शहरं
Join us  
Trending Stories
1
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
2
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
3
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
4
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
5
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
6
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
7
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
8
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
9
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
10
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
11
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
12
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
13
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
14
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
15
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
16
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
17
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
18
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
19
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
20
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर

काँग्रेसने चुकीच्या धोरणाने देशाचा केला नाश; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 05:35 IST

‘वन रँक वन पेन्शन’अंतर्गत हरयाणाला ९०० कोटी दिले.

रेवाडी : काँग्रेसने आपल्या चुकीच्या धोरणाने देशाचा नाश केला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेसवर निशाणा साधला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी हरयाणातील ऐलनाबाद आणि रेवाडीमध्ये सभेला संबोधित करताना मोदी बोलत होते.

मोदी म्हणाले की, काश्मिरातील कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती; पण काँग्रेसने ७० वर्षांपर्यंत याबाबत काहीच केले नाही. आम्ही हे कलम रद्द केले. आपण जर मला पाच वर्षांसाठी स्थिर केले आहे, तर मी ही अस्थायी व्यवस्था का चालू देऊ? संसदेत १९६४ मध्ये एका चर्चेदरम्यान अशी मागणी पुढे आली होती की, कलम ३७० समाप्त करण्यात यावे आणि या मुद्यावर संसदेत चर्चा व्हावी.

त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी हात जोडून मागणी केली होती की, यावर विचार केला जावा आणि कलम ३७० समाप्त करण्यात यावे; पण हा विषय बाजूला ठेवला गेला. काय हतबलता होती? आणि काय खेळ खेळला जात होता? असा सवालही त्यांनी केला. ‘वन रँक वन पेन्शन’अंतर्गत केवळ हरयाणातच ९०० कोटी रुपये दिले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.

करतारपूर कॉरिडॉरबाबतही मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, ७० वर्षे भाविकांना दुर्बिणीने करतारपूर साहिब गुरुद्धाराचे दर्शन करावे लागले. फाळणीच्या वेळी करतारपूर साहिब गुरुद्वारा भारतीय हद्दीत आणू न शकणे ही एक चूक होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस