शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

देशात रामाची लाट नाही; राम मंदिर सोहळा BJP चा राजकीय कार्यक्रम; राहुल गांधींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 18:01 IST

राहुल गांधी यांच्याविरोधात असाममध्ये FIR दाखल झाली, यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेतून भाजपवर निशाणा साधला.

Congress Bharat Jodo Nyay Yatra: मणिपूरमधून सुरू झालेली काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा' सध्या असाममध्ये आहे. गुवाहाटीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीनंतर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या निर्देशानुसार, पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, असाममध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला. 

देशात रामाची लाट नाहीश्रीराम मंदिर सोहळ्याला त्यांनी भाजपचा राजकीय कार्यक्रम म्हटले. तसेच, देशात 'रामाची लाट' आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, अशी कोणतीही लाट नाही. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री बिस्वा सरमा यांचे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री म्हणून वर्णन केले. तसेच, राज्यात प्रचंड बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महागाई आहे. शेतकरी चिंतेत असून तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. हेच मुद्दे आम्ही मांडत आहोत. युवा न्याय, सहभाग, महिला न्याय, शेतकरी न्याय आणि कामगार न्याय, हे आमच्या यात्रेचे पाच स्तंभ आहेत. येत्या दीड महिन्यात काँग्रेस पक्ष यात्रेदरम्यान या मुद्द्यांवर आपली मते मांडेल, असंही राहुल यावेळी म्हणाले. 

एकीकडे मोदी-RSS अन् दुसरकडे इंडिया राहुल गांधी पुढे म्हणाले की, आम्हाला मंदिरात जाण्यापासून रोखणे, महाविद्यालयात जाण्यापासून रोखणे किंवा पदयात्रा थांबवणे, यातून त्यांची भीती दिसून येत आहे. पण, आम्ही घाबरणार नाही. भाजपवाले यात्रेत अडथळे निर्माण करतात, तेव्हा ते प्रत्यक्षात यात्रेला मदत करत असतात. यात्रा थांबवावी, अशी माझी इच्छा आहे. आम्हाला महाविद्यालयात जाण्यापासून रोखले पाहिजे, त्यानंतर संपूर्ण विद्यार्ती बाहेर पडले आणि आमचे ऐकले. आज एका बाजूला नरेंद्र मोदी आणि आरएसएस आहे, तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी आहे. इंडिया ही एक विचारधारा आहे आणि आमच्या इंडिया आघाडीकडे जवळपास 60 टक्के मते आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राAssamआसामBJPभाजपा