शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

देश बेरोजगारीच्या ‘टाइम बॉम्ब’वर, काँग्रेसची टीका, रोजगाराबाबत पक्षाकडे ठोस योजना असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 09:16 IST

प्रियांका गांधी यांनी म्हटले की, भारतातील कामगारांपैकी ८३% बेरोजगार तरुण आहेत.

नवी दिल्ली : भारतातील रोजगार परिस्थितीशी संबंधित आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ) आणि मानव विकास संस्थेच्या (आयएचडी) अहवालावरून काँग्रेसने देश बेरोजगारीच्या ‘टाइम बॉम्ब’वर बसला आहे, अशी टीका केंद्र सरकारवर केली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, जयराम रमेश आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी या अहवालाचा उल्लेख करताना काँग्रेसकडे रोजगाराबाबत ठोस योजना असल्याचेही सांगितले.

“आमच्या तरुणांना केंद्र सरकारच्या दयनीय उदासीनतेचा फटका सहन करावा लागत आहे, कारण सतत वाढत्या बेरोजगारीने त्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे,” असे खरगे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट केले. “आम्ही बेरोजगारीच्या ‘टाइम बॉम्ब’वर बसलो आहोत. २०१२ च्या तुलनेत केंद्र सरकारच्या काळात तरुणांची बेरोजगारी तिपटीने वाढली असून, काँग्रेसने ‘युवा न्याय’ आणला आहे,” असे खरगे म्हणाले.

प्रियांका गांधी यांनी म्हटले की, भारतातील कामगारांपैकी ८३% बेरोजगार तरुण आहेत. २००० मध्ये एकूण बेरोजगारांमध्ये सुशिक्षित तरुणांचा वाटा ३५.२ टक्के होता. २०२२ मध्ये तो ६५.७ टक्क्यांपर्यंत वाढला, म्हणजे दुप्पट झाला. दुसरीकडे पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार ‘सरकार बेरोजगारीची समस्या सोडवू शकत नाही’ असे म्हणत आहेत.

‘प्लॅन बी’अंतर्गत भाजपची जनार्दन रेड्डींसोबत भागीदारी कर्नाटकचे माजी मंत्री व खाण उद्योगपती जी. जनार्दन रेड्डींची भाजपमध्ये घरवापसी झाल्यानंतर काँग्रेसने बुधवारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. निवडणूक रोखे सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर घोषित केल्यांनतर भाजपने ‘प्लॅन बी’अंतर्गत खाण व्यावसायिकांशी थेट भागीदारी केल्याचा काँग्रेसने आरोप केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सीबीआय जनार्दन रेड्डी यांना अशी क्लीन चीट देईल की, त्यांच्यासमोर सर्व पांढरेपणा फिका पडेल, असे काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी भाजपला टोला लगावताना उपरोधिकपणे सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४