शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

'संस्थांचा विनाश थांबवला नाहीतर हुकूमशाही वरचढ...', EC च्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 09:23 IST

निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसने चिंता व्यक्त केली आहे.

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. पण, त्याअगोदरच निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. मात्र त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि अरूण गोयल यांनी दिलेला हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. यावर आता काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. या राजीनाम्यावर काँग्रेसने चिंता व्यक्त केली आहे. 

निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसने चिंता व्यक्त केली आहे. स्वतंत्र संस्थांचा पद्धतशीर ऱ्हास थांबवला नाही, तर लोकशाही हुकूमशाहीने काबीज केली जाईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. 

पंतप्रधान १३ मार्चला उरकणार राज्यांचा दौरा; पुढील आठवड्यात फुंकणार लोकसभेचा बिगुल

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करत चिंता व्यक्त केली.ट्विटमध्ये म्हटले की, भारतात आता फक्त एकच निवडणूक आयुक्त आहेत.  तेही काही दिवसांत लोकसभा निवडणुका जाहीर होणार असताना. जर आपण स्वतंत्र संस्थांचा पद्धतशीरपणे नाश थांबवला नाही तर आपली लोकशाही हुकूमशाहीने उधळली जाईल. ECI आता पडणाऱ्या शेवटच्या घटनात्मक संस्थांपैकी एक असेल. निवडणूक आयुक्त निवडण्याची नवी प्रक्रिया आता सत्ताधारी पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे प्रभावीपणे गेली आहे. कार्यकाळ पूर्ण होऊन २३ दिवस उलटूनही नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती का झाली नाही? मोदी सरकारने या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असंही खरगे यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनीही ट्विटरवरुन टीका केली, "जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीसाठी हे अत्यंत चिंताजनक आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. ECI कसे काम करते? घटनात्मक संस्था कशी कार्यरत आहे? त्यावर सरकार कसा दबाव आणते, याबाबत पारदर्शकता नाही. ही वृत्ती लोकशाही परंपरा नष्ट करण्यावरच राजवटीची झुकलेली असल्याचे दिसून येते. निवडणूक आयोग नेहमी पूर्णपणे निःपक्षपाती असणे आवश्यक आहे, अशी टीका केसी वेणुगोपाल यांनी केली.

कायदा मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, गोयल यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारपासून स्वीकारला आहे. त्यांनी पद का सोडले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोयल हे १९८५ च्या बॅचचे पंजाब केडरचे आयएएस अधिकारी होते. नोव्हेंबर २०२२ मध्ये ते निवडणूक आयोगात रुजू झाले. अनुप चंद्र पांडे यांच्या निवृत्तीनंतर आणि गोयल यांच्या राजीनाम्यानंतर तीन सदस्यीय निवडणूक आयोगात आता एकच सदस्य उरले आहेत.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले म्हणाले की, ही बाब चिंताजनक आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पॅनेलवर दोन नियुक्त्या कराव्यात. आपल्या ट्विटमध्ये गोखले म्हणाले की, निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिला आहे. निवडणूक आयोगाचे पद रिक्त आहे. निवडणूक आयोगाकडे फक्त एकच मुख्य निवडणूक आयुक्त उरले आहेत'. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेस