या कमिटीची जबाबदारी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याशिवाय सॅम पित्रोदा आणि शशी थरूर यांनाही या कमिटीमध्ये महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. विशेष म्हणजे रघुराम राजन यांनी मोदी सरकारनं केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली होती. त्यावेळी एनडीएच्या कार्यकाळात रघुराम राजन यांना नोटाबंदीच्या निर्णयासंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी मोदी सरकारला असं न करण्याचा इशारा दिला होता. तसेच या निर्णयाचा काहीही फायदा होणार नसल्याचंही त्यांनी त्यावेळी मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सांगितलं होतं. 

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९