शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

मोदी सरकारचे फलक हटविण्याची काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 03:44 IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे फलक जागोजागी लागले असून त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत आहे. सरकारला हे ...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे फलक जागोजागी लागले असून त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत आहे. सरकारला हे फलक काढण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. काँग्रेसने निवेदनात म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले व त्यांच्या सरकारची कामगिरी सांगणारे फलक देशभरात मुख्यत्वे पेट्रोलपंपांनजीक लावलेले आहेत. निवडणूक कार्यक्रम आयोगाने लागू केल्यानंतर लगेचच आचारसंहिताही लागू झाली. तिचा भंग होत असल्याने हे फलक तातडीने काढून टाकणे आवश्यक आहे. असे फलक झळकविणे ही जनतेच्या पैशाची उधळपट्टीही आहे. मोदी निवडणूक प्रचारासाठी सरकारी यंत्रणा व पैसे वापरत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यावर सरकार, राजकीय पक्षांवरही अनेक बंधने येतात.आचारसंहितेचा बडगा लक्षात घेऊन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी चेन्नईहून दिल्लीला परत येताना विशेष विमानाचा वापर करणे टाळले होते. त्यांनी खासगी कंपनीच्या विमानाने प्रवास केला. या दक्षतेबद्दल त्यांचे सर्वांनीच कौतुक केले होते.आचारसंहितेआधी लावले फलकमोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे फलक आचारसंहिता लागू होण्याच्या काही आठवडे आधीच झळकविण्याचा चाणाक्षपणा दाखविण्यात आला होता. त्या वेळी आक्षेप घेता न आलेल्या काँग्रेसने आचारसंहिता लागू झाल्यानंतर मात्र हा मुद्दा धसास लावण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग