शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

मोदी सरकारचे फलक हटविण्याची काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 03:44 IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे फलक जागोजागी लागले असून त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत आहे. सरकारला हे ...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे फलक जागोजागी लागले असून त्यामुळे आचारसंहितेचा भंग होत आहे. सरकारला हे फलक काढण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. काँग्रेसने निवेदनात म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले व त्यांच्या सरकारची कामगिरी सांगणारे फलक देशभरात मुख्यत्वे पेट्रोलपंपांनजीक लावलेले आहेत. निवडणूक कार्यक्रम आयोगाने लागू केल्यानंतर लगेचच आचारसंहिताही लागू झाली. तिचा भंग होत असल्याने हे फलक तातडीने काढून टाकणे आवश्यक आहे. असे फलक झळकविणे ही जनतेच्या पैशाची उधळपट्टीही आहे. मोदी निवडणूक प्रचारासाठी सरकारी यंत्रणा व पैसे वापरत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यावर सरकार, राजकीय पक्षांवरही अनेक बंधने येतात.आचारसंहितेचा बडगा लक्षात घेऊन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी चेन्नईहून दिल्लीला परत येताना विशेष विमानाचा वापर करणे टाळले होते. त्यांनी खासगी कंपनीच्या विमानाने प्रवास केला. या दक्षतेबद्दल त्यांचे सर्वांनीच कौतुक केले होते.आचारसंहितेआधी लावले फलकमोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे फलक आचारसंहिता लागू होण्याच्या काही आठवडे आधीच झळकविण्याचा चाणाक्षपणा दाखविण्यात आला होता. त्या वेळी आक्षेप घेता न आलेल्या काँग्रेसने आचारसंहिता लागू झाल्यानंतर मात्र हा मुद्दा धसास लावण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग