शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसची पराभवाची डबल हॅटट्रिक, मित्रपक्षांना डुबवण्याचे केलं काम"; दिल्लीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 21:03 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पराभवाची डबल हॅटट्रिक झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Delhi Assembly Elections Result: दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मुख्यालयात पोहोचले होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी आम आदमी पक्षासोबतच काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला. ज्याने दिल्ली लुटली त्याला परत करावी लागेल. कॅगचा अहवाल विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात मांडला जाणार असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी अरविंद केजरीवाल यांना इशारा दिला. दुसरीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पराभवाची डबल हॅटट्रिक झाल्याचे म्हणत पंतप्रधानांनी राहुल गांधी यांनाही लक्ष्य केलं. भाजपचं मतं मिळवण्यासाठी काँग्रेसने हिंदू बनण्याचा प्रयत्न केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा शून्य जागा मिळाल्या. भाजपच्या मुख्यालयातून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावरुनच काँग्रेसवर निशाणा साधला. देशाच्या राजधानीत सर्वात मोठ्या पक्षाने शून्याची दुहेरी हॅटट्रिक केली आहे. गेल्या तीन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे सर्वात जुन्या पक्षाने शून्याची दुहेरी हॅटट्रिक केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

काँग्रेस पक्ष सोबत असलेल्यांना बुडवतो

"देशातील सर्वात जुन्या पक्षाने सलग सहावेळा देशाची राजधानी दिल्लीत आपले खाते उघडले नाही. त्यांचे लोक पराभवाचे गोल्ड मेडल घेऊन फिरत आहेत. काँग्रेस पक्ष जो सोबत असेल त्याला बुडवतो. काँग्रेसने आपल्या साथीदारांनाही बुडवले आहे. आजची काँग्रेस आपली भाषा आणि आपला अजेंडा चोरण्यात व्यस्त आहे. काँग्रेस त्यांच्या मित्रपक्षांकडून मुद्दे चोरते आणि नंतर त्यांच्याच व्होटबँकेला रोखते," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

दिल्लीत इंडिया आघाडी काँग्रेसच्या विरोधात

"आता काँग्रेसची नजर राज्यांतील पक्षांवर आहे. इंडिया आघाडीच्या पक्षांना आता काँग्रेसचे चरित्र कळू लागले आहे. ज्या व्होटबँकमधून ते जिंकत आहेत ती काँग्रेस परत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे मित्रपक्षांना समजू लागले आहे. दिल्लीतही हे दिसून आले आहे. दिल्ली निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात इंडिया आघाडीने निवडणूक लढवली होती. काँग्रेसला रोखण्यात ते यशस्वी झाले, पण आपदाला वाचवण्यात त्यांना यश आले नाही. आजची काँग्रेस ही स्वातंत्र्य चळवळीच्या काळात होती तशी राहिलेली नाही," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

काँग्रेसमध्ये अर्बन नक्षलवादाचा डीएनए

"आजची काँग्रेस राष्ट्रहिताचे नाही तर शहरी नक्षलवाद्यांचे राजकारण करत आहे. काँग्रेसचे नेते भारताशी लढत असल्याचे सांगतात तेव्हा ती नक्षलवाद्यांची भाषा असते. समाज आणि देशात अराजकता आणण्याची ही भाषा आहे. इकडे दिल्लीत आपदाही याच शहरी नक्षलवादी विचारसरणीला पुढे नेत होती. काँग्रेसची शहरी नक्षलवादी विचारसरणी देशाच्या विचारसरणीवर हल्ला करते. शहरी नक्षलवाद्यांचा डीएनए काँग्रेसमध्ये शिरला आहे, अस आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

"काँग्रेसने २०१४ नंतर ५-७ वर्षे हिंदू होण्याचा प्रयत्न केला. मंदिरात गेले, हार घातले. असे करून भाजपची व्होट बँक फोडून काही मते मिळतील, असे त्यांना वाटले. पण काहीही न मिळाल्याने त्यांनी हे कामही बंद केले. हा भाजपचे काम आहे आणि इथं आपलं काही होणार नाही हे त्यांना समजलं, असं पंतप्रधानांनी म्हटलं.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी