शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपविरुद्धच्या लढाईत काँग्रेस-माकपात मतभेद; काॅंग्रेस कमकुवत, त्यांनी केवळ देश पातळीवर नेतृत्व करण्याची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 08:10 IST

काँग्रेस देशाच्या अनेक भागांत कमकुवत असून ती भाजपविरुद्ध स्वबळावर लढा देऊ शकत नाही, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन व माकपाचे राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन यांचे मत आहे, तर राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री साजी चेरियान यांना काँग्रेसने देश पातळीवर विरोधी आघाडीचे नेतृत्व करावे, असे वाटते. 

तिरुअनंतपुरम/थ्रिसूर :काँग्रेसच्या कर्नाटकमधील विजयाच्या पार्श्वभूमीवर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील या सर्वांत जुन्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी याबाबत केरळमधील सत्ताधारी माकपात मतभेद असल्याचे दिसून येत आहे.  काँग्रेस देशाच्या अनेक भागांत कमकुवत असून ती भाजपविरुद्ध स्वबळावर लढा देऊ शकत नाही, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन व माकपाचे राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन यांचे मत आहे, तर राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री साजी चेरियान यांना काँग्रेसने देश पातळीवर विरोधी आघाडीचे नेतृत्व करावे, असे वाटते. अनेक वर्षे देशावर सत्ता गाजवणारी काँग्रेस आज पूर्वीसारखी नाही. काँग्रेसने हे लक्षात घेतले पाहिजे. देशाच्या अनेक भागांत ती आज कमकुवत आहे. त्यामुळे भाजपला धूळ चारण्यासाठी राज्यांतील भाजपविरोधी सर्व गटांना एकत्र आणणे आणि भाजपचा राज्यनिहाय मुकाबला करणे हीच व्यावहारिक रणनीती आहे,” असे विजयन म्हणाले. ते त्रिशूर जिल्ह्यातील गुरुवायूर येथे  आयोजित जाहीर सभेत बोलत होते. एक दिवसापूर्वी गोविंदन यांनीदेखील असेच मत व्यक्त केले होते. कर्नाटक निवडणुकीचे निकाल काँग्रेसचे पुनरागमन दर्शवत नाहीत आणि हा सर्वांत जुना पक्ष स्वबळावर भारताला भाजपमुक्त करू शकत नाही. ते (काँग्रेस) देखील तसा दावा करत नाहीत,” असे गोविंदन म्हणाले होते.रविवारी चेरियान म्हणाले की, काँग्रेस भारतातील सर्वात मजबूत पक्षांपैकी एक आहे व त्यांना भाजपविरोधातील लढाईत पुढे येण्यास सांगणे यात काहीही गैर नाही. त्यांना आघाडीचे नेतृत्व करू द्या,” असेही ते म्हणाले. त्याच वेळी केरळमधील विविध मुद्द्यांवर काँग्रेसच्या भूमिकेशी आपण सहमत नाही, असेही ते म्हणाले. 

कर्नाटकात ४० टक्के, केरळमध्ये तब्बल ८० टक्के कमिशन -त्रिशूर (केरळ) : कर्नाटकातील मावळते भाजप सरकार “४० टक्के कमिशनचे सरकार” असल्याचा आरोप करत तेथील निवडणूक जिंकलेल्या काँग्रेसने सोमवारी केरळमधील सत्ताधारी एलडीएफ सरकारवर हल्लाबोल करताना ते “८० टक्के कमिशन”चे सरकार असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्यांदा सत्ता मिळाल्याने सत्ताधारी डावे पक्ष व मुख्यमंत्र्यांना गर्व झाला आहे, असे काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसCommunist Party of India (markjhista)कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्झिस्ट)BJPभाजपा