शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

भाजपविरुद्धच्या लढाईत काँग्रेस-माकपात मतभेद; काॅंग्रेस कमकुवत, त्यांनी केवळ देश पातळीवर नेतृत्व करण्याची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 08:10 IST

काँग्रेस देशाच्या अनेक भागांत कमकुवत असून ती भाजपविरुद्ध स्वबळावर लढा देऊ शकत नाही, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन व माकपाचे राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन यांचे मत आहे, तर राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री साजी चेरियान यांना काँग्रेसने देश पातळीवर विरोधी आघाडीचे नेतृत्व करावे, असे वाटते. 

तिरुअनंतपुरम/थ्रिसूर :काँग्रेसच्या कर्नाटकमधील विजयाच्या पार्श्वभूमीवर २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील या सर्वांत जुन्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी याबाबत केरळमधील सत्ताधारी माकपात मतभेद असल्याचे दिसून येत आहे.  काँग्रेस देशाच्या अनेक भागांत कमकुवत असून ती भाजपविरुद्ध स्वबळावर लढा देऊ शकत नाही, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन व माकपाचे राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन यांचे मत आहे, तर राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री साजी चेरियान यांना काँग्रेसने देश पातळीवर विरोधी आघाडीचे नेतृत्व करावे, असे वाटते. अनेक वर्षे देशावर सत्ता गाजवणारी काँग्रेस आज पूर्वीसारखी नाही. काँग्रेसने हे लक्षात घेतले पाहिजे. देशाच्या अनेक भागांत ती आज कमकुवत आहे. त्यामुळे भाजपला धूळ चारण्यासाठी राज्यांतील भाजपविरोधी सर्व गटांना एकत्र आणणे आणि भाजपचा राज्यनिहाय मुकाबला करणे हीच व्यावहारिक रणनीती आहे,” असे विजयन म्हणाले. ते त्रिशूर जिल्ह्यातील गुरुवायूर येथे  आयोजित जाहीर सभेत बोलत होते. एक दिवसापूर्वी गोविंदन यांनीदेखील असेच मत व्यक्त केले होते. कर्नाटक निवडणुकीचे निकाल काँग्रेसचे पुनरागमन दर्शवत नाहीत आणि हा सर्वांत जुना पक्ष स्वबळावर भारताला भाजपमुक्त करू शकत नाही. ते (काँग्रेस) देखील तसा दावा करत नाहीत,” असे गोविंदन म्हणाले होते.रविवारी चेरियान म्हणाले की, काँग्रेस भारतातील सर्वात मजबूत पक्षांपैकी एक आहे व त्यांना भाजपविरोधातील लढाईत पुढे येण्यास सांगणे यात काहीही गैर नाही. त्यांना आघाडीचे नेतृत्व करू द्या,” असेही ते म्हणाले. त्याच वेळी केरळमधील विविध मुद्द्यांवर काँग्रेसच्या भूमिकेशी आपण सहमत नाही, असेही ते म्हणाले. 

कर्नाटकात ४० टक्के, केरळमध्ये तब्बल ८० टक्के कमिशन -त्रिशूर (केरळ) : कर्नाटकातील मावळते भाजप सरकार “४० टक्के कमिशनचे सरकार” असल्याचा आरोप करत तेथील निवडणूक जिंकलेल्या काँग्रेसने सोमवारी केरळमधील सत्ताधारी एलडीएफ सरकारवर हल्लाबोल करताना ते “८० टक्के कमिशन”चे सरकार असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्यांदा सत्ता मिळाल्याने सत्ताधारी डावे पक्ष व मुख्यमंत्र्यांना गर्व झाला आहे, असे काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसCommunist Party of India (markjhista)कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्झिस्ट)BJPभाजपा