शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

काँग्रेसने चुकीच्या धोरणाने देशाचा केला नाश; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 05:35 IST

‘वन रँक वन पेन्शन’अंतर्गत हरयाणाला ९०० कोटी दिले.

रेवाडी : काँग्रेसने आपल्या चुकीच्या धोरणाने देशाचा नाश केला, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काँग्रेसवर निशाणा साधला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी हरयाणातील ऐलनाबाद आणि रेवाडीमध्ये सभेला संबोधित करताना मोदी बोलत होते.

मोदी म्हणाले की, काश्मिरातील कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती; पण काँग्रेसने ७० वर्षांपर्यंत याबाबत काहीच केले नाही. आम्ही हे कलम रद्द केले. आपण जर मला पाच वर्षांसाठी स्थिर केले आहे, तर मी ही अस्थायी व्यवस्था का चालू देऊ? संसदेत १९६४ मध्ये एका चर्चेदरम्यान अशी मागणी पुढे आली होती की, कलम ३७० समाप्त करण्यात यावे आणि या मुद्यावर संसदेत चर्चा व्हावी.

त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी हात जोडून मागणी केली होती की, यावर विचार केला जावा आणि कलम ३७० समाप्त करण्यात यावे; पण हा विषय बाजूला ठेवला गेला. काय हतबलता होती? आणि काय खेळ खेळला जात होता? असा सवालही त्यांनी केला. ‘वन रँक वन पेन्शन’अंतर्गत केवळ हरयाणातच ९०० कोटी रुपये दिले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.

करतारपूर कॉरिडॉरबाबतही मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, ७० वर्षे भाविकांना दुर्बिणीने करतारपूर साहिब गुरुद्धाराचे दर्शन करावे लागले. फाळणीच्या वेळी करतारपूर साहिब गुरुद्वारा भारतीय हद्दीत आणू न शकणे ही एक चूक होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस