शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

हत्तीवर स्वार होऊन काँग्रेस तीन राज्यांत शोधणार विजयाचा मार्ग   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 08:27 IST

एकजूट झालेल्या विरोधकांसमोर बलाढ्य भाजपाची दाणादाण उडत असल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे आगामा काळात नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर आव्हान उभे करण्यासाठी सर्व भाजपाविरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

नवी दिल्ली - एकजूट झालेल्या विरोधकांसमोर बलाढ्य भाजपाची दाणादाण उडत असल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे आगामा काळात नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर आव्हान उभे करण्यासाठी सर्व भाजपाविरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. त्याचाच भाग म्हणून या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यातील निवडणुकीमध्ये  काँग्रेस आणि बसपा एकत्र येऊन निवडणूर लढवण्याची शक्यता आहे.

या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेस बसपाला काही जागा सोडण्यासाठी तयार झाली आहे. तसेच जागावाटप आणि आघाडील अंतिम स्वरूप देण्याची जबाबदारी पक्षाने मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ, राजस्थानमध्ये अशोक गहलोत आणि छत्तीसगडमध्ये पी.एल. पुनिया यांच्याकडे सोपवली आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि बसपा प्रमुख मायावती यांच्या अंतिम सहमतीनंतर ही आघाडी मूर्त स्वरूपात येऊ शकेल.  

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सध्या भाजपा सत्तेत आहे. मात्र यावेळी काँग्रेसकडून भाजपाला कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. 2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर पक्षासोबत आघाडी करण्याची घोषणा काँग्रेसने आधीच केली आहे. दरम्यान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेस आणि बसपा हे  स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होते. या राज्यांमध्ये 2013 साली झालेल्या निवडणुकीत अनेक मतदारसंघात काँग्रेस आणि बसपाने मिळवलेल्या मतांची बेरीज  भाजपापेक्षा अधिक होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा विचार समोर आला आहे. जर दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाली तर पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि बसपा एकत्रितपणे लढतील. तसेच काँग्रेस आणि बसपामधील आघाडीचा परिणाम अन्य राज्यामधील निवडणुकीवरही पडेल. 

तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमधील काँग्रेस आणि बसपाची आघाडी या तीन राज्यांत होणाऱ्या आघाडीवरच अवलंबून असेल. उत्तर प्रदेशमध्ये बसपा काँग्रेसच्या तुलनेत प्रबळ पक्ष आहे. त्यामुळे तीन राज्यांमध्ये काँग्रेसकडून आपला वाटा मिळवल्यानंतर उत्तर प्रदेशात काँग्रेसला रिटर्न गिफ्ट देण्याचा प्रयत्न असेल. मात्र याचदरम्यान, अपेक्षित जागा मिळाल्याशिवाय आघाडीत सहभागी होणार नाही, असे मायावती यांनी जाहीर केले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीElectionनिवडणूकPoliticsराजकारणMadhya Pradeshमध्य प्रदेश